कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ
Jump to navigation
Jump to search
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
संस्कृतच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रात कोणतेही विद्यापीठ नव्हते हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ सप्टेंबर, इ.स. १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या विद्यापीठाची स्थापना केली. संस्कृतमधील थोर कवि कालिदास यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. कवि कालिदासांनी त्यांचे 'मेघदूत' हे काव्य रामटेक येथे लिहिले असल्याचे बोलले जाते, म्हणूनच या विद्यापीठाचे मुख्यालय रामटेक येथे आहे. ह्या विद्यापीठातर्फ़े संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागांतर्गत काम केले जाते. आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विद्यानिष्णात पदव्या प्रदान केल्या जातात.[१]