"हैदराबाद मुक्तिसंग्राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Reverted good faith edits by 49.14.18.237 (talk): जाहीरात सदृश्य मजकूर . (TW)
(चर्चा | योगदान)
ओळ १७: ओळ १७:
[[इ.स. १८८५]] साली कॉंग्रेस ची स्थापना झाल्या नंतर जनमत कॉंग्रेसला अनुकुल होते. कॉंग्रेसच्या राजकीय जागृतीच्या कामांना पाठींबा देणाऱ्यात डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, मुल्ला अब्दुल कय्युम, रामचंद्र पिल्लई, ''मौलिम ए शफिक'' पत्राचे संपादक मोहिब हुसेन, ''हाजार दास्तान''चे संपादक सय्यद अखिल यांचा समावेश होता. इंग्रजांच्या चुकीच्या शासकीय आणि अवैध धोरणांचा निषेध केला. अर्थातच सर सय्य्द अहमदच्या प्रभावाखालील निजाम शासनात उंच हुद्दांवर बसलेल्या हितसंबधीयांनी कॉंग्रेसचा विरोध करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे सर सय्य्द अहमदच्या राजकीय व शैक्षणिक व्यापांना प्रोत्साहन आणि कॉंग्रेसचे पाठीराख्यांचे खच्चीकरण असे निजाम शासनाचे धोरण कायम राहीले. [[इ.स. १८९१]] मध्ये वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. निजाम शासनास न जुमानणाऱ्या शौकत-उल-इस्लाम सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली गेली.
[[इ.स. १८८५]] साली कॉंग्रेस ची स्थापना झाल्या नंतर जनमत कॉंग्रेसला अनुकुल होते. कॉंग्रेसच्या राजकीय जागृतीच्या कामांना पाठींबा देणाऱ्यात डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, मुल्ला अब्दुल कय्युम, रामचंद्र पिल्लई, ''मौलिम ए शफिक'' पत्राचे संपादक मोहिब हुसेन, ''हाजार दास्तान''चे संपादक सय्यद अखिल यांचा समावेश होता. इंग्रजांच्या चुकीच्या शासकीय आणि अवैध धोरणांचा निषेध केला. अर्थातच सर सय्य्द अहमदच्या प्रभावाखालील निजाम शासनात उंच हुद्दांवर बसलेल्या हितसंबधीयांनी कॉंग्रेसचा विरोध करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे सर सय्य्द अहमदच्या राजकीय व शैक्षणिक व्यापांना प्रोत्साहन आणि कॉंग्रेसचे पाठीराख्यांचे खच्चीकरण असे निजाम शासनाचे धोरण कायम राहीले. [[इ.स. १८९१]] मध्ये वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. निजाम शासनास न जुमानणाऱ्या शौकत-उल-इस्लाम सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली गेली.


== हैदराबाद राज्यातील सामाजिक आणि राजकिय जागृती==
== हैदराबाद राज्यातील सामाजिक आणि राजकीय जागृती==
लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्स्वाची सुरुवात हैदराबादेत शालिबंडा येथे शिवराम शास्त्रि गोरे यांनी तर चादरघाट येथे विद्यार्थ्यांनी बसवुन केली.लौकरच सार्वजनिक गणेशोत्सव इतर महाराष्ट्रा सोबतच संपूर्ण हैदराबाद रज्यात साजरा हौ लागला.सार्वजनिक गणेशोत्सव ने सामाजिक चेतना निर्माण होण्यास मोठीच मदत झाली.आर्य समाजास डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय,गुलबर्ग्याचे केशवराव कोरटकर,पंडित श्रिपाद सातवळेकर यांनी पाठींबा दिला राजकिय,सामाजिक,आणि शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्य धडाडीने हातात घेतले.मुल्ला अब्दुल कय्युम खानांनी हैदराबाद मध्यवर्ती वाचनालयाची स्थापना [[इ.स. १८९२]] मध्ये केली,दैरत उल मौरिफ ची [[इ.स. १८९१]] मध्ये संशोधन संस्थेची स्थापना केली व अरेबिक भाषेसंबधात आतरराष्ट्रीय मान्यता मिळवली,कॉंग्रेसला जोरदार फक्त पाठींबाच दिला नाहीतर [[इ.स. १९०५]] च्या स्वदेशी आंदोलनात सहभाग ही घेतला व गणेशोत्स्वाशी प्रोत्साहन दिले.मौलवी मोहमद अकबर अली,मौलवी मोहमद मझ‍अर,इत्यादि लोकांना प्रोत्साहन देउन पुरोगामी विचारांची अंजुमन ए मारीफ नावाची संस्था सुरू केली.मौलवी मोहमद अकबर अली सहिफा नावाचे वृत्तपत्र संपादीत केले.
लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हैदराबादेत शालिबंडा येथे शिवराम शास्त्री गोरे यांनी तर चादरघाट येथे विद्यार्थ्यांनी केली. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सव इतर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण हैदराबाद राज्यात साजरा होऊ लागला. सार्वजनिक गणेशोत्सवाने सामाजिक चेतना निर्माण होण्यास मोठीच मदत झाली. आर्य समाजास डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, गुलबर्ग्याचे केशवराव कोरटकरपंडित श्रीपाद सातवळेकर यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्या धडाडीने हाती घेतले. मुल्ला अब्दुल कयुम खानांनी [[इ.स. १८९२]]मध्ये हैदराबाद मध्यवर्ती वाचनालयाची स्थापना केली. [[इ.स. १८९१]]मध्ये, दैरत उल मौरिफ या संशोधनसंस्थेची स्थापना केली व अरेबिक भाषेसंबधांत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. काँग्रेसला फक्त जोरदार पाठिंबाच दिला नाही ,तर [[इ.स. १९०५]]च्या स्वदेशी आंदोलनात खानांनी सहभागही घेतला; गणेशोत्सवासही प्रोत्साहन दिले. मौलवी मोहमद अकबर अली, मौलवी मोहमद मजहर, इत्यादी लोकांना प्रोत्साहन देऊन मुल्ला अब्दुल कयुम खानांनी पुरोगामी विचारांची अंजुमन ए मारीफ नावाची संस्था सुरू केली. मौलवी मोहमद अकबर यांनी अली सहिफा नावाचे वृत्तपत्र संपादित केले.


[[इ.स. १८९८]] मध्ये पुण्याच्या रॅंड खुन खटल्यातील क्रांतीकारी बाळ्कृष्ण हरी चाफेकरांना ६ महिने पेक्षा अधिक काळ हैदराबाद राज्यातील लोकांनी लपवुन ठेवले.पण निजाम पोलिसांनी त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन केले व बदल्यात ब्रिटीश शाबासकी मिळवली.त्याप्रमाणेच रावअसाहेब उर्फ बाबासाहेब या क्रांतीकाऱ्यासही निजाम पोलिसांनी [[इ.स. १८९८]]-[[इ.स. १८९९]] मध्ये फाशी दिले गेले.
[[इ.स. १८९८]] मध्ये पुण्याच्या रॅन्ड खून खटल्यातील क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकरांना ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ हैदराबाद संस्थानातील लोकांनी लपवून ठेवले. पण निजाम पोलिसांनी त्यांना ब्रिटिशांच्या स्वाधीन केले व बदल्यात शाबासकी मिळवली.

निजाम पोलिसांनी रावसाहेब ऊर्फ बाबासाहेब या क्रांतिकारकास [[इ.स. १८९८]]-[[इ.स. १८९९]]मध्ये फाशी दिले आणि ब्रिटिशांकडून कौतुक करून घेतले.


===स्वदेशी चळवळ===
===स्वदेशी चळवळ===


===खिलाफत===
===खिलाफत===

==हैदराबाद राज्यातील साम्यवादी चळवळ==
निजामाच्या जहागीरदार, जमीनदार आणि सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध १९४६ साली तेलंगाणातील नालगोंडा जिल्ह्यातील चितल्ल्या ऐलम्मा या दलित महिलेने चळवळ सुरू केली. जमीनदाराकडून आपली अनधिकृतपणे बळकावली जाणारी जमीन वाचवण्याकरिता तिने जमीनदारांविरुद्ध आंदोलनाची सुरवात केली. या महिलेस आंध्रमहासभा नावाच्या तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मदत होती. १९४६ ते १९५१ या काळात झालेले हे सशस्त्र आंदोलन वेट्टी चेकिरी उद्यमम नावाने ओळखले जाऊ लागले. हे आंदोलन जवळच्या बिदर आणि वरंगळ सकट चार हजार खेड्यांत पसरले जवळपास तीन हजार खेड्यांची जमीनदारांपासून मुक्तता करणाऱ्या या आंदोलनास लवकरच निजामाच्या जुलमी रझाकार सेनेशी दोन हात करावयास लागले.

<ref>Telangana Rebellion. (2011, April 3). इंग्रजी भाषी विकिपीडियात . 18:32, May 15, 2011,ला from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Telangana_Rebellion&oldid=422065366 जसे दिसले</ref>

==हैदराबाद राज्यातील आर्य समाज चळवळ==
[[इ.स. १८९२] मध्ये स्वामी गिरानंद सरस्वतींनी सुधारणावादी आर्य समाजाची ओळख हैदराबाद येथील हिंदु समाजाला करून दिली व सनातन हिंदु मार्तंडांशी धर्म चर्चा केली. काही आर्य समाजींना हैदराबाद संस्थानातून हद्दपार करण्यात आले.

==हैदराबाद राज्यातील दलित चळवळ==
==हैदराबाद स्टेट कॉंग्रेस==
==हैदराबाद मुक्तिसंग्राम==
[[चित्र:Hyderabad state 1909.jpg|thumb|हैदराबाद राज्य १९०९]]
;’काळोखातील अग्निशिखा’ने रजाकारा विरुद्धचा लढा जिवंत केला -द .ता.भोसले पंढरपूर यांचे प्रतिपादन......! :
कलहालीतील स्वातंत्र्य संग्राम अतिशय तेजस्वी असतानाही आम्हा पश्चिम महाराष्ट्रातील मंडळीना हा लोकोत्तर संग्राम
पुरेसा ठाऊक नाही. रझाकारांनी ३५०० सैनिकांसह गढीला घातलेला वेढा आणि केलेला हिंसाचार आणि रझाकारांविरुद्ध जिवावर उदार
होऊन लढणाऱ्या आप्पासाहेब नाईक व अन्य सैनिकांनी प्राणपणाने लढलेला लढा अनेकांना नीटसा माहित नाही, याचे नवल वाटते. परंतु रझाकारांविरुद्धचा हा लढा नरेंद्र नाईकांनी आपल्या' काळोखातील अग्निशिखा’ या कादंबरीतून जिवंत केला आहे, असे मत प्रा.द.ता.भोसले यांनी व्यक्त केले.

नरेंद्र नाईक लिखित ' काळोखातील अग्निशिखा' कादंबरीविषयी प्रा.द.ता.भोसले पुढे म्हणाले की कलहाली येथील रझाकारांविरुद्धच्या या लढ्याला किंबहुना या ऐतिहासिक सत्याला नाईकांनी दिलेले वाङ्मयीन सत्याचे रूप कलादृष्ट्या श्रेष्ठ आहे.

खरेतर ऐतिहासिक कादंबरीलेखन खूप अवघड असते. सत्यनिष्ठा, प्रसंगांची निवड, तटस्थवृत्ती, वातावरण निर्मितीसाठीचे तादात्म्य आणि सुक्षमता, पात्रांचे सजीव चित्रण, खास ऐतिहासिक भाषा, प्रवाही संवाद आणि शब्दांत न मावणारा संग्राम शब्दांत पकडणे अतिशय कठीण असते. परंतु या सर्व कसोट्या ’काळोखातील अग्निशिखा’ने उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.

त्यामुळे नरेंद्र नाईकांची ’काळोखातील अग्निशिखा’ ही पहिलीच कादंबरी असली तरी गुणाने ती पहिल्या नंबरची आहे, असे मतही प्रा. द. ता.भोसले यांनी व्यक्त केले. ’काळोखातील अग्निशिखा’तील आप्पासाहेब नाईकांचे व्यक्तिचित्रण त्यांची देशभक्ती, संघटन-कौशल्य, सत्यनिष्ठा आणि गरीबांविषयीचा कळवळा या गुणामुळे उजळून निघाले आहे, असेही प्रा.भोसले यांनी म्हटले आहे.

==सशस्त्र चळवळ==
==ऑपरेशन पोलो - पोलिस कारवाई==
{{मुख्यलेख|ऑपरेशन पोलो}}

==स्वातंत्र्य सैनिक==
===डॉ. [[अघोरनाथ चटोपाध्याय]]===
अघोरनाथ इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले. त्यांचा हैदराबाद संस्थानाच्या सामाजिक, राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता. .डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद संस्थानातील राजकीय नेते, लेखक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्यक्तींना एकत्र आणले. ते इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथून निवृत्त झाले. त्यांचा देहान्त इ.स.१९१५ मध्ये झाला. समाजाला दिलेले त्यांचे योगदान अद्वितीय होते.

===[[केशवराव कोरटकर]]===
[[परभणी]] जिल्ह्यातील [[वसमत]]येथे १८६७ साली कोरटकरांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील [[गुलबर्गा]] येथे झाले. तेथेच त्यांनी वकिली केली. त्यांचा त्या वेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांशी परिचय होता. महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या मनावर ठसा होता. पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत. १८९६ साली ते हैदराबादेस आले. डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यात झोकून दिले.

===[[भाऊराव भिमाजी पाटील मतसागर]]===
सन १९२३ साली, [[औरंगाबाद]] जिल्ह्याच्या [[वैजापूर]] तालुक्यातील [[जरूळ]] या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी [[मोडी]] लिपी आणि मराठीभाषेसह [[तेलुगू]], [[गुजराथी]], [[उर्दू|ऊर्दू]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून [[इतिहास संशोधन]] केले.

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या [[जरूळ]] येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा [[तिरंगा]] फडकावल्यामुळे [[निजामी राजवटी]]त रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.

[[औरंगाबाद]] येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. [[माणिकचंद पहाडे]] यांच्यावर [[रझाकार]] फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही [[सत्याग्रह]] करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. [[विनायकराव पाटील]] यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. [[धोंडो केशव कर्वे]] यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन [[राष्ट्रपती]] श्री. [[वि. वि. गिरी]] यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली, तसेच तत्कालीन [[पंतप्रधान]] श्रीमती [[इंदिरा गांधी]] यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना [[ताम्रपत्र]] बहाल केले.

कृषिक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन [[राज्यपाल]] [[अली यावर जंग]] यांनी १९७० साली [[शेतीनिष्ठ शेतकरी]] या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन [[पंतप्रधान]] श्रीमती [[सिरीमावो भंडारनायके]] यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी [[पंतप्रधान]] [[राजीव गांधी]], तसेच [[पी. व्ही. नरसिंहराव]] यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.

* [[मुल्ला अब्दुल कयुम खान]]
* [[विजेंद्र काबरा]]
* [[विनायकराव केशवराव कोरटकर]]
* [[फुलचंद गांधी]]
* [[देवीसिंग चव्हाण]]
* [[शंकरराव चव्हाण]]
* [[पी. व्ही. नरसिंहराव]]
* [[भगवंतराव नाईक]]
* [[वामन नाईक]]
* [[गोविंदराव नानल]]
* [[ताराबाई परांजपे]]
* [[रमणभाई पारीख]]
* [[रामचंद्र पिल्लई]]
* [[मुकुंदराव पेडगांवकर]]
* [[दिगंबरराव बिंदू]]
* [[श्यामराव बोधनकर]]
* [[अनंत भालेराव]]
*[[डॉ. मेळकोटे]]
* मोहिब हुसेन-मौलिम ए शफिक पत्राचे संपादक
* [[के.व्ही.रंगारेड्डी]]
* [[बी.रामकृष्ण राव]]
* [[स्वामी रामानंद तीर्थ]]
* [[गोविंदभाई श्रॉफ]]
* [[बी. सत्यनारायण रेड्डी]]
* सय्यद अखिल- हाजार दास्तानचे संपादक


==हैदराबाद राज्यातील साम्यवादी चळवळ==
==हैदराबाद राज्यातील साम्यवादी चळवळ==

००:१४, २७ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

चित्र:Ramanandteerth.jpg
स्वामी रामानंद तीर्थ

हैदराबाद राज्य ब्रिटीश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकून असलेले सर्वांत मोठे स्वायत्त संस्थानिक राज्य होते. या राज्याची व्याप्ती सध्याच्या तेलंगाणा,मराठवाडा,उत्तर कर्नाटक,विदर्भाचा काही भाग भारताच्या दक्षिण मध्य भागात पसरलेली होती. इ.स. १७२४ पासून इ.स. १९४८ पर्यंत निजाम हैदराबाद राज्याचे संस्थानिक होते.स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ हैदराबाद मुक्ति संग्रामाची परिणती इ.स. १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासना विरुद्ध पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले.

भारतातील संस्थानिक राज्ये

ब्रिटीशपूर्व काळात भारतात अनेक महाराजे, बादशाह तर असंख्य राजे-राजवाडे, सरदार, अगणित जहागिरदार, जमिनदार होते. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या युरोपियन व्यापारी कंपन्यांनी अल्पावधीत भारतीय राज्ये हडपण्यास सुरवात केली. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने, व्यापारा करीता तत्कालिन मोगल बादशहा जहांगिर कडून खास परवाने मिळवून डच आणि पोर्तुगिजांवर व्यापारात मात केली तर फ्रेंचाना युद्धात पछाडले.

ब्रिटीश इस्ट ईंडीया कंपनीने फायदेशीर व्यपारामुळे आर्थिक संपन्नता मिळाली. मोठी कुशल फौज बाळगणे सोपे होत गेले. दिल्लीच्या बादशहांची वेळोवेळी मर्जी मिळत गेली. विविध राजवटींचे आपापसातले संघर्ष चातुर्याने स्वतःच्या फायद्या साठी वापरुन अनेक छोटी मोठी राज्ये गिळंकृत केली. बऱ्याचशा राजांशी तह करून जमेल तेथे प्रत्यक्ष नाही जमेल तेथे अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण केले. तरीसुद्धा इ.स. १९४७ पर्यंत ६०० पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थानिक राज्ये भारतात होती. या संस्थानिकांना अंतर्गत प्रशासना संदर्भात मर्यादित स्वायत्तता होती मात्र सार्वभौमत्व ब्रिटीशांचे होते. या संस्थानिक राज्यांमध्ये सर्वांत मोठे निजामाचे हैदराबाद संस्थान होते.

हैदराबाद संस्थान

भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या परिपेक्षात हैदराबाद राज्य

इ.स. १८८५ साली कॉंग्रेस ची स्थापना झाल्या नंतर जनमत कॉंग्रेसला अनुकुल होते. कॉंग्रेसच्या राजकीय जागृतीच्या कामांना पाठींबा देणाऱ्यात डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, मुल्ला अब्दुल कय्युम, रामचंद्र पिल्लई, मौलिम ए शफिक पत्राचे संपादक मोहिब हुसेन, हाजार दास्तानचे संपादक सय्यद अखिल यांचा समावेश होता. इंग्रजांच्या चुकीच्या शासकीय आणि अवैध धोरणांचा निषेध केला. अर्थातच सर सय्य्द अहमदच्या प्रभावाखालील निजाम शासनात उंच हुद्दांवर बसलेल्या हितसंबधीयांनी कॉंग्रेसचा विरोध करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे सर सय्य्द अहमदच्या राजकीय व शैक्षणिक व्यापांना प्रोत्साहन आणि कॉंग्रेसचे पाठीराख्यांचे खच्चीकरण असे निजाम शासनाचे धोरण कायम राहीले. इ.स. १८९१ मध्ये वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. निजाम शासनास न जुमानणाऱ्या शौकत-उल-इस्लाम सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली गेली.

हैदराबाद राज्यातील सामाजिक आणि राजकीय जागृती

लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हैदराबादेत शालिबंडा येथे शिवराम शास्त्री गोरे यांनी तर चादरघाट येथे विद्यार्थ्यांनी केली. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सव इतर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण हैदराबाद राज्यात साजरा होऊ लागला. सार्वजनिक गणेशोत्सवाने सामाजिक चेतना निर्माण होण्यास मोठीच मदत झाली. आर्य समाजास डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, गुलबर्ग्याचे केशवराव कोरटकर व पंडित श्रीपाद सातवळेकर यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्या धडाडीने हाती घेतले. मुल्ला अब्दुल कयुम खानांनी इ.स. १८९२मध्ये हैदराबाद मध्यवर्ती वाचनालयाची स्थापना केली. इ.स. १८९१मध्ये, दैरत उल मौरिफ या संशोधनसंस्थेची स्थापना केली व अरेबिक भाषेसंबधांत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. काँग्रेसला फक्त जोरदार पाठिंबाच दिला नाही ,तर इ.स. १९०५च्या स्वदेशी आंदोलनात खानांनी सहभागही घेतला; व गणेशोत्सवासही प्रोत्साहन दिले. मौलवी मोहमद अकबर अली, मौलवी मोहमद मजहर, इत्यादी लोकांना प्रोत्साहन देऊन मुल्ला अब्दुल कयुम खानांनी पुरोगामी विचारांची अंजुमन ए मारीफ नावाची संस्था सुरू केली. मौलवी मोहमद अकबर यांनी अली सहिफा नावाचे वृत्तपत्र संपादित केले.

इ.स. १८९८ मध्ये पुण्याच्या रॅन्ड खून खटल्यातील क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकरांना ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ हैदराबाद संस्थानातील लोकांनी लपवून ठेवले. पण निजाम पोलिसांनी त्यांना ब्रिटिशांच्या स्वाधीन केले व बदल्यात शाबासकी मिळवली.

निजाम पोलिसांनी रावसाहेब ऊर्फ बाबासाहेब या क्रांतिकारकास इ.स. १८९८-इ.स. १८९९मध्ये फाशी दिले आणि ब्रिटिशांकडून कौतुक करून घेतले.

स्वदेशी चळवळ

खिलाफत

हैदराबाद राज्यातील साम्यवादी चळवळ

निजामाच्या जहागीरदार, जमीनदार आणि सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध १९४६ साली तेलंगाणातील नालगोंडा जिल्ह्यातील चितल्ल्या ऐलम्मा या दलित महिलेने चळवळ सुरू केली. जमीनदाराकडून आपली अनधिकृतपणे बळकावली जाणारी जमीन वाचवण्याकरिता तिने जमीनदारांविरुद्ध आंदोलनाची सुरवात केली. या महिलेस आंध्रमहासभा नावाच्या तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मदत होती. १९४६ ते १९५१ या काळात झालेले हे सशस्त्र आंदोलन वेट्टी चेकिरी उद्यमम नावाने ओळखले जाऊ लागले. हे आंदोलन जवळच्या बिदर आणि वरंगळ सकट चार हजार खेड्यांत पसरले जवळपास तीन हजार खेड्यांची जमीनदारांपासून मुक्तता करणाऱ्या या आंदोलनास लवकरच निजामाच्या जुलमी रझाकार सेनेशी दोन हात करावयास लागले.

[१]

हैदराबाद राज्यातील आर्य समाज चळवळ

[[इ.स. १८९२] मध्ये स्वामी गिरानंद सरस्वतींनी सुधारणावादी आर्य समाजाची ओळख हैदराबाद येथील हिंदु समाजाला करून दिली व सनातन हिंदु मार्तंडांशी धर्म चर्चा केली. काही आर्य समाजींना हैदराबाद संस्थानातून हद्दपार करण्यात आले.

हैदराबाद राज्यातील दलित चळवळ

हैदराबाद स्टेट कॉंग्रेस

हैदराबाद मुक्तिसंग्राम

हैदराबाद राज्य १९०९
’काळोखातील अग्निशिखा’ने रजाकारा विरुद्धचा लढा जिवंत केला -द .ता.भोसले पंढरपूर यांचे प्रतिपादन......!

कलहालीतील स्वातंत्र्य संग्राम अतिशय तेजस्वी असतानाही आम्हा पश्चिम महाराष्ट्रातील मंडळीना हा लोकोत्तर संग्राम पुरेसा ठाऊक नाही. रझाकारांनी ३५०० सैनिकांसह गढीला घातलेला वेढा आणि केलेला हिंसाचार आणि रझाकारांविरुद्ध जिवावर उदार होऊन लढणाऱ्या आप्पासाहेब नाईक व अन्य सैनिकांनी प्राणपणाने लढलेला लढा अनेकांना नीटसा माहित नाही, याचे नवल वाटते. परंतु रझाकारांविरुद्धचा हा लढा नरेंद्र नाईकांनी आपल्या' काळोखातील अग्निशिखा’ या कादंबरीतून जिवंत केला आहे, असे मत प्रा.द.ता.भोसले यांनी व्यक्त केले.

नरेंद्र नाईक लिखित ' काळोखातील अग्निशिखा' कादंबरीविषयी प्रा.द.ता.भोसले पुढे म्हणाले की कलहाली येथील रझाकारांविरुद्धच्या या लढ्याला किंबहुना या ऐतिहासिक सत्याला नाईकांनी दिलेले वाङ्मयीन सत्याचे रूप कलादृष्ट्या श्रेष्ठ आहे.

खरेतर ऐतिहासिक कादंबरीलेखन खूप अवघड असते. सत्यनिष्ठा, प्रसंगांची निवड, तटस्थवृत्ती, वातावरण निर्मितीसाठीचे तादात्म्य आणि सुक्षमता, पात्रांचे सजीव चित्रण, खास ऐतिहासिक भाषा, प्रवाही संवाद आणि शब्दांत न मावणारा संग्राम शब्दांत पकडणे अतिशय कठीण असते. परंतु या सर्व कसोट्या ’काळोखातील अग्निशिखा’ने उत्तम प्रकारे पार पाडल्या आहेत.

त्यामुळे नरेंद्र नाईकांची ’काळोखातील अग्निशिखा’ ही पहिलीच कादंबरी असली तरी गुणाने ती पहिल्या नंबरची आहे, असे मतही प्रा. द. ता.भोसले यांनी व्यक्त केले. ’काळोखातील अग्निशिखा’तील आप्पासाहेब नाईकांचे व्यक्तिचित्रण त्यांची देशभक्ती, संघटन-कौशल्य, सत्यनिष्ठा आणि गरीबांविषयीचा कळवळा या गुणामुळे उजळून निघाले आहे, असेही प्रा.भोसले यांनी म्हटले आहे.

सशस्त्र चळवळ

ऑपरेशन पोलो - पोलिस कारवाई

मुख्य पान: ऑपरेशन पोलो

स्वातंत्र्य सैनिक

डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय

अघोरनाथ इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले. त्यांचा हैदराबाद संस्थानाच्या सामाजिक, राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता. .डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद संस्थानातील राजकीय नेते, लेखक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञ व्यक्तींना एकत्र आणले. ते इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथून निवृत्त झाले. त्यांचा देहान्त इ.स.१९१५ मध्ये झाला. समाजाला दिलेले त्यांचे योगदान अद्वितीय होते.

केशवराव कोरटकर

परभणी जिल्ह्यातील वसमतयेथे १८६७ साली कोरटकरांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाले. तेथेच त्यांनी वकिली केली. त्यांचा त्या वेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांशी परिचय होता. महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या मनावर ठसा होता. पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत. १८९६ साली ते हैदराबादेस आले. डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यात झोकून दिले.

भाऊराव भिमाजी पाटील मतसागर

सन १९२३ साली, औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मोडी लिपी आणि मराठीभाषेसह तेलुगू, गुजराथी, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.

औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ताम्रपत्र बहाल केले.

कृषिक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.

हैदराबाद राज्यातील साम्यवादी चळवळ

निजामाच्या जहागिरदार , जमिनदार आणि सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध १९४६ साली तेलंगाणातील नलगोंडा जिल्ह्यातील चितल्ल्या ऐलम्मा या दलित महिलेने जमिनदाराकडून आपली अनधिकृतपणे बळकावली जाणारी जमिन वाचवण्याकरिता जमिनदारांविरुद्ध आंदोलनाची सुरवात केली, यास तत्कालीन आंध्रमहासभा नावाने तत्कालीन भारतीय कम्यूनिस्ट पक्षाची पाठराखण होती,१९४६ ते १९५१ या काळात झालेले हें सशस्त्र आंदोलन वेट्टी चेकिरि उद्यमम नावाने परिचीत झाले. .हे आंदोलन जवळच्या बिदर आणि वरंगल मिळून चार हजार खेड्यात पसरले जवळपास तीन हजार खेड्यांची जमिनदारामपासून मुक्तता करणारे आंदोलनास लवकरच निझामाच्या जुलमी रझाकार सेनेशी दोन हात करावयास लागले.

[२]

हैदराबाद राज्यातील आर्य समाज चळवळ

इ.स. १८९२ मध्ये स्वांमी गिरांनंद सरस्वतींनी सुधारणा वादी आर्य समाजाची ओळख हैदराबाद येथिल हिंदु समाजाला करून दिली व सनातन हिंदु मार्तंडांशी धर्म चर्चा केली.काही आर्य समाजींना हैदराबाद राज्यातुन हद्दपार करण्यात आले.

हैदराबाद राज्यातील दलित चळवळ

हैदराबाद स्टेट कॉंग्रेस

हैदराबाद मुक्तिसंग्राम

हैदराबाद राज्य १९०९

सशस्त्र चळवळ

ऑपरेशन पोलो - पोलिस कारवाई

मुख्य पान: ऑपरेशन पोलो

स्वातंत्र्य सैनिक

डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय

इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले.डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांचा हैदराबाद राज्या च्या सामाजिक ,राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता.त्यांचे योगदान अद्वितीय होते.डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद राज्यातील राजकिय नेते,लेखक,समाज सुधारक,विवीध क्षेत्रातील तज्ञ व्यक्‍तिंना एकत्र आणले ,प्रोत्साहन दिले.इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथुन निवृत्त झाले. त्यांचा देहांत इ.स.१९१५ मध्ये झाला.

केशवराव कोरटकर

१८६७ साली परभणीजिल्ह्यातील वसमतयेथे त्यांचा जन्म झाला .त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे त्यांनी वकिली केली. त्या वेळ्च्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकिय नेत्यांचा परिचय होता, महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या वर ठसा होता.पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत.१८९६ साली ते हैदराबादेस आले.डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी सवत:ला सामाजिक व राजकिय कार्यात झोकुन दिले.

भाऊराव भिमाजी पाटील मतसागर

सन १९२३ साली औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मराठीभाषेसोबतच इतर विविध (मोडी, तेलुगू, गुजराथी, ऊर्दू, इंग्रजी इ.) भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या, त्याचबरोबर पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. आपल्या जरुळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होवुन बेशुद्ध होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही. औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्विकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्यात त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटीकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरूंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल ताम्रपत्र बहाल केले. कृषीक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेवून दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रिलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषीक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देवुन गौरविले होते. या थोर व्यक्तिमत्वाचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.

[१]

वृत्तपत्रे

संदर्भ

  1. ^ Telangana Rebellion. (2011, April 3). इंग्रजी भाषी विकिपीडियात . 18:32, May 15, 2011,ला from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Telangana_Rebellion&oldid=422065366 जसे दिसले
  2. ^ Telangana Rebellion. (2011, April 3). इंग्रजी भाषी विकिपीडियात . 18:32, May 15, 2011,ला from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Telangana_Rebellion&oldid=422065366 जसे दिसले
  • Marathwada Under the Nizams by P.V. Kate

Publisher: Mittal Publication, New Delhi Date Published: 1987 [२]

बाह्य दुवे