भात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसाममधील भातशेती

भात हे भारत देशातील प्रमुख अन्न मानले जाते.[१]पाणी घालून शिजवलेल्या तांदळास भात असे म्हणतात. महाराष्ट्रात , गोव्यात काही प्रदेशात भाताचा उल्लेख तांदूळ या अर्थाने पण होतो. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी-कोकण, तसेच भंडारा, चंद्रपूर गोंदिया, गडचिरोली हे प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख अन्न आहे.[२] कोकण प्रांतात प्रामुख्याने शेती पावसाळ्यात केेली जाते.

भोजनात समावेश[संपादन]

मसाले भात

भात शिजतानाचे आधणाचे (गरम) पाणी काढतात, त्यास पेज असे म्हणतात गोवा राज्यात भाताची पेज खाल्ली जाते.

भाताबरोबर वरण (डाळ), आमटी, सांबार, पातळ पालेभाजी, दूध, दही इ. पदार्थ खाल्ले जातात.

खिचडी, चित्रान्न, नारळी भात, पुलाव, बिर्याणी,मसाले भात, गोळाभात हे भातापासून केले जाणारे वेगवेगळे पदार्थ आहेत.
भातापासून खीर,लाडू इत्यादी पदार्थसुद्धा केले जातात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ author/lokmat-news-network (2021-05-26). "भात पेरणीची लगबग". Lokmat. 2021-05-27 रोजी पाहिले.
  2. ^ author/lokmat-news-network (2020-06-25). "बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग". Lokmat. 2021-05-27 रोजी पाहिले.