Jump to content

वत्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

वत्स हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

[संपादन]

वत्स राज्य हे यमुनेच्या खोऱ्यात व अलाहाबादच्या परिसरात होते.

  • कोसाम, कौशाली किंवा कौशांबी ही याची राजधानी होती.

राजे व राज्यकर्ते

[संपादन]

उदयन हा राजा याठिकाणी राज्य करीत होता. यौगंधरायण हा मुत्सद्दी मंत्री उदयनच्या दरबारात होता. उदयनने काशी, बंगालकलिंगचे राज्य जिंकून घेतलेले होते.

उदयन राजाविषयी कथा

[संपादन]

उदयन हा पराक्रमी राजा होता. त्याचा राजकीय प्रभाव अवंतीच्या चंडप्रद्योताला सहन झाला नाही. उदयनला नामोहरम करण्याचे चंडप्रद्योताचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. उदयन राजाला रानटी हत्ती माणसाळविण्याची कला अवगत होती.

  • ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून चंडप्रद्योताने लाकडी हत्तीमध्ये सैन्य पाठवून विश्वासघाताने उदयनला कैद केले.
    • मात्र शेवटी आपली मुलगी वासवदत्ता ही उदयनला दिली.

अशी कथा बौद्ध ग्रंथात व भासाच्या प्रतिज्ञायौगंधरायण व स्वप्नवासवदत्ता या संस्कृत नाटकात वर्णिलेली आहे.

संकिर्ण

[संपादन]

उदयन हा बौद्ध धर्माभिमानी होता आणि त्याने धर्मप्रसारासाठी प्रयत्नही केले. शेवटी वत्स राज्य मगधाने जिंकून घेतले.