"मूळव्याध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात [[गुदद्वार|गुदद्वाराच्या]] सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत [[ठणका|ठणकल्यागत]] वेदना होते. क्वचित [[रक्तस्त्राव]] पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती माडे रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग [[संग्रहणी]] हा रोग पण होउ शकतो.{{संदर्भ}} या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण [[पचनसंस्था|पचनसंस्थेशी]] आहे. |
यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात [[गुदद्वार|गुदद्वाराच्या]] सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत [[ठणका|ठणकल्यागत]] वेदना होते. क्वचित [[रक्तस्त्राव]] पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती माडे रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग [[संग्रहणी]] हा रोग पण होउ शकतो.{{संदर्भ}} या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण [[पचनसंस्था|पचनसंस्थेशी]] आहे. |
||
[[भारत|भारतात]] आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. |
[[भारत|भारतात]] आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी [[२० नोव्हेंबर]] हा दिवस जगभर [[जागतिक मूळव्याध दिन]] म्हणून साजरा होत असतो. |
||
==पूर्वरुप== |
==पूर्वरुप== |
२२:११, १० जानेवारी २०१८ ची आवृत्ती
मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये 'अर्श' असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – यात विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध) व रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध). या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्ती माडे रक्त कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो.[ संदर्भ हवा ] या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.
भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो.
पूर्वरुप
सूज येणे,अग्निमांद्य,अन्न न पचणे,बलहानी,पोटात गुडगुड आवाज येणे,पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे,गुडघेदुखी इत्यादी.[ संदर्भ हवा ]
कारणे
संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे,वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे,अति तिखट सेवन,सतत बैठे काम, व्यायाम,अनियमित दिनचर्या,रक्तदोष, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबी इत्यादी. गुदद्वारावर जोर देणे. मल अवस्थ्म्भा [ संदर्भ हवा ] अती उश्ण वातावरणात होण्याचि शक्य्ता
उपचार
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपुर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविल्या जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात.ऍलोपॅथी मध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.[ संदर्भ हवा ] .या रोगात पथ्य फारच जरुरी आहे.[ संदर्भ हवा ]
- सुरणाचा कंद आणुन त्याची वरची साल काढून टाकावी.आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचर्या करून त्या गाईच्या तुपात परताव्या व खाव्यात.यात मीठ टाकु नये.नंतर अधुन मधुन ही भाजी खात जावी.[ संदर्भ हवा ]
- मीठ खाउ नये. सैंधव मीठ थोडे खावे.[ संदर्भ हवा ]
- रात्री एका वाटीत १ चमचा तुप गरम करुन, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालुन ते प्यावे.सकाळी त्रास कमी होतो.[ संदर्भ हवा ]
- ताजे लोणी खावे.ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे.)[ संदर्भ हवा ]
- रक्त मूळव्याधीवर निरंजनचे फळ आणुन ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे.सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे.असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)[ संदर्भ हवा ]
- इसबगोल चा भूसा आणुन त्यात पाणी घालुन रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळुन प्यावे.[ संदर्भ हवा ]
- उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |