विजयनगर (जव्हार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?विजयनगर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .२९३२४ चौ. किमी
जवळचे शहर जव्हार
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,३२५ (२०११)
• ४,५१८/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा आदिवासी वारली,कोकणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०३
• +०२५२०
• एमएच४८

विजयनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

जव्हार बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ने गेल्यावर पुढे डहाणू मार्गाने गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कासटवाडी शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १३ किमी अंतरावर आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७८ कुटुंबे राहतात. एकूण १३२५ लोकसंख्येपैकी ६४५ पुरुष तर ६८० महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.९१ आहे तर स्त्री साक्षरता ५६.१० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.८५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे[संपादन]

गंगापूर, धानोशी, जुनी जव्हार, कशिवली ,डेंगाचीमेट, शिरोशी, वाळवंडे, कडाचीमेट, साकुर, आखर, कौलाळे, शिरसगाव ही जवळपासची गावे आहेत.खुडेद ग्रामपंचायतीमध्ये खुडेद आणि विजयनगर गावे येतात.

विजयनगर बद्दल[संपादन]

पालघर जिल्ह्यातील विजयनगर हे गाव आहे या गावात बिरारीपाडा, माऊलीपाडा, बोरसेपाडा, जाधवपाडा, बरफपाडा या पाड्यांचा सामावेश आहे. हा गावात शंभर टक्के लोक आदिवासी आहेत. त्यामुळे या गावात परंपरेने चालत आलेल्या चालीरीती, सन,नृत्य, साजरे केले जातात.

१)अखाती-

पाऊस पडण्याआधी पेरणीसाठी ठेवलेले बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी साठी प्रत्येकाच्या घरी गऊर( गौरी) पेरली जाते. धान्य ( भात,नागली, वाकी ( ज्वारी)इतर धान्य पेरतात.

२)कांबड नाच-

पावसाळा सुरू होऊन काही दिवसानंतर पावसाने दांडी मारली की हे नृत्य केले जाते. कांबड नाच केला की पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे. शिवाय कौळी भाजी ज्या दिवशी खाल्ली जाते त्या दिवशी हे नृत्य केले जाते.

संदर्भ[संपादन]

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/