"ताराबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७: ओळ ३७:


==छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूअगोदर==
==छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूअगोदर==
[[छत्रपती ताराराणी भोसले]] यांचा जन्म १६७५ साली झाला. त्यांचे वडील म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. ताराबाईंचे .लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले.२५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या.९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.
[[छत्रपती ताराराणी भोसले]] यांचा जन्म १६७५ साली झाला. त्यांचे वडील म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या.९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.


==राजकीय परिस्थिती==
==राजकीय परिस्थिती==
सन [[2000]] साली [[जिंजी]] मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च 2003 रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सुत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये [[बाळाजी विश्वनाथ]], उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, [[कान्होजी आंग्रे]] आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन 2005 साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून [[कारंजा]] ही राजधानी बनविली.
सन १७०० साली [[जिंजी]] मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये [[बाळाजी विश्वनाथ]], उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, [[कान्होजी आंग्रे]] आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७0५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून [[कारंजा]] ही राजधानी बनविली.


==कारकीर्द==
==कारकीर्द==
ओळ ४८: ओळ ४८:


==यादवी==
==यादवी==
वास्तविक सन १७०० साली [[छत्रपती राजाराम]] महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संन्हाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा [[शिवाजी दुसरा|शिवाजी]] ह्याला गादीवर बसवले.
वास्तविक सन १७०३ साली [[छत्रपती राजाराम]] महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संभाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा [[शिवाजी दुसरा|शिवाजी]] ह्याला गादीवर बसवले.


सन १७०७ साली औरंगजेबाचा [[औरंगाबाद]]जवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात [[खेड]]-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.अशारीतीने ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले.शाहूच्या पक्षात गेलेले [[बाळाजी विश्वनाथ]] यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, [[कान्होजी आंग्रे]] आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले.त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी साताऱ्याहून माघार घेऊन, [[कोल्हापूर]] येथे वेगळी गादी स्थापन केली.
सन १७०७ साली औरंगजेबाचा [[औरंगाबाद]]जवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात [[खेड]]-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.


इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी ताराबाईंचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराबाईने पन्हाळा हस्तगत करून १७१० मध्ये शिवाजी प्रथम (कोल्हापूर) सार्वभौम राजे म्हणून जाहीर करून कोल्हापूरच्या स्वतंत्र राज्याची द्वाही फिरविली.
सन १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले.या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे निधन झाले. त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.

मधल्या काळात ताराबाईंच्या स्वभावामुळे कान्होजी आंग्रे, सिधोजी घोरपडे, दमाजी थोरात वगरे प्रमुख सेनानी कोल्हापूर सोडून शाहू महाराजांच्या पक्षात गेले. तसेच राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या गटाची ताराबाईंशी धुसफूस चालूच होती. या काळात कोल्हापूर राज्यात रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखा कर्तबगार, निष्ठावान पुरुष दुसरा कोणीही नव्हता. १७१० सालानंतरच्या राज्यातल्या एकंदर परिस्थितीमुळे रामचंद्रपंतांना ताराबाई आणि शिवाजी यांच्या शासनाखालील राज्याचे भवितव्य सुरक्षित वाटेना. त्यांनी इतर जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्याने सप्टेंबर १७१४ मध्ये कोल्हापूर राज्यात सत्तांतर घडवून आणले. ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले [[बाळाजी विश्वनाथ]] यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, [[कान्होजी आंग्रे]] आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, [[कोल्हापूर]] येथे वेगळी गादी स्थापन केली.

सन १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्‍नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे (दुसर्‍या शिवाजीचे) निधन झाले. त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.


पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.
पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.

संभाजी (कोल्हापूर) याची राजकीय कारकीर्द इ.स. १७१४ ते १७६० अशी झाली. संभाजी महाराज (कोल्हापूर) आणि शाहू महाराज यांच्या फौजांमध्ये चार लढाया झाल्या. शेवटची लढाई १७३१ मध्ये होऊन कोल्हापूरच्या फौजेचा वारणेच्या काठी पराभव झाला.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.


कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।<br />
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।<br />
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।<br />
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।



१७:०१, ३ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती


ताराबाई भोसले
छत्रपती ताराराणी भोसले
अधिकारकाळ १७०० - १७०७
राज्याभिषेक १७००
राज्यव्याप्ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण,दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानी पन्हाळा
पूर्ण नाव ताराबाई राजाराम भोसले
जन्म १६७५
मृत्यू १७६१
सातारा
पूर्वाधिकारी राजाराम भोसले
उत्तराधिकारी शाहू भोसले
वडील हंबीरराव मोहिते
राजघराणे भोसले, सिसोदिया(भोसावत)
चलन होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत.

छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूअगोदर

छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली झाला. त्यांचे वडील म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३-८४ च्या सुमारास झाले. २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी रायगडास वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई, राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली त्या तिघी जिंजीला पोहचल्या.९ जून १६९६ रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला.

राजकीय परिस्थिती

सन १७०० साली जिंजी मोगलांच्या ताब्यात आली. पण तत्पूर्वी राजाराम जिंजीहून निसटून महाराष्ट्रात परतले. ताराबाई व इतर लोक मात्र मोगलांचा सेनापती जुल्फिखारखान यांच्या तावडीत सापडले. पण जुल्फिखारखानने सर्वांची मुक्तता केली. २ मार्च १७०३ रोजी छत्रपती राजाराम यांचा सिंहगड किल्ल्यावर मृत्यू झाल्यानंतर मराठी साम्राज्याची सूत्रे ताराबाईंच्या हाती आली. त्यांच्या सैन्यामध्ये बाळाजी विश्वनाथ, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी मात्तबर सेनानी होते. त्यांनी मोगलांची पळता भुई थोडी अशी अवस्था केली. सन १७0५ साली त्यांनी मोगलांच्या ताब्यातील पन्हाळा किल्ला जिंकून कारंजा ही राजधानी बनविली.

कारकीर्द

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. मराठा सैन्यातले शूर सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या साथीने महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या मोगल सैन्याला सतत हुलकावणी दिली.

सन १७०५ मध्ये मराठी फौजा नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात शिरल्या आणि मोगल फौजांना त्यांनी खडे चारले. त्या जिंकलेल्या प्रांतांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.

यादवी

वास्तविक सन १७०३ साली छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकार संभाजीपुत्र शाहूकडे जायला हवे होते. पण शाहूराजे त्यावेळी वयाने खूपच लहान होते आणि मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे महाराणी ताराबाईंनी आपला मुलगा शिवाजी ह्याला गादीवर बसवले.

सन १७०७ साली औरंगजेबाचा औरंगाबादजवळ मृत्यू झाला. त्यानंतर मोगलांनी मराठी राज्यात भाऊबंदकी सुरू व्हावी म्हणून शाहूंची सुटका केली आणि त्यांच्या डोक्यात ह्या उत्तराधिकाराचे बीज पेरले. परिणामी, ताराबाई व शाहू यांच्यात वारसाहक्कासाठी संघर्ष सुरू झाला. १२ ऑक्टोबर १७०७ रोजी ताराराणी व शाहू यांच्यात खेड-कडूस येथे लढाई झाली त्यात शाहूंचा विजय झाला.

इ.स. १७०८ मध्ये शाहू महाराजांनी ताराबाईंचा पन्हाळा घेतला; परंतु पुढच्या चारच महिन्यांत सावंतवाडीच्या खेम सावंताच्या मदतीने ताराबाईने पन्हाळा हस्तगत करून १७१० मध्ये शिवाजी प्रथम (कोल्हापूर) सार्वभौम राजे म्हणून जाहीर करून कोल्हापूरच्या स्वतंत्र राज्याची द्वाही फिरविली.

मधल्या काळात ताराबाईंच्या स्वभावामुळे कान्होजी आंग्रे, सिधोजी घोरपडे, दमाजी थोरात वगरे प्रमुख सेनानी कोल्हापूर सोडून शाहू महाराजांच्या पक्षात गेले. तसेच राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांच्या गटाची ताराबाईंशी धुसफूस चालूच होती. या काळात कोल्हापूर राज्यात रामचंद्रपंत अमात्य यांच्यासारखा कर्तबगार, निष्ठावान पुरुष दुसरा कोणीही नव्हता. १७१० सालानंतरच्या राज्यातल्या एकंदर परिस्थितीमुळे रामचंद्रपंतांना ताराबाई आणि शिवाजी यांच्या शासनाखालील राज्याचे भवितव्य सुरक्षित वाटेना. त्यांनी इतर जबाबदार व्यक्तींच्या सल्ल्याने सप्टेंबर १७१४ मध्ये कोल्हापूर राज्यात सत्तांतर घडवून आणले. ताराराणीने जिंकलेले सर्व किल्ले शाहूला आपसूकच मिळाले. शाहूच्या पक्षात गेलेले बाळाजी विश्वनाथ यांनी ताराराणीच्या पक्षातील उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे आदी सेनानींना शाहूच्या बाजूला वळवून घेतले. त्यामुळे शाहूचा पक्ष बळकट झाला. शाहूंनी सातार्‍याला गादीची स्थापना केली आणि महाराणी ताराबाईंनी सातार्‍याहून माघार घेऊन, कोल्हापूर येथे वेगळी गादी स्थापन केली.

सन १७१४ साली कोल्हापूरच्या राजमहालात झालेल्या घडामोडींनंतर राजाराम यांची दुसरी पत्‍नी राजसबाई यांनी आपला मुलगा दुसरा संभाजी यांस कोल्हापूरच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा पुत्र दुसरा शिवाजी यांस बंदी बनवून कैद केले. या कैदेमध्येच ताराराणीच्या पुत्राचे (दुसर्‍या शिवाजीचे) निधन झाले. त्यानंतर वारणेला झालेल्या दिलजमाईनुसार शाहूराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली आणि मराठी साम्राज्यात सातारा व कोल्हापूर अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या.

पुढे शाहूच्या मध्यस्थीने ताराबाईंची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर त्या सातारा येथे राहावयास गेल्या. शाहूंना पुत्र नसल्यामुळे त्यांनी ताराबाईंचा नातू रामराजा यांस दत्तक घेतले. ताराबाईंचे निधन ९ डिसेंबर १७६१ रोजी झाले.

संभाजी (कोल्हापूर) याची राजकीय कारकीर्द इ.स. १७१४ ते १७६० अशी झाली. संभाजी महाराज (कोल्हापूर) आणि शाहू महाराज यांच्या फौजांमध्ये चार लढाया झाल्या. शेवटची लढाई १७३१ मध्ये होऊन कोल्हापूरच्या फौजेचा वारणेच्या काठी पराभव झाला.

संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले.

कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.

दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।