महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मन्नू भंडारी या पानावरून पुनर्निर्देशित)

महेंद्रकुमारी सुखसंपतराय भंडारी ऊर्फ मन्नू भंडारी (जन्म : भानुपुरा-मध्य प्रदेश, ३ एप्रिल १९३१ - १५ नोव्हेंबर २०२१) या हिंदी लेखिका आहेत.

मन्नू भंडारी जन्मा ने मारवाडी आहेत. सुधारक वृत्तीचे वडील; घरात खूप मासिके, पुस्तके अशा वातावरणामुळे मन्नूंना वाचनाची, लेखनाची आवड निर्माण झाली. एम.ए. झाल्यावर मन्नू भंडारी यांनी काही काळ कलकत्यात अध्यापन केले आणि नंतर त्या दिल्लीत आल्या आणि १९५० साली त्यांचे लग्न लेखक, समीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी झाले. लग्नानंतरही त्या मन्नू भंडारी याच नावाने लिखाण करीत राहिल्या. १९५०-६० दरम्यान हिंदीत नव्याने रुजू पाहणाऱ्या नवकथेच्या चळवळीच्या काळातल्या त्या आघाडीच्या लेखिका आहेत.

’मैं हार गई’ ही मन्नू भंडारी यांची पहिली कथा. त्यांच्या अनेक कथा वास्तवावर आधारलेल्या आहेत.

मन्नू भंडारी यांच्या कादंबऱ्यांचे आणि कथांचे मराठी, सिंधी, गुजराती, बंगाली, कानडी, उडिया, मल्याळम, तेलुगू आणि इंग्रजी भाषांत अनुवादही झाले आहेत. त्यांच्या महाभोज या नाटकाचे मराठीतही प्रयोग झाले आहेत. अकेली आणि चष्मे या कथांचेही नाट्यरूपांतर झाले आहे. ’त्रिशंकु’ या कथेवर एक दूरदर्शन चित्रपट झाला आहे. मन्नू भंडारी यांनी प्रेमचंद यांच्या निर्मला कादंबरीवर आधारित हिंदी दूरचित्रवाणी मालिकेचे पटकथालेखन केले आहे. चित्रवाणीवरील दर्पण या हिंदी मालिकेसाठी त्यांनी विविध भारतीय भाषांतील दहा कथांचे लेखनही केले आहे.

मन्नू भंडारी यांचे पती कै. राजेंद्र यादव हे हिंदी नवकथेचे आद्य प्रवर्तक, लेखक आणि समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या’एक इंच मुस्कान’ या कादंबरीतील नायिकेचा भाग मन्नू भंडारीयांच्या लेखणीतून उतरला आहे.

मन्नू भंडारी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • आप का बंटी (कादंबरी)
  • एक इंच मुस्कान (कादंबरी, सहलेखक राजेंद्र यादव)
  • एक कहा.....????
  • त्रिशंकु (कथासंग्रह)
  • महाभोज (कादंबरी -१९७९) (आणि नाटक)
  • सौदामिनी (कादंबरी)

मन्नू भंडारी यांचे अन्य लेखन[संपादन]

  • दूरचित्रवाणीवर गाजलेल्या रजनी या मालिकेतल्या टॅक्सीवाल्याचा प्रसंग, नोकरांवरचे अत्याचार, शिक्षणक्षेत्रातील गैरव्यवहार आदींचे लिखाण मन्नूंचे होते.
  • शबाना आझमी[ आणि अमोल पालेकर यांची भूमिका असलेला ’जीना यहॉं’ हा चित्रपट मन्नू भंडारी यांच्या ’एखाने आकाश नाई’ (इथे आकाश नाही) वर आधारित होता.
  • ’रजनीगंधा’ हा चित्रपट त्यांच्या ’यही सच है’ या कथेवरून बनवला होता.
  • त्यांच्या ’सजा’ या कथेचे मराठीत ’शिक्षा’ या नावाने भाषांतर झाले आहे.

मन्नू भंडारी यांच्या गाजलेल्या कथा==

  • अकेली (मराठीत एकटी)
  • एक कहाणी अशीही (आत्मचरित्राचा मराठी अनुवाद)
  • कोण्या एकाचा मृत्यू (मराठी)
  • खोटे सिक्के
  • चष्मे (मराठीतही भाषांतरित)
  • त्रिशंकु
  • यही सच है
  • सजा

पुरस्कार[संपादन]

  • १९७६ च्या आणीबाणीच्या काळातत मन्नू भंडारी यांना देऊ केला गेलेला पद्मश्री हा पुरस्कार त्यांनी नाकारला.
  • ’महाभोज’ या कादंबरीला रामकृष्ण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान पुरस्कार आणि पीपल्स ॲवॉर्ड मिळाले आहे.
  • मन्नू भंडारी यांना हिंदी अकादमी आणि राजस्थान साहित्य अकादमी यांचे पुरस्कार मिळाले आहेत.