"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
रोहन जगताप (चर्चा | योगदान) →वैयक्तिक जीवन: व्याकरण सुधरविले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
रोहन जगताप (चर्चा | योगदान) →अभिनय क्षेत्र: व्याकरण सुधरविले खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ओळ ४१: | ओळ ४१: | ||
==अभिनय क्षेत्र== |
==अभिनय क्षेत्र== |
||
पृथ्वीराज कपूरने लयलपुर आणि पेशावरमधील थिएटर्समध्ये अभिनय |
पृथ्वीराज कपूरने लयलपुर आणि पेशावरमधील थिएटर्समध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९२८ साली, मावशीकडून कर्ज घेऊन ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे ते इंपीरियल फिल्म कंपनीत दाखल झाले. तेथे त्यांनी दो धारी तलवार, सिनेमा गर्ल, शेर-ए-अरब आणि प्रिन्स विजयकुमार ह्या चित्रपटांत अभिनय केला. १९२९ मध्ये त्यांनी आपल्या तिसऱ्या सिनेमात प्रमुख भूमिका निभावली असली तरीही, पृथ्वीराज कपूर यांनी भारताच्या पहिल्या आलम आरा (१९३१) या बोलपटात एक साहाय्यक भूमिका निभावली होती. विद्यापती (१९३७) मधील त्यांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती. सोह्रब मोदी यांच्या सिकंदर (१९४१) मधील अलेक्झांडर द ग्रेट म्हणून त्याचे काम कदाचित सर्वात चांगले आहे. इंग्रजी ग्रेट अँडरसन थिएटर कंपनीतही ते दाखल झाले व त्यासाठी ते मुंबईत एक वर्ष राहिले. या सर्व वर्षांत कपूर नाट्यसृष्टीशी सतत संबंधित राहिले आणि नियमितपणे रंगमंचावर भूमिका करत होते. त्यांनी रंगमंच आणि सिनेमाचा पडदा या दोन्ही ठिकाणी एक बलदंड आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रतिष्ठा मिळवली.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Prithviraj_Kapoor</ref> |
||
==चित्रदालन== |
==चित्रदालन== |
१४:२७, १२ मे २०१९ ची आवृत्ती
पृथ्वीराज कपूर | |
---|---|
पृथ्वीराज कपूर | |
जन्म |
पृथ्वीराज कपूर ३ नोव्हेंबर १९०६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
पृथ्वीराज कपूर हे नाटकांत व चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यांचे तीनही मुलगे अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर आणि यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.
पृथ्वीराज कपूर (जन्म : (३ नोव्हेंबर १९०६; मृत्यू : २९ मे १९७२) हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय जन नाट्य संघ (Indian People's Theatre Association-IPTA-इप्टा) याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी १९४४ मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती. भारतीय सिनेमाक्षेत्रात पुढे नामांकित झालेल्या कपूर खानदानाची ही सुरुवात होती..[१]
पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर पाकिस्तान मधील एडवर्ड कॉलेजमधून उच्च शिक्षण मिळाले. त्यांनी एक वर्षासाठी कायद्याचे शिक्षण घेतले ज्यानंतर ते थिएटर विश्वात गेले. १९२८ मध्ये मुंबई येथे त्यांचे आगमन काही मूकपटांमध्ये काम केल्यानंतर झाले. त्यांनी भारतातील पहिला श्राव्य चित्रपट 'आलम आरा' मध्ये एक प्रमुख भूमिका बजावली.
वैयक्तिक जीवन
पृथ्वीराज कपूर जेंव्हा १७ वर्षांचे होते, तेंव्हा त्यांच्या आई-वडीलांनी त्यांचा विवाह १४ वर्षांच्या रामशरणी मेहरा यांच्याशी केला. लग्न सुसंवादी आणि परंपरागत होते.
या जोडप्याला छोट्या वयातच १९२७ साली राज कपूर झाले. त्यानंतर पृथ्वीराज मुंबईला स्थायिक झाले, त्यावेळी ते तीन मुलांचे बाप होते. पुढील वर्षी एका आठवड्याच्या अंतरातच पृथ्वीराज कपूर यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील एक मुलगा देवेंद्र (दवेरी) यांचा न्युमोनियाने मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा रवींद्र (बिंदी) एका विचित्र घटनेमुळे विषबाधा झाल्यामुळे मरण पावला.
रामशरणीचा भाऊ जुगल किशोर मेहरा याने नंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला.
अभिनय क्षेत्र
पृथ्वीराज कपूरने लयलपुर आणि पेशावरमधील थिएटर्समध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९२८ साली, मावशीकडून कर्ज घेऊन ते मुंबईत स्थायिक झाले. तेथे ते इंपीरियल फिल्म कंपनीत दाखल झाले. तेथे त्यांनी दो धारी तलवार, सिनेमा गर्ल, शेर-ए-अरब आणि प्रिन्स विजयकुमार ह्या चित्रपटांत अभिनय केला. १९२९ मध्ये त्यांनी आपल्या तिसऱ्या सिनेमात प्रमुख भूमिका निभावली असली तरीही, पृथ्वीराज कपूर यांनी भारताच्या पहिल्या आलम आरा (१९३१) या बोलपटात एक साहाय्यक भूमिका निभावली होती. विद्यापती (१९३७) मधील त्यांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती. सोह्रब मोदी यांच्या सिकंदर (१९४१) मधील अलेक्झांडर द ग्रेट म्हणून त्याचे काम कदाचित सर्वात चांगले आहे. इंग्रजी ग्रेट अँडरसन थिएटर कंपनीतही ते दाखल झाले व त्यासाठी ते मुंबईत एक वर्ष राहिले. या सर्व वर्षांत कपूर नाट्यसृष्टीशी सतत संबंधित राहिले आणि नियमितपणे रंगमंचावर भूमिका करत होते. त्यांनी रंगमंच आणि सिनेमाचा पडदा या दोन्ही ठिकाणी एक बलदंड आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्रतिष्ठा मिळवली.[२]
चित्रदालन
-
पृथ्वीराज कपूर
पुरस्कार आणि चित्रपट
पृथ्वीराज कपूर यांना १९६९ साली कला क्षेत्रात पद्मभूषण देऊन भारत सरकारने सन्मानित केले होते. १९७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला.
पुरस्कार
१९५४ मध्ये पृथ्वीराज कपूर यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देण्यात आली. १९६९ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. आठ वर्षांच्या कालावधीसाठी ते राज्यसभेचे सदस्य राहिले. १९७१ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी मरणोत्तर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ते त्या पुरस्काराचे तिसरे मानकरी होते, भारतीय सिनेमामध्ये त्यांची सर्वाधिक प्रशंसा होत असे.
- १९५४: संगीत नाटक अकादमीची फेलोशिप
- १९५६: संगीत नाटक अकादमी चा पुरस्कार
- १९६९: भारत सरकार कडून पद्मभूषण पुरस्कार
- १९७२: दादासाहेब फाळके पुरस्कार (१९७१)
चित्रपट
- मुग़ल-ए-आज़म (१९६०)
- आवारा (१९५१)
- सिकंदर (१९४१)
- आलमआरा (१९३१)
- विद्यापति (१९३७)
- कल आज और कल (१९७१)