शिरोडा
शिरोडा हे वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, (महाराष्ट्र), भारत येथे दक्षिण कोकणातील एक लहानसे गाव आहे. हे गाव मोठा समुद्रकिनारा,सोनेरी वाळू, साप्ताहिक बाजारपेठ (दर रविवारी ), गणेशोत्सव, खारपट्टी, मत्स्य बाजार, जेट्टी, मिठागर, समुद्रकिनाऱ्यावर सुरूची आणि नारळाच्या बाग, छोट्या डोंगररांगांमध्ये तसेच आंबा आणि काजूच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
या गावात श्रीदेवी माऊली देवस्थानचे प्रतिष्ठित गावदेवता, त्यानंतर दत्त मंदिरे, हनुमान मंदिर आणि गिरोबा मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. शिरोडा-आरवली गावात वेतोबाचे प्रसिद्ध मंदिर आहे. शिरोडा गावचा समुद्रकिनारा आधी वेळागर आणि आता पॅराडाईज बीच म्हणून प्रसिद्ध आहे या किनाऱ्यावर पांढरी- सोनेरी वाळू पर्यटकांना सुखावते. गोव्यापासून अवघ्या ६-७ किलोमीटरवर असलेले हे गावाला विदेशी पर्यटक सुद्धा पसंती दर्शवतात.
खेड्यांची सुरुवातीची ख्याती मराठी साहित्यातील विख्यात व्यक्ती वि. स. खांडेकर यांच्याकडून मिळू शकते,ज्यांनी शिरोडा गावाला अनेक दशकांकरिता आपले कार्यस्थळ बनवले.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात मीठ सत्याग्रह चळवळीच्या वेळी शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहाचा विशेष उल्लेख आढळतो.
हे गाव फिश (मासे) पाककृती आणि विविध मालवणी पदार्थांसाठी देखील प्रसिद्ध आहे, गावातील काही भागात गोवण आणि मालवणी संस्कृतींचा उत्तम मिश्रण मिळू शकतो.
जे.बी.नाईक कपड्यांचे दुकान हे शतकाहूनही जास्त काळ कपड्यांमध्ये व्यवहार करणारी संस्था इथे आहे. बाजारपेठे अनेक दुकानांनी समृद्ध आहे इथले स्थानिक, तसेच गोवन व परदेशी पर्यटक सुद्धा या बाजारपेठेला विशेष पसंती दर्शवतात.


हे गाव गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्र राज्य एस. टी आणि गोवा कदंबा या नियमित बस सेवा इथे उपलब्ध आहे सर्वात जवळचे विमानतळ जरी चिपी (महाराष्ट्र) हवाई तळ असले तरी सध्याचे कार्यात्मक विमानतळ गोव्यात (वास्को-दा-गामा) हे आहे.
| ?शिरोडा महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | वेंगुर्ला |
| जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
| भाषा | मराठी- मालवणी -कोंकणी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४१६५१८ • एमएच/०७ |
भौगोलिक स्थान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते
इतिहास
[संपादन]शिरोडा मिठाचा सत्याग्रह: कोकणात झालेल्या शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रहात खान्देशातील सत्याग्रहींचे मोठे योगदान आहे. या सत्याग्रहात आचार्य शं.द.जावडेकर, त्र्यंबकराव देवगिरीकर, सी.गो.रानडे, डॉ.बाळकृष्ण लागू,डॉ.आठल्ये, विनायक भुस्कुटे, धर्मानंद कोसंबी, परचुरे, सहस्त्रबुद्धे, अ.भा.पंडित, अप्पा नाबर, अप्पासाहेब नाबर, अप्पासाहेब पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले होते. तर साने गुरुजी शिरोड्यास पोहोचले तेव्हा त्यांना कळले की पूर्व खानदेशातील मंडळी आधीच पोहोचली होती. गुरुजींना सत्याग्रहात सामील व्हायचे होते. परंतु पिंपराळे आश्रमातील गोखले हे शिरोडा येथे पोहोचल्यामुळे गोखले यांनी साने गुरुजी आणि वि.ग.कुलकर्णी यांना पैसे जमा करण्यासाठी परत खांनदेशात पाठवले. असा उल्लेख राजा मंगळवेढेकर, साने गुरूंजींची जीवनगाथ, साधना प्रकाशन पुणे, १९७५ यात केला आहे.
वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय - शिरोडा
[संपादन]ज्ञानपीठ पूरस्कार विजेते साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शिरोड्यात स्मृती संग्रहालय उभारण्यात आले आहे. १९२० ते १९३८ या काळात त्यांनी शिरोड्यातील अ.वि.बावडेकर शाळेत शिक्षक म्हणून काम केले. याच काळात त्यांनी अनेक अजरामर कथा, कादंबऱ्या व रूपक कथा लिहिल्या. शिरोडा येथील समुद्रकिनारी ज्या टेकडी वर बसून ते लिहीत, ती जागा आजही 'खांडेकरांची खुर्ची' या नावाने ओळखली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]- शिरोडा वेळागर किनारा / पॅराडाईज बीच
- माउली मंदिर
- वेतोबा मंदिर
- मिठागर
- यशवंत गड
- वि.स. खांडेकर स्मृती संग्रहालय
- वि.स खांडेकर विद्यालय
