"आत्माराम सावंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
* चौथा अंक (अनुभवकथन)
* चौथा अंक (अनुभवकथन)
* खुर्चीचे खेळ (अनुभवकथन)
* खुर्चीचे खेळ (अनुभवकथन)

==आत्माराम सावंत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद|मराठी साहित्य परिषदेचा]] [[गोविंद बल्लाळ देवल]] पुरस्कार
* नाट्यलेखनाकरिता [[आचार्य अत्रे]] पुरस्कार (१९८८)
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद|नाट्यपरिषदेचा]] उत्तम नाट्यसमीक्षेसाठीचा [[वि.स. खांडेकर]] पुरस्कार (१९९०)
* ’आगपेटीतील राक्षस’ या नाटकाला नाट्यदर्पण पुरस्कार व महाराष्ट्र सरकारचा बालनाट्याचा पुरस्कार
* ’सत्तेवरचे शहाणे’ याही नाटकाला नाट्यदर्पणचा पुरस्कार
* ’चौथा अंक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्तम विनोदी पुस्तकाचा [[श्री.कृ. कोल्हटकर]] पुरस्कार
* १९६४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाच्या]] अध्यक्षपदाचा सन्मान.

{{DEFAULTSORT:सावंत, आत्माराम कृष्णाजी}}
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]
[[वर्ग: मराठी लेखक]]
[[वर्ग: मराठी नाटककार]]
[[वर्ग मराठी नाट्य‍अभिनेतेे]]
[[वर्ग:मराठी दिग्दर्शक]]
[[वर्ग: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]





{{विस्तार}}


[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३३ मधील जन्म]]

२१:२८, २१ मे २०१५ ची आवृत्ती

आत्माराम कृष्णाजी सावंत (जन्म : हुमरस अण्हेरी (कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा), ७ मार्च १९३३) हे एक मराठीतले लेखक, नट, नाटककार, दिग्दर्शक, पत्रकार होते. ते कामगार रंगभूमीवरून व्यावसायिक नाटकांत आले.

बालपण कोकणात गेल्यामुळे आत्माराम सावंतांना लहानपणापासून कीर्तनाचीगणपतीत होणार्‍या मेळ्यांची आवड होती. त्यांचेवडील सामान्य शेतकरी होते. त्यांनी आत्मारामला मॅट्रिकपर्यंत शिक्षण देऊन चाकरीसाठी मुंबईला धाडले. मुंबईत आल्यावर आत्माराम सावंत नव्यानेच सुरू झालेल्या कामगार नाट्यस्पर्धेत सहभागी होऊ लागले. इ.स. १९५३ ते इ.स. १९६० या काळात त्यांनी कामगार नाट्यस्पर्धांसाठी अनेक कौटुंबिक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली आणि काही पारितोषिकेही मिळवली.

पत्रकारिता

१९६० ते १९७० या काळात सावंत दैनिक नवाकाळाणि दैनिक मराठामध्ये पत्रकारिता करत होते. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी आपले अनुभवांवर बेतून शब्दबद्ध केलेली ’चौथा अंक’ आणि खुर्चीचा खेळ’ ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. नवशक्ती, नवाकाळ, मराठा आणि मुंबई सकाळ या विविध वृत्तप्त्रांत आत्माराम सावंत यांनी उपसंपादक, सहसंपादक मुख्य संपादक आदी विविध पदांवर काम केले आहे, आणि ते करताना बरेच स्फुट लेखन केले आहे.

१९७०मध्ये आत्माराम सावंत ते परत रंगभूमीकडे वळले. याच काळात त्यांना नाटककार म्हणून अपार लोकप्रियता मिळाली.

आत्माराम कृष्णाजी सावंत यांनी लिहिलेली नाटके

  • आगपेटीतील राक्षस (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९७७)
  • आई म्हणोनी कोणी (व्यावसायिक नाटक)
  • जन्माची गाठ (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • ताठ मानेचा माणूस (व्यावसायिक?)
  • तेथे पाहिजे जातीचे (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • दरोडा (व्यावसायिक नाटक)
  • माझं कुंकू (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • मुजरा घ्या सरकार (व्यावसायिक नाटक)
  • मुलगी (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)
  • वरचा मजला रिकामा (व्यावसायिक नाटक)
  • राजकारण गेलं चुलीत (व्यावसायिक नाटक)
  • सत्तेवरचे शहाणे (नाट्यदर्पण पुरस्कारप्राप्त व्यावसायिक नाटक, १९८८)
  • सासरेबुवा जरा जपून (व्यावसायिक नाटक)
  • सूनबाई (कामगार नाट्यस्पर्धेसाठी लिहिलेले नाटक)

आत्माराम सावंत यांचे अन्य लेखन

  • चौथा अंक (अनुभवकथन)
  • खुर्चीचे खेळ (अनुभवकथन)

आत्माराम सावंत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद|मराठी साहित्य परिषदेचा]] गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार
  • नाट्यलेखनाकरिता आचार्य अत्रे पुरस्कार (१९८८)
  • नाट्यपरिषदेचा उत्तम नाट्यसमीक्षेसाठीचा वि.स. खांडेकर पुरस्कार (१९९०)
  • ’आगपेटीतील राक्षस’ या नाटकाला नाट्यदर्पण पुरस्कार व महाराष्ट्र सरकारचा बालनाट्याचा पुरस्कार
  • ’सत्तेवरचे शहाणे’ याही नाटकाला नाट्यदर्पणचा पुरस्कार
  • ’चौथा अंक’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्तम विनोदी पुस्तकाचा श्री.कृ. कोल्हटकर पुरस्कार
  • १९६४ साली मालवण येथे भरलेल्या ७४व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान.

वर्ग मराठी नाट्य‍अभिनेतेे