"महादेवी वर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८८: ओळ ८८:
* 'ठाकुरजी भोले हैं'
* 'ठाकुरजी भोले हैं'


==पुरस्कार व सम्मान==
==पुरस्कार व सन्मान==
महादेवी वर्मां ना प्रशासनिक, अर्धप्रशासनिक व व्यक्तिगत अशा सगळ्याच संस्थांकडून सन्मानित केले आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना [[पद्मभूषण]] ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य अॅकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरांत [[पद्मविभूषण]] देऊन भूषविले.
महादेवी वर्मां ना प्रशासनिक, अर्धप्रशासनिक व व्यक्तिगत अशा सगळ्याच संस्थांकडून सन्मानित केले आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना [[पद्मभूषण]] ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य अॅकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त [[पद्मविभूषण]] देऊन भूषविले.


सन १९६९ मधे विक्रम विश्वविद्यालय, १९७७ मधे कुमाऊँ विश्वविद्यालय(नैनीताल), १९८० मधे दिल्ली विश्वविद्यालय आणि १९८४ मधे बनारस हिंदू विश्वविद्यालय या संस्थांनी त्यांना डी.लिट. ही उपाधि देऊन सन्मानित केले. ह्या आधी महादेवी वर्मां ना 'नीरजा' साठी १९३४ मधे 'सक्सेरिया पुरस्कार, १९४२ मधे 'स्मृति की रेखाएँ' साठी 'द्विवेदी' पदक मिळाले. 'यामा' नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सम्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला. त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत.
सन १९६९ मधे विक्रम विश्वविद्यालय, १९७७ मधे कुमाऊँ विश्वविद्यालय(नैनीताल), १९८० मधे दिल्ली विश्वविद्यालय आणि १९८४ मधे बनारस हिंदू विश्वविद्यालय या संस्थांनी त्यांना डी.लिट. ही उपाधि देऊन सन्मानित केले. ह्या आधी महादेवी वर्मां ना 'नीरजा' साठी १९३४ मधे 'सक्सेरिया पुरस्कार, १९४२ मधे 'स्मृति की रेखाएँ' साठी 'द्विवेदी' पदक मिळाले. 'यामा' नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला.


त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत.
१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह चीनी भाई' वर 'नील आकाशेर नीचे' नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले.

१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह चीनी भाई' वर 'नील आकाशेर नीचे' नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि... ’या नावाने प्रकाशित झाला आहे.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

००:३१, ९ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

महादेवी वर्मा
जन्म मार्च २६, १९०७
फरुखाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू सप्टेंबर ११, १९८७
अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा हिंदी
साहित्य प्रकार कविता
वडील गोविंद प्रसाद वर्मा
आई हेमरानी देवी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२

महादेवी वर्मा(जन्म : मार्च २६, १९०७ - मृत्यू : सप्टेंबर ११, १९८७) हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे.

प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.

जन्म व शिक्षण

महादेवींचा जन्म २६ मार्च १९०७ ला भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एका गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदुरातल्या मिशन शाळेत सुरू झाले. बरोबरच संस्कृत, इंग्रजी, संगीत आणि चित्रकलेचे शिक्षण शिक्षक घरी येऊन देत असत. १९१९मधे अलाहाबादमधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन हुशार व मेधावी विद्यार्थिनीच्या रूपात पुढे जात जात त्या १९३२मधे अलाहाबाद विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या.

कार्यक्षेत्र

महादेवींचे कार्यक्षेत्र लेखन, संपादन व अध्यापन होते. अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्या काळात हे काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते. ह्या विद्यापीठाच्या त्या प्रधानाचार्य व कुलपगुरू पण होत्या। १९३२मध्ये त्यांनी चाँद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य संपादक झाल्या.

महादेवी वर्मा यांचे साहित्य

पद्य साहित्य
  • 'अग्निरेखा'(१९९०)
  • 'आत्मिका'
  • 'आधुनिक कवि महादेवी'
  • 'गीतपर्व'
  • 'दीपगीत'
  • 'दीपशिखा'(१९४२)
  • 'नीरजा'(१९३४)
  • 'नीलांबरा'
  • 'नीहार'(१९३०)
  • 'परिक्रमा'
  • 'प्रथम आयाम'(१९७४)
  • 'यामा(१९३६)
  • 'रश्मि'(१९३२)
  • 'सप्तपर्णा(अनुवादित -१९५९),
  • 'संधिनी(१९६५)
  • 'सांध्यगीत'(१९३६)
  • 'स्मारिका'
गद्य साहित्य
  • अतीत के चलचित्र(१९४१)
  • मेरा परिवार(१९७२)
  • संभाषण(१९७४)
  • संस्मरण(१९८३)
  • संस्मरणः पथ के साथी(१९५६)
  • स्मृति की रेखाएँ(१९४३)
वैचारिक लेखसंग्रह
  • विवेचनात्मक गद्य(१९४२
  • शृंखला की कड़ियाँ(१९४२)
  • संकल्पिता(१९६९)
  • साहित्यकार की आस्था व निबंध(१९६२)
ललित निबंधः
  • क्षणदा(१९५६)
कथासंग्रह
  • गिल्लू
आठवणी
  • हिमालय(१९६३),
बाल कवितासंग्रह
  • 'आज ख़रीदेंगे हम ज्वाला'
  • 'ठाकुरजी भोले हैं'

पुरस्कार व सन्मान

महादेवी वर्मां ना प्रशासनिक, अर्धप्रशासनिक व व्यक्तिगत अशा सगळ्याच संस्थांकडून सन्मानित केले आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५२ मधे उत्तर प्रदेश विधान परिषदेत त्यांना सदस्य बनविले. १९५६ मधे भारत सरकारने त्यांच्या साहित्यिक सेवेसाठी त्यांना पद्मभूषण ही उपाधी दिली.. १९७९ मधे त्या साहित्य अॅकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य होत. भारत सरकार कडून १९८८ मधे त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देऊन भूषविले.

सन १९६९ मधे विक्रम विश्वविद्यालय, १९७७ मधे कुमाऊँ विश्वविद्यालय(नैनीताल), १९८० मधे दिल्ली विश्वविद्यालय आणि १९८४ मधे बनारस हिंदू विश्वविद्यालय या संस्थांनी त्यांना डी.लिट. ही उपाधि देऊन सन्मानित केले. ह्या आधी महादेवी वर्मां ना 'नीरजा' साठी १९३४ मधे 'सक्सेरिया पुरस्कार, १९४२ मधे 'स्मृति की रेखाएँ' साठी 'द्विवेदी' पदक मिळाले. 'यामा' नामक काव्य संकलनासाठी त्यांना भारत सरकार चा सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला.

त्या भारतामधील ५० यशस्वी महिलांमधील एक होत.

१९६८ मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह चीनी भाई' वर 'नील आकाशेर नीचे' नामक एक बंगाली चित्रपटाची निर्मिती केली. १६ सप्टेंबर १९९१ ला भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले. त्यांच्या अतीत के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि... ’या नावाने प्रकाशित झाला आहे.

बाह्य दुवे

  1. महादेवी वर्मा

साचा:Link FA