धनगर समाज

धनगर समाज हा १०८ कुळी मेंढपाळ एक हिंदू जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो असा समाज आहे.[ संदर्भ हवा ] हे क्षत्रिय धनगर लोक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश,ज्ञआसाम, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यांत राहतात.[ संदर्भ हवा ] मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, सरदार यशवंतराव होळकर हे या समाजातील ज्ञात व्यक्ती होते.[ संदर्भ हवा ]
- या समाजाचे दैवत खंडोबा,
आरक्षणप्रश्न
[संपादन]सामाजिक परिस्थिती नुसार वेगवेगळ्या राज्यांत धनगर समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचे प्रमाण वेगवेगळे आहे.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रात धनगर समाज हा भटक्या जाती–क (एनटी-सी) या प्रवर्गात मोडतो.
- त्यांना सामाजिक व शैक्षणिक आरक्षण ३.५% दिलेले आहे.[ संदर्भ हवा ]
Oron-धनगड़ (उच्चार:ड़ चा र) अनुसूचित जमातीच्या सूचीच्या Sr.No.- 36 वर दिसणारी अनुसूचित जमाती आहे.
- धनगर म्हणून ओळखला जाणारा आणखी एक समुदाय आहे, ज्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे गुरे पाळणे आणि लोकरीचे विणणे.
धनगर मेंढपाळ असलेल्या धनगरांना महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.
- धनगर जमातीच्या परंपरा, डोंगर दर्यात असलेले राहणीमान बिरोबा सारखे स्वतंत्र दैवत, सामाजिक मागासलेपण, अशा कारणांमुळे धनगर जमात आदिवासी असल्याचा दावा केला जातो.
ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी समाजातून मागणी आहे.
इतिहास
[संपादन]पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (३१ मे, १७२५ - १३ ऑगस्ट, १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) या भारतातील, माळव्याच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्यादेवींनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी (मल्हारपीठ) खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते.
- स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते.
आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, यवढच नाही तर त्यानी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखंल प्रसिंध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
- इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असे म्हणले आहे.[१] थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की, ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्या वेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्व प्रथम लिहिला जाईल.
संस्कृती
[संपादन]धनगर समाजातील लोक हे हातात कुऱ्हाड, पाठीवर घोंगड, हातात कड, कोल्हापुरी चप्पल वापरतात.[ संदर्भ हवा ] जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार, बिरोबाच्या नावानं चांगभलं हे समाजाचे ब्रीदवाक्य आहे.[ संदर्भ हवा ] धनगर समाजामध्ये हा सगळ्या धनगरांच्या देवळात भंडारा उधळला जातो.[ संदर्भ हवा ] ही लोक धनगरी ओवी गातात व गजी नृत्य केले जाते.
- बापू बिरू वाटेगावकर, धनगरवाडा, ख्वाडा, बाळू मामांची गाथा या चित्रपटांतून आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जय मल्हार, श्री संत बाळूमामा या नाट्यकलांत धनगर समाजाची संस्कृती दर्शवलेली आहे.[ संदर्भ हवा ]
प्रसिद्ध व्यक्तिमत्व
[संपादन]- प्रा.राम शिंदे, सभापती-महाराष्ट्र वि.प.
- गणपतराव देशमुख, १०वेळा आमदार
- अण्णा डांगे, माजी मंत्री
- महादेव जानकर, पक्षाध्यक्ष-रासप
- दत्तात्रय भरणे, कॅबिनेट मंत्री
- गोपीचंद पडळकर, वि.स.स.
- विकास महात्मे, माजी खासदार
- रविकांत तुपकर, शेतकरी नेते