कांपिल्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कांपिल्य ही महाभारत काळातील दक्षिण पांचाल या राज्याची राजधानी होती. हे शहर आधुनिक काळामध्ये उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यात येते.

त्या काळातील पांचाल हे राज्य गंगा नदीमुळे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दुभाजित होते. गंगा नदीच्या उत्तर काठावर अहिच्छत्र ही राजधानी असलेले उत्तर पांचाल असून दक्षिणेला दक्षिण पांचाल हे राज्य होते.

इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकात पांचाळ हे राज्य भारतातातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

महाभारतात सांगितल्याप्रमाणे शंतनू राजाच्या काळात द्वीमठ हा उत्तर पांचालचा राजा होता. द्रुपद हा द्वीमठचा नातू.द्रोणाचार्यांनी द्रुपदाचा पराभव करून उत्तर पांचाल ताब्यात घेतले आणि द्रुपदाला दक्षिण पांचाल दिले. द्रौपदी ही द्रुपदाची मुलगी. मूळ पांचाळची म्हणून हिला पांचाली हे नाव पडले. तिचे स्वयंवर कांपिल्य शहरात झाले.

महाभारताच्या युद्धात दोन्ही पांचाल राज्यांनी पांडवांना साथ दिली. युद्धानंतर भीमाने आपली विजय यात्रा पांचाळ प्रदेशातून सुरू केली. त्यावेळी त्याने अंग, अयोध्या, काशी, चेदी आणि मत्स्य या राज्यांवर ताबा मिळवला. पांचालवर पांडवांच्या वंशजांनंतर नाग राजांनी राज्य केले.

मध्ययुगीन इतिहास काळात पांचाळ राज्य हे रोहिलखंड म्हणून ओळखले जात होते. आधुनिक रोहिलखंडात उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, रामपूर, बरेली, पिलिभीत, आणि शहाजहानपूर ही शहरे येतात.

अहिच्छत्रचे अवशेष आजही बरेली जिल्ह्यातील रामनगर येथे (आंवळा तालुका) आहेत.

संदर्भ[संपादन]

  • महाभारत सभा पर्व