पोर्तुगीज भारत
|
भारतातील पोर्तुगीज राज्य
Estado da Índia |
||||||
|
||||||
|
||||||
| राजधानी | नोवा गोवा (कोच्ची इ.स. १५३० पर्यंत) | |||||
| शासनप्रकार | वसाहती शासन | |||||
| राष्ट्रप्रमुख | पहिला मानुएल (पहिला; राजा) अमेरिको टोमास (अंतिम; अध्यक्ष) |
|||||
| अधिकृत भाषा | पोर्तुगीज | |||||
| इतर प्रमुख भाषा | कोकणी, गुजराती, मराठी, मल्याळम | |||||
| राष्ट्रीय चलन | पोर्तुगीज भारतीय रुपया पोर्तुगीज भारतीय एस्कुदो |
|||||
पोर्तुगीज भारत (पोर्तुगीज: Índia Portuguesa किंवा Estado da Índia;) या पोर्तुगालाच्या भारतातील वसाहती होत्या.
वास्को दा गामा याने युरोपातून भारताकडे येण्याच्या सागरी मार्गाच्या शोध लावल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ.स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले. इ.स. १७५२ सालापर्यंत आफ्रिका खंडाच्या दक्षिणेपासून आग्नेय आशियापर्यंत, अश्या हिंदी महासागरातील सर्व पोर्तुगीज वसाहतींना पोर्तुगीज भारत या संज्ञेने उल्लेखले जाई. इ.स. १७५२ साली मोझांबिकास अलग करून स्वतंत्र वसाहतीचा दर्जा देण्यात आला. इ.स. १८४४ साली पोर्तुगीज भारताच्या शासनाने मकाव, सोलोर व तिमोर येथील वसाहतींना प्रशासकीय कक्षेतून वगळल्यानंतर पोर्तुगीज भारताची व्याप्ती गोवा व मलबारापुरती सीमित राहिली. इ.स. १९५४ साली दादरा आणि नगर हवेली भारतीय प्रजासत्ताकाने पोर्तुगीज भारताच्या ताब्यातून मिळवले, तर इ.स. १९६१ सालातील डिसेंबरात गोवा, दीव व दमण या अखेरच्या तीन वसाहतीही ताब्यात घेतल्या. पोर्तुगीज भारताच्या वसाहती भारतीय प्रजासत्ताकात सामील झाल्या, तरीही या सामिलीकरणास पोर्तुगाल शासनाची मान्यता इ.स. १९७५ साली मिळाली.
बाह्य दुवे [संपादन]
- कॉलोनियल व्हॉयेज.कॉम - पोर्तुगीज वसाहतीविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)