सयाजीनगरी एक्सप्रेस
सयाजीनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भुज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भुज दरम्यानचे ८४१ किमी अंतर १६ तास व २५ मिनिटांत पूर्ण करते. कच्छ एक्सप्रेस ही गाडी देखील ह्या दोन स्थानकांदरम्यान रोज धावते.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन सयाजीनगरी एक्सप्रेसला अहमदाबादपर्यंत नेते व त्यापुढील प्रवास डिझेल इंजिन वापरून केला जातो.
तपशील[संपादन]
वेळापत्रक[संपादन]
गाडी क्रमांक | मार्ग | प्रस्थान | आगमन | कधी |
---|---|---|---|---|
१९११५ | वांद्रे टर्मिनस – भुज | १४:५० | ०९:२५ | रोज |
१९११६ | भुज – वांद्रे टर्मिनस | २२:१५५ | १४:०५ | रोज |
मार्ग[संपादन]
- वांद्रे टर्मिनस
- बोरीवली
- डहाणू रोड
- वापी
- वलसाड
- बिलिमोरा
- नवसारी
- सुरत
- कोसंबा
- अंकलेश्वर
- भरूच
- पालेज
- करजण
- विश्वामित्री
- वडोदरा
- आणंद
- नडियाद
- मणीनगर
- अहमदाबाद
- वीरमगाम
- ध्रांगध्रा
- हळावद
- माळिया मियाणा
- समखियाळी
- भचाऊ
- गांधीधाम
- आदिपूर
- अंजार
- भुज