भारताचे राष्ट्रचिन्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.[१]

मूळ अशोक स्तंभ[संपादन]

सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियायी सिंह कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे.

सारनाथ येथील अशोक स्तंभ

राजकीय प्रतीक[संपादन]

भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपी मध्ये सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे.

भारतातील राज्यांची प्रतीके[संपादन]

भारतातील राज्यांना त्यांची स्वतःची प्रतीके आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत सरकारच्या संकेतस्थळावरील माहिती" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-03-03. 2013-10-29 रोजी पाहिले.