बंदे मातरम (वृत्तपत्र)
बंदे मातरम (वृत्तपत्र) | |
---|---|
![]() २९ सप्टेंबर १९०७ च्या साप्ताहिक आवृत्तीचे मुखपृष्ठ | |
प्रकार | साप्ताहिक |
मालक | बिपिनचंद्र पाल |
संपादक | अरविंद घोष |
स्थापना | १९०५ |
राजकीय बांधिलकी | राष्ट्रीय |
भाषा | इंग्रजी |
मुख्यालय | कोलकाता |
बंदे मातरम हे इ.स. १९०५ मध्ये बिपिनचंद्र पाल यांनी प्रकाशित केलेले एक वर्तमान पत्र होते. हे वर्तमान पत्र साप्ताहिक असून इंग्रजी भाषेत कोलकाता येथून प्रकाशित होत असे.[१]
स्वातंत्र्यपूर्व काळात लाल, बाल आणि पाल ही त्रयी प्रसिद्ध होती. लाल म्हणजे पंजाबचे सिंह लाला लजपतराय, बाल म्हणजे लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तर पाल म्हणजे बंगालचे लेखक बिपिनचंद्र पाल. या तिघांनीही आपापल्या प्रांतात अनुक्रमे यंग इंडिया, केसरी (वृत्तपत्र) आणि 'बंदे मातरम्' ही वृत्तपत्रे चालविली. अरविंद घोष हेही मुख्य लेखक या नात्याने वंदे मातरम् मध्ये सहभागी झाले. 'बंदे मातरम्' या दैनिकाचे ते काही काळ संपादक म्हणूनही काम पाहत होते. १९०७ ते १९०८ या कालावधीमध्ये या साप्ताहिकाला अरविंद घोष संपूर्ण मार्गदर्शन करत होते, त्याचा खप भारतभरामध्ये होता. भारताच्या पुढील राजकारणावर यातील विचारसरणीचा ठसा स्पष्टपणे दिसून येतो.
'बंदे मातरम' मधून देशप्रेमाचा आणि परकीय सत्तेच्या गुलामीविरुद्धचा संदेश दिला जात असे पण त्याची शब्दयोजना अशी असे की त्यावर कोणताही कायदेशीर आक्षेप घेणे ब्रिटीश सरकारला शक्य होत नव्हते. 'बंदे मातरम्'चे खरे संपादक कोण याचा शोध घेण्यासाठी सरकारने बिपिनचंद्र पाल यांची साक्ष काढली. आपण खरे बोललो तर अरविंद घोष यांना शिक्षा होण्याची शक्यता होती म्हणून पाल यांनी साक्षच देणे नाकारले. त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली पण ती त्यांनी आनंदाने स्वीकारली.
संदर्भ[संपादन]
- ^ "'Bande Mataram' English Newspaper - Sri Aurobindo (1906-1910)". Sri Aurobindo Institute of Culture (इंग्रजी भाषेत).
- स्फूर्तिकथा - लेखक व संकलक भा.द.लिमये आणि विमल भिडे, श्रीअरविंद आश्रम प्रकाशन