नास्तिकता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नास्तिकता नास्तिकवाद या अनीश्वरवाद (इंग्रजी:Atheism ) ही जो सार्वभौम पुरावा नसतानाही जगाला निर्माण करतो, राज्य करतो आणि नियंत्रित करतो अशा कोणत्याही ईश्वराचे अस्तित्व मान्य करत नाही. (नास्ति = न + अस्ति ) = नाही आहे, म्हणजेच ईश्वर/देव नाही आहे.) निरीश्वरवादी असत्यपणा बोलतात कारण देव (ईश्वर) अस्तित्वाचा कोणताही स्पष्ट पुरावा नाही. बहुतेक निरीश्वरवादी कोणत्याही देवता, अलौकिक शक्ती, धर्म आणि आत्मा यावर विश्वास ठेवत नाहीत. हिंदू तत्त्वज्ञानामध्ये जे वेदांना मान्यता देत नाहीत त्यांच्यासाठी नास्तिक हा शब्द वापरला जातो. नास्तिक विश्वास ठेवण्यापेक्षा जाणून घेण्यावर विश्वास ठेवतात. त्याच वेळी, आस्तिक काही ईश्वराचा विश्वास त्याच्या धर्माप्रमाणे, पंथ, जाती, कूळ किंवा कोणत्याही सत्यतेशिवाय स्वीकारतो. निरीश्वरवाद याला अंधश्रद्धा म्हणतात कारण कोणत्याही दोन धर्म आणि श्रद्धा देवावर समान विश्वास ठेवत नाहीत. नास्तिकता म्हणजे देव रूढीवादी मान्यतांच्या आधारे नव्हे तर वास्तविकता आणि पुराव्यांच्या आधारावर स्वीकारण्याचे तत्त्वज्ञान आहे. आतापर्यंतचे सर्व तर्क आणि पुरावे नास्तिकतेसाठी देवाचा अधिकार स्वीकारण्यास अपूर्ण आहेत.[१]

निरीश्वरवादी म्हणजे पारलौकिक शक्तीचे अस्तित्व नाकारणारा.[२] ईश्वराचे अस्तित्व मान्य नसलेल्या व्यक्तीस नास्तिक म्हणतात. जगभरात २.५ अब्ज लोक नास्तिक आहेत.

ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक इत्यादी कल्पनिक गोष्टी नाकारणारे व्यक्ती वा तत्त्वज्ञान हे नास्तिक असते. लोकायत, बौद्ध धर्म, जैन धर्म या दृष्टीने नास्तिक ठरतात. हिंदू तत्त्वज्ञानांत नास्तिक हे एक दर्शन मानले आहे.

भारतीय तत्त्वज्ञानातील नास्तिकता[१][संपादन]

हिंदू तत्त्वज्ञानात नास्तिक शब्द तीन अर्थांनी वापरला जातो.

१. जे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत ते नास्तिक समजले जातात. या व्याख्येनुसार बौद्ध, जैन, आणि लोकायत तत्त्वज्ञानाने अनुयायी नास्तिक होतात आणि ही तीन तत्त्वज्ञाने नास्तिक तत्त्वज्ञान मानली जातात.

२. जे लोक परलोक (स्वर्ग/नरक) आणि पुनर्जन्म यावर विश्वास ठेवत नाहीत; या व्याख्येनुसार केवळ चार्वाक दर्शन ज्याला लोकायत दर्शनही म्हणतात, ते नास्तिक ठरते.

३. जे लोक ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहींत.

आधुनिक काळातील नास्तिक[संपादन]

नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मानव हा निसर्गाच्या सानिध्यात निर्माण झालेला आहे.बुद्धांनी ईश्वरांचे अस्तित्व नाकारले.आणि विज्ञानावर आधारलेले तत्त्वज्ञान दिले.

साहित्य[संपादन]

भगतसिंग यांनी लिहिलेले "मी नास्तिक का झालो" हे पुस्तक भारताच्या दृष्टीकोनातून नास्तिकतेवर केलेले भाष्य आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

रिचर्ड डॉकिन्स

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ a b "नास्तिकता". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-06-25.
  2. ^ "नास्तिक विचार मंच!!!! | मिसळपाव". www.misalpav.com. 2019-09-05 रोजी पाहिले.