कवठा (उमरगा)
?कवठा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उमरगा |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | मा.विकास पाटील |
बोलीभाषा मराठी | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२४७५ • एमएच/२५ |
कवठा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान[संपादन]
कवठा गावाच्या बाजूने तेरणा नदी वाहते, तसेच लातूर जिल्हा सीमा लागत वसलेलं गाव आहे
हवामान[संपादन]
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
लोकजीवन[संपादन]
लोकजीवन हे सर्व सामान्य आहे तेथील प्रमुख व्यवसाय शेती आहे बाजारपेठा किल्लारी आहे तसेच प्रमुखाने रबी आणि खरीप हंगामातील पिके घेतली जातात, ज्वारी, तूर हरभरा भईमूग कडाई सूर्यफुल अंबाडी बाजरी उडीद आणि सोयाबन हे पिके घेत जातात. उसाचे उत्पादन घेतात. गावापासून ७ किलोमीरवर साखर कारखाना आहे
प्रेक्षणीय स्थळे[संपादन]
येथे त्रिशिव हनुमान देवस्थान तसेच विष्णू मंदिर असून भव्य अशी मंदिराची स्थापना केली आहे, भारतरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे भव्य स्मारक आहे
नागरी संख्या[संपादन]
==जवळपासची गावे== मातोळा,एकोंडी, मुदगड,किल्लारी, नारंगवाडी