"आंबेडकरी चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७: ओळ २७:
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हि दलित लढा सातत्याने सुरु ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हि देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/|शीर्षक=Dalit Theatre and Ambedkar|date=2017-08-15|work=Forward Press|access-date=2018-07-16|language=en-US}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भ हवा}}
दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हि दलित लढा सातत्याने सुरु ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हि देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/|शीर्षक=Dalit Theatre and Ambedkar|date=2017-08-15|work=Forward Press|access-date=2018-07-16|language=en-US}}</ref> उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.{{संदर्भ हवा}}


== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:सामाजिक चळवळी]]
[[वर्ग:सामाजिक चळवळी]]

००:१४, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय, समता आणि बंधुता या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरु केली. त्यानंतर आंबेडकरी विचारांवर आधारित ज्या चळवळीपुढे आल्या त्यांना आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हणतात. आंबेडकरी विचार फक्त एकाच प्रकारचे बदल, परिवर्तन व क्रांती अशीच कल्पना न मांडता पूर्ण परिवर्तनाचा व्यापक विषय मांडतात. या परिवर्तनात सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक अशी नियमावली करता येऊ शकेल. हि संकल्पना संपूर्ण परिवर्तनाची आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

१८९८ मध्ये पेशवाई चा ऱ्हास झाला आणि ब्रिटीश सत्तेवर आले. याच काळात ब्राह्मणी संस्कृती आणि त्याचे दुर्बोध समोर आले. शास्त्र, वेद, पुरणाचा अभ्यास करण्याचा अट्टहास, मृत्यू आणि पुनर्जीवन या संकल्पना, रूढी मंत्रपठन इत्यादी. १८१३ मध्ये ब्रिटिशांनी मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी एक मोहीम सुरु करत शाळा सुरु केली. ब्राह्मणांनी याला तीव्र विरोध केला.महात्मा ज्योतिबा फुले यांनी महार जातीच्या मुलींकरता १८४८ मध्ये मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेत पहिली शाळा सुरु केली, आणि ब्राह्मणी अहंकाराला पेच दिला. कालांतराने हिंदू समाजाला मुलांचे व भिन्न जातीच्या समाजाचे शिक्षणाचे महत्व समजू लागले. त्याचबरोबर भिन्न वर्गाच्या लोकांवर होणार्या अत्याचाराची जाणीव झाली.[ संदर्भ हवा ]

आंबेडकर चळवळीचे विविध पैलू

सामाजिक पैलू

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः एका शोषित घराण्यामध्ये जन्माला आले होते. लहानपणापासूनच समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भेद भाव पाहत आले होते. समाज सुधारणेची चळवळ ब्रिटीश वसाहत काळात सुरु झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती नव्हते कि ज्यांनी उच्च वर्णीयांच्या विरोधात आवाज उठवला होता.[ संदर्भ हवा ]

    १९४६-४९ च्या काळात आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना केली, व या रचनेमध्ये प्रामुख्याने शोषित समाजाची प्रगती कशी होईल यावर भर दिला. म्हणूनच त्यांना “भारतीय राज्य घटनेचे शिलपकार” म्हणून संबोधले जाते.

    बौध्द धर्म समानता व बंधुत्त्वा वर आधारित असल्यामुळे, १४ ऑक्टोबर १९५६ ला आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांच्या सोबत त्यांचं लाखो अनुयायांनी देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला. [ संदर्भ हवा ]

राजकीय पैलू  

स्वातंत्र्या पूर्वीच्या काळात आंबेडकरांनी १९३६ मध्ये स्वतंत्र कामगार पक्ष आणि १९४२ मध्ये स्केडूलकास्ट फेडरेशनची स्थापना केली. १९३७ मध्ये स्वतंत्र कामगार पक्षाचे २१ उमेदवार निवडून आले होते. या पक्षांनी धोरणं हि सामाजिक व आर्थिक बदल घडवणारी होती. ती प्रामुख्याने मूलगामी, उपयुक्ततावादी आणि सहजदृष्ट्या असणारी होती.[१] १९४६ साली शे.का.(शेतकरी कामगार) फेडरेशनच्या नेतुत्वाखाली दलित महिलांनी पुणे करार रद्द करण्यासाठी सत्यग्रह केला. स्वातंत्र्योत्तर काळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी राजकीय हस्तक्षेप करण्यात आला होता त्यावेळी दलित राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.[ संदर्भ हवा ]

सांस्कृतिक पैलू

शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशी मित्र या वृत्तपत्रातून १ मार्च १९०९ साली आवाहन केले की मुलींना देवदासी करू नये. ज्या मुरळ्या आहेत त्यांच्यासोबत लग्न करण्याची ज्यांची इच्छा/ तयारी असेल, त्यांना जात पंचायतीकडून परवानगी असावी, अशा लोकांनी सह्या करून आम्हास कळवावे. याबाबत सरकारने IPC ३७३ प्रमाणे १६ वर्षाच्या आतील मुलीला वेश्येचा धंदा किंवा कामासाठी विकेल किंवा तसा प्रयत्न केला तर त्यास १० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येईल. असा कायदा झाला. १८ एप्रिल १९०९ मध्ये सोमवंशी मित्र पत्रव्यवहार करणाऱ्या शिवूबाई या मुरळीसोबत गणपतराव हनुमंतराव गायकवाड यांनी विवाह केला,  व याला सर्व अस्पृश्य समाजाने (महार, मंग, ढोर, चांभार) इ. मान्यता दिली. आंबेडकरी कार्यकर्त्यानी १३ जून १९३६ रोजी देवदासी, मुरळी जोगतीन यांची परळ मध्ये परिषद घेतली व सर्व शोषित वर्गाला आवाहन केले. बाळकृष्ण जानोजी देवरुखकर यांना अस्पृश्य स्त्रियांच्या दु:खाची चांगलीच जाणीव होती आणि समाजात अशा प्रकारची वागणूक मिळणाऱ्या अस्पृश्य स्त्रियांना समान वागणूक मिळावे असेही नमूद केले आहे.[२]

वैचारिक पैलू

दलित अस्तित्वाच्या जाणीवेच्या ठिणगीचे एका झगझगीत प्रकाशात रुपांतर करून अस्पृश्यांमध्ये लढण्याची जिद्द व समता निर्माण करणे हे आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्देश राहिला आहे. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंबेडकरांच्या विचार व मुल्यातून प्रेरणा घेऊन बौद्धिक चळवळ, ग्रंथ, भाषणे, वर्तमानपत्रे इ. दलित उद्द्धराचे काम सुरु केले. बाबासाहेबांनी तेजाचे एक वलय निर्माण केले. ज्याच्या किरणांनी अनेक लेखक, समीक्षक व विचारवंत विविध वैचारिक क्षेत्रांमध्ये निर्माण झाले. काहींनी इतिहासातील दलितांचे शौर्य, कर्तबगारी बौद्धिक संपत्ती यावर संशोधन सुरु केले तर इतरांनी प्रकाशन संस्था स्थापन केल्या.[ संदर्भ हवा ]

कलात्मक पैलू   

दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरवात संगीत आणि गाण्यांमधून होणार्या सांस्कृतिक रुढींचा विरोध आणि उठाव यातून होताना दिसून येते. गाण्यांमधून व संगीतामधून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि त्यात असणाऱ्या भावनांना जागृत करण्याची क्षमता हि दलित लढा सातत्याने सुरु ठेवण्या साठीचे शक्तीस्त्रोत ठरले आहे. आंबेडकरी जलसा हे त्याचे ठळक उदाहरण आहे. आंबेडकरी दलित रंगभूमी हि देखील दलित समजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्रचनेसाठी उत्प्रेरक ठरली आहे. याची सुरवात आंबेडकरी संमेलनातून होऊन टप्प्याटप्प्याने लोकनाट्य, पथनाट्य यातून प्रगत झाले. बी.एस.शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे एकतेची भावना निर्माण करणे हे दलित नाट्याचे प्रमुख उद्देश होय. याव्यतिरिक्त काही चित्रपटांमध्ये देखील आपल्याला जातीविषयक प्रश्नांची संवेदनशील मांडणी केलेली दिसून येते.[३] उदा.फॅन्ड्री, जैत रे जैत.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Political philosophy of B.R.Ambedkar-A critical understanding, Dr.P.Kesava Kumar
  2. ^ Pawar, Urmilā; Moon, Meenakshi (2008). (इंग्रजी भाषेत). Zubaan. pp. 92–102. ISBN 9788189013127 https://books.google.co.in/books?id=XH7JAAAACAAJ&dq=we+also+made+history+books&hl=en&sa=X&ved=0ahUKEwi0wIWJhqPcAhUHNI8KHfFEDrIQ6AEIKDAA. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ Forward Press (इंग्रजी भाषेत). 2017-08-15 https://www.forwardpress.in/2017/08/dalit-theatre-and-ambedkar/. 2018-07-16 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)