सदस्य चर्चा:Ravindra909

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) [संपादन]

चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) [संपादन]

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


   स्वागत Ravindra909, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Ravindra909, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५७ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, Ravindra909

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


अयोध्या : बुद्धकालीन साकेत[संपादन]

रामायणात रामाचे राज्य हे अयोध्येत होते असे सांगितले जाते त्याचा एक भाग म्हणून अयोध्या आहे हि सरयू नदीच्या काठावर आहे असे सांगितले जाते पण याच अयोध्येला बुद्धाने भेट दिल्याचे पुरावे आहेत इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आले होते आता हि अयोध्या नेमकी काय कशी झाली याची काही उदाहरणे सुद्धा आहेत इ सन पाचव्या शतकात कालिदास नावाचा कवी होवून गेला त्याने रघुवंश नावाचे महाकाव्य लिहिले पण हा कवी या स्थानाचे नाव कधी अयोध्या तर कधी साकेत असे उल्लेख करतो त्यावेळी मात्र प्रश्न निर्माण होतो तो असा कि हे स्थान त्यावेळी बौद्धांचे प्रसिद्ध महानगर व मोठे व्यापारी केंद्र साकेत तर नसावे ? यासाठी बौद्धांचे साकेत कसे होते हे देखील पाहू या बुद्धपूर्व काळात भारत सोळा जनपदांमध्ये विभागाला होता ती जनपदे अशी होती काशी कोसल अंग मगध वज्जि मल्ल चेदी वत्स क्रुरु पंचाल मत्स्य सुरसेन अस्सक अवंती गंधार आणि कम्भोज यामध्ये अनेक शहरे आणि निगम व गावे होती परंतु महानगरे फक्त सहा होती ती अशी चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोशांबी आणि वाराणशी अशी महानगरे होती याकाळात बुद्धाचे महापरी निर्वाण झाले तेव्हा आनंद याने तथागत यांना या महानगर मध्ये जाण्याची विनंती देखील केली होती {दिघनिकाय १६. ५. १७. } आता साकेत कडे जाण्याचा मार्ग सुद्धा पाहूया तथागत बुद्धाने आपल्या धम्माचा प्रचार करीत सतत ४५ वर्षे चारिका करीत भ्रमण करीत राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले आहेत त्याच्या नोंदी त्रिपिटक मध्ये सापडतात त्यात साकेत च्या हि नोंदी सापडतात त्याची माहिती घेवू या कोसल वासीय ब्राह्मण बावरी साधना करीत थेट दक्षिण पथामधील गोदावरी नदीच्या तीरावर अस्सक नावाच्या स्थानाजवळ आश्रम करून राहत होता त्याने ऐकले होते कि गौतम गृहत्याग करून श्रमण होवून सम्यक बुद्ध झाला आहे त्याने बुद्धांची भेट घेण्यासाठी आपले सोळा शिष्य ज्या मार्गाने गेले त्यातील प्रमुख शहरांची नावे आहेत प्रतिष्ठान महिष्मती उज्जैन गोनद्ध वेदिसं वनसह्य कोसंबी साकेत आणि श्रावस्ती म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणार्या मार्गावर साकेत लागत होते आणि नंतर श्रावस्ती वरील माहिती व मार्गाच्या नोंदी सुत्तानितापातातील पारायणवग्ग मधील वत्थुगाथेत { ३६. ३७. ३८. } उपलब्ध आहेत येथे साकेत च्या सबंधित नोंदींचा विचार करणे आवश्यक आहे आता या साकेत आणि श्रावस्ती मधील मार्ग नेमका कसा आहे हे देखील पाहू या यामध्ये आपल्याला विनय पिठक मध्ये श्रावस्ती आणि साकेत यांचा मार्ग सांगितला आहे कारण भिक्षु साकेत वरूनच श्रावस्ती ला जायचे आनंद यांच्याकडे असणारे अतिरिक्त चीवर सारीपुत्त यांना देण्यासाठी साकेत मध्ये गेले होते तसेच पाथेय्यक भिख्खू बुद्धाबरोबर वर्षावास घालवावा म्हणून श्रावस्ती ला जाण्यास निघाले परंतु वेळेवर न पोहचल्याने ते साकेत मधेच राहिले कारण वर्षाकालात भिक्षु ला प्रवास करण्यास मनाई होती हा संघाचा नियम होता तेव्हा ते असे हि म्हणाले कि तथागत आमच्यापासून सहा योजन दूर आहेत परंतु आम्हाला तथागत यांचे दर्शन घेता येत नाही या विचाराने ते खिन्न झाले होते महावग्ग मध्ये अश्या नोंदी सापडतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साकेत शहर हे सरयू नदीच्या तीरावर वसलेले होते कारण याच तीरावर अंजन वनात भगवान बुद्ध आणि त्यांचे शिष्य थांबले होते आता रामायणात अयोध्या हि सरयू नदीच्या पात्रापासून दीड योजन म्हणजे १५ मैल अंतरावर आहे पण हि सरयू नदी ऋग्वेदात मात्र सिंधू नदीच्या पश्चिमेला असून ती पश्चिमेला तोंड करून वाहते असे सांगितले आहे तर उत्तर प्रदेशातील सरयू नदी हि उत्तरेकडून खाली वाहत गंगेला मिळते यावरून साकेत हीच अयोध्या आहे आता हिचे नाव अयोध्या कसे पडले याचा हि इतिहास पाहणे आवश्यक आहे थोडे याकडे हि पाहू या पण त्याआधी ब्राह्मणी साहित्यात देखील नकळत सत्य लिहिले गेले त्याचे उदाहरण म्हणजे पातंजली याने पाणिनीच्या व्याकरणावर भाष्य करण्यासाठी महाभाष्य नावाचा ग्रंथ इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात लिहिला होता त्यात त्याने यदनराज मिनडर याने माध्यमिक आणि साकेत वर ताबा मिळवल्याचा उल्लेख महाभाष्य पातंजली याने केला आहे शिवाय वायू पुराणात हि साकेत चा उल्लेख आहे पुराणामध्ये अनेक ठिकाणी साकेत चा उल्लेख पाहायला मिळतो शिवाय एक महत्वाचे उदाहरण म्हणजे मथुरेला जशी कृष्ण ची द्वारका सांगण्याचा प्रयत्न केला पण उत्खनन करतात तेव्हा बुद्धाचे अवशेष सापडले आणि त्याचा महत्वाचा भाग असा कि चैत्यन्य याने कृष्णाचा खूप प्रचार केला आणि त्याने आपला शिष्य लोकनाथ आचार्य यास कृशांच्या लीलांनी प्रवित्र स्थळे शोधून काढण्यास सांगितले शिवाय चैत्यन्य स्वतः मथुरेला वृंदावनात १५१६ ला गेला त्याने अनेक स्थळे शोधली त्यात त्याने राधाकुंड हे नव्याने शोधून काढले होते असे हि सांगितले जाते कि चैत्यन्य आणि त्यांची शिष्य रूपा आणि सनातन यांनी पूर्वी विस्मृतीस गेलेली कृष्णालीलांची स्थळे शोधून काढली आणि मग त्यावर वैष्णव भक्तांनीपंधराव्य आणि सोळाव्या शतकावर मंदिरे बांधली पण वास्तविक हि सर्व मंदिरे बौद्ध विहार आणि स्तूप यांच्या अवशेष यांच्यावर बांधली गेली आणि अश्याच पद्धतीचे काम हे रामाच्या भक्ताकडून झाले आहे रामालीलांच्या जागी जवळपास ३६० मंदिरे बांधली गेली आणि हे काम राजा विक्रमादित्य याने केल्याचे सांगितले जाते आता हा विक्रमादित्य नाचे पात्र नेमके कोण कारण गुप्त घराण्यात स्कंध गुप्त हे नाव आहे तर हा राजा स्वतः ला रामाशी तुलना करून घेत असे आणि याला या लोकांनी विक्रमादित्य म्हणून म्हटले आहे पण हे सारे थोतांड कसे आहे हे सांगताना आपल्याला स्कंध गुप्त याच्या दोन पिढ्या अगोदर जावून पहिले यत्र कालिदास याने साकेत आणि आयोध्य हि एकच नावे आहेत असे सांगितले आहे आता हे हि सांगितले जाते कि चंद्रगुप्त दुसरा हा पाटील पुत्र शी सबंधित शेवटचा राजा होता शिवाय खरे पाहता या राजाने साकेत वर चाल केली नव्हती आता या पाटील पुत्रावर गुप्तांची राजवट हि इ सन ३२० मध्ये झाली तेव्हा हि साकेत हे साकेतच या नावाने होते तेथे रामाने राज्य केल्याचा कोणतीही माहिती नाही आणि जे सांगितले जाते कि विक्रमादित्य याने साकेत वर चाल करून मग रामाची अयोध्येच शोधकार्य केले हा दावा फोल ठरतो कारण साकेत वर गुप्त राजवटीने कधी हि चाल केलेली नाही याचे प्रमुख कारण आहे अशोकाचे आणि साकेत शहरातील झालेल्या तहाचे आहे कारण अशोकाने साकेत वर हल्ला करण्याचा बेत आखल्यावर शाकेत वासियांनी अशोकाशी करार केला होता कि अशोकाच्या साम्राज्यात साकेत येईल पण साकेत चा कारभार हा साकेत वासियांकडे राहील म्हणून अशोकाने साकेत शी कधी हि युद्ध न करण्याचा निर्णय त्यांना दिला होता तेव्हा त्या निर्णयाला अयुद्ध म्हणून संबोधले जाते आणि मगध साम्राज्यात कोसल साम्राज्य देखील विलीन झाले होते अशोकाच्या काळी नंतर अशोकाची राजधानी राजगृह होती आणि राजगृह कडे जाण्याचा मार्ग साकेत मधून निघत होता आता गुप्त जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी साकेत वर कधीहि चाल केली नाही मग विक्रमादित्य साकेत वर चाल करून रामाची अयोध्या शोधतो हा दावा खोटा साबित होतो शिवाय फाहीयान देखील साकेत ला इ सन ४०२ ते ४०३ च्या सुमारास आलेला आहे त्याने देखील साकेत चा उल्लेख केला आहे ते म्हणजे साकेत शहराच्या दक्षिण द्वाराने बाहेर पडल्यास एक वृक्ष आहे तिथे बुद्ध अनेकवेळा बसले होते आणि त्या ठिकाणी बांधलेला स्तूप आज हि चागल्या स्थितीत आहेत आता फाहीयान देखील साकेत चा उल्लेख साकेत म्हणूनच करतो म्हणजे इ सन ४०३ पर्यंत साकेत चे नाव आहे तेच आहे आता भारतात पुरातत्व विभागाची निर्मिती हि इंग्रजांच्या काळात झाली कारण जेव्हा इंग्रज सरकारी कामासाठी गावोगावी जात तेव्हा त्यांना भग्न अवस्थेत पडलेल्या मुर्त्या अवशेष दिसत काही ठिकाणी त्यांना शिलालेख हि सापडत आणि तेव्हा त्यांनी ते सर्व एका ठिकाणी जतन करून ठेवण्याची संकल्पना केली त्यातील एका अधिकारी असणारे विलियम जोन्स यांनी १७८४ साली पुरातत्व विभागाची स्थापना केली व भारतातील प्रमुख ग्रंथांच्या सहाय्याने ते शोध घेवू लागले आणि हे काम ५० वर्षे चालू होते १८३४ पर्यंत हे काम चालू होते प्रथम त्यांनी रामायण महाभारत या ग्रंथांच्या बाबतीत शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामायणातील रामाचा वनप्रवास अयोध्येपासून लंके पर्यंत चा प्रवास कसा असेल याचा शोध घेताना अनेक पुरावे मिळाले परंतु सारे हे बौद्ध अवशेष मिळत गेल्याने इंग्रजांचा शोध घेण्याचा दृष्टीकोन बदलला मग त्यांनी जगभरातील बौद्ध साहित्याचा अभ्यास करून बुद्धाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मग भारतात बुद्धाच्या इतिहासाचे उत्खनन होवू लागले त्यात कनिंगहम याने बनारस जवळील सारनाथ येथील स्तुपाचा शोध लावला १८४५ साली फर्ग्युसन यांनी पश्चिम भारतात कान्हेरी लेण्याचा शोध लावला आणि त्यांनी ट्री अन्ड सरपटं व्हरशिप हा ग्रंथ लिहून त्यांनी सांची आणि दक्षिण अमरावती येथील स्तुपांची माहिती प्रसिद्ध केली आणि महत्वाचे म्हणजे पुरातन अवशेष यांची माहिती चोहीकडून माहिती येत होती सरकार ने पेशाने इंजिनिअर असलेल्या अलेक्झडर कनिंगहम याची नेमणूक आर्कियालॉजी सर्व्हेअर ऑफ इंडिया या नव्या पदावर नेमणूक केली त्यांनी नोव्हेंबर १८६१ पासून काम हाती घेतले नंतर त्यांची मेजर जनरल या पदावर बढती करण्यात आलो या काळात सर ठिकाणी उत्खनन करताना कनिंघम यांनी ह्युनत्संग आणि फाहीयान यांनी जी माहिती उजेडात आणली होती तिचा आधार घेत उत्खनन सुरु केले गेले आणि बुद्धाचा इतिहास पुढे आणला गेला आणिविशेष भाग असा कि बुद्धाच्या हयातीत च बुद्धाच्या शरीराची जतन केले जात असत केश असोत वा नखे यांची स्थापना केली जायची त्यांचे स्तूप बांधले जायचे आणि अश्याच नखे आणि केश असणारा स्तुपांचा उल्लेख हा साकेत मध्ये येतो तेव्हा स्तूप हे मातीचे ढिगारे असायचे नुसते आणि आत मध्ये बुद्धाच्या शरीर धातू असत हि सुरुवातीची रचना असे पुढे अशोकाने धम्माच्या मार्गाने चालल्यावर त्या स्तुपांवर दगड विटांचे बांधकाम करण्यास सुरुवात केली आणि साकेत इथे अश्याच स्तुपांचा उल्लेख ह्यूनत्सांग याने केले आहे आता महाभारत आणि रामायण या काव्याना सत्य साबित करण्याच्या नादात हे लोक बुद्धाला जमिनीतून बाहेर काढण्याच्या मार्गावर आले रामायण महाभारत सिद्ध करण्यासाठी १९४७ ते २००३ पर्यंत खूप प्रयत्न केले पण हवे ते सत्य सापडू शकले नाही आणि गंमत अशी कि स्वतः जातीने ब्राह्मण असणारे एम सी जोशी पुरातत्व विभागाचे तज्ञ स्वतः सांगतात त्यांच्या archaeology and indian tradition puratatva याचे अनेक भाग आहेत त्यात त्यांनी खूप विश्लेषण केले आहे आता अयोध्येमधील पुरातन स्थान पाहू या त्यात मणी पर्वत या नावाने ओळखला जाणारे एक स्थान आहे हि निसर्गनिर्मित टेकडी नाही हि मानवनिर्मित टेकडी आहे शिवाय हि विटांचे तुकडे आणि खडीच्या लाद्यापासून बनवलेली आहे तिची उंची ६५ फुट आहे जुन्या विटा ११ इंचाच्या असून जाडी ३ इंचची आहे जमिनीपासून ४६ फुट वरच्या बाजूला पश्चिमेकडे खडीच्या लाद्यांची अर्धगोलाकार भिंत आहे तिथे ४० फुट जाडीचे ढीग होते ते पूर्वी त्याच्यावर असलेल्या उंच इमारती पेक्षा कमी जाडीचे होते परंतु ब्राह्मण लोकांनी सांगितले कि रामाला मदत करण्यासाठी सुग्रीवाने चुकून तो पर्वत खाली पाडला आणि तो हा मनी पर्वत पर्वत खाली पाडला तरी तो नैसर्गिक असतो मानवनिर्मित होणार नाही या मणी पर्वताचे उत्खनन केले असते तर खरा इतिहास पुढे आला असता पण याचे अद्याप उत्खनन करू दिले नाही कारण याचे बांधकाम यावरून यांना देखील संशय आहे कि इथे बुद्धाच्या शरीर धातूवर बांधलेला स्तूप असावा म्हणून कुबेर पर्वत  : हा मणी पर्वताच्या ५०० फुट दक्षिणेला कुबेर पर्वत आहे हा सुद्धा मानवनिर्मित आहे २८ फुट उंचीचा विटांचा तुकड्यांचा असूनइथे कामासाठी विटा नेताना केलेलं खड्डे स्पष्ट दिसतात येथील विटा ११ इंच आणि २ इंच्ज जाडी च्या आहेत इथे एक तलाव देखील आहे त्याला हिंदू लोक गणेश कुंड म्हणतात तर मुस्लिम इमाम तलाव म्हणतात सुग्रीव पर्वत हा कुंडांच्या जवळ आग्नेय दिशेला गोलाकार टेकडी आहे यांची उंची साधारण १० फुटापर्यंत असावी असे सांगितले जाते याचे दोन भाग पडतात एक उत्तरेकडील ३०० चौरस फुटांचा आणि एक दक्षिणेकडील २०० चौरस फुटांचा आणि दोघांच्या मध्ये एक भग्न अवस्थेत एक टेकडी आहे तिथे साडे आठ चौरस मध्ये विटा हाते दक्षिणेकडे एक विहीर आहे आता इथे मुस्लिम लोकांच्या कबरी देखील आहे परंतु ह्यून त्सांग याने जे वर्णन केलेले कालकाराम विहार विहाराचा उल्लेख साकेत मध्ये सांगितला जातो ते विहार आता सुग्रीव पर्वत म्हणून ओळखले जाते कारण त्याचे अवशेष राहिले आहेत शिवाय या विहाराच्या बाजूलाच अशोकाने २०० फुटीचा एक स्तूप बांधला होता कारण बुद्धाने इथे धम्माचे उपदेश केला होता म्हणून तिथे एक स्तूप बांधला होता तो स्तूप आजला मणी ब पर्वत म्हणून लोक सांगतात ह्यूनत्सांग याने स्पष्ट उल्लेख केला आहे आज हि त्याचे स्थान हे ६५ फुट उंचीचे आहे आणि मानवनिर्मित आहे आणि विटांचे बांधकाम हे प्रामुख्याने स्तुपाचेच आहे आणि विशेष म्हणजे सुरुवातीचे बांधकाम हे मातीचे असून वरील बांधकाम हे दगड विटांचे आहे त्यामुळे हे स्तुपांचे अवशेष आहेत हे नाकारता येत नाही ह्यून त्सांग ने अजून एक केलाला बुद्धांच्या शरीर धातूंचा स्तूप म्हणजे बुद्धांचे केश आणि नखे यावर बांधलेला स्तूप शिवाय त्याच्या जवळ असणारे तळे जे आजला कुबेर टिळा म्हणून किंवा कुबेर पर्वत म्हणून सांगितले जाते आणि तलाव हे कोणी गणेश कुंड तर कोणी इमाम तलाव म्हणतात पण हे बुद्धाच्या केश आणि नखांच्या वर बांधलेल्या स्तुपाजवळ असणारे तळे आहे आता कनिंगहम याने सर्व खात्री पटवून सांगितले पण लोकांनी त्यांना उत्खनन करून दिले नाही आणि अजून एक ब्रिटिश धार्मिक वस्तूंना संरक्षण देत असत आणि महत्वाचे म्हणजे कनिंग हम याने त्याच्या रिपोर्ट मध्ये लिहून ठेवले आहे कि इतर पुरातन शहरात दृष्टीस पडतात तसल्या भग्नास्थेत असलेल्या कृत्रिम टेकड्या मिळत नाहीत परंतु इथे त्या विखुरलेल्या विषम आकाराचे विटांचे ढीगदिसतात शिवाय शेजारी असणाऱ्या फैजाबाद गावामध्ये या विटा नेल्याचे स्पष्ट खुणा इथे दिसतात कारण या गावातील बहुतांश बांधकाम हे साकेत मधून नेलेल्या पुरातन अवशेषामधून केले गेले आहे { अ क आरकीयालॉजि रिपोर्ट १९६२ -६३ पान ३२१ } आता हिंदू धर्माला पुढे नेण्यासाठी बुद्धाच्या एका शिष्य असणाऱ्या हरिती देवी हिला पुढे आणले कारण एक लेणी आणि स्तुपामध्ये या हरीतदेवी ची मुर्त्या कोरलेल्या आहेत काही मुलांना पायाखाली घेतलेल्या आहेत तर काही कडेवर घेतलेल्या आहेत याची घटना अशी आहे कि हि देवी लहान मुलांचे जीव घेत असे त्यांना मारत असे हिंसा करीत असे तेव्हा बुद्धांनी तिच्याच मुलाला लपवून ठेवण्यास सांगितले आणि मग बुद्धांनी तिला लहान मुलाचे त्यांच्या मात्यापित्यास काय दुःख होते ते सांगितले यावर पश्चाताप होवून तिने धम्माची प्रवज्जा घेतली बुद्धांची शिष्या झाली तिची अनेक रूपे कोरण्यात आली आणि महत्वाची नोंद घेताना सांगावे लागते कि बाबरी मस्जिदच्या खाली त्रिरत्न चिन्ह चित्रित केलेली मातीच्या भांद्य्नाची कापरे मिळाली त्याच बरोबर अशोककालीन ब्राह्मी लिपी अंकित काही मुद्रा देखील मिळाल्या आहेत आणि हे भा वि कुलकर्णी यांनी एक खंत व्यक्त केली होती दिनांक ११ ऑगस्ट २००४ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये मांडली होती कि राजकारणासाठी पुरातत्व विभागाचा वापर झाला म्हणून त्यांनी असे हि म्हटले आहे कि पाच महिने उत्खनन केले कडेकोट बंदोबस्त मध्ये केले आणि हे उत्खनन ऐतिहासिक निवाड्याला मदत करणारे आहे बाबरी मस्जिद च्या खाली ज्या संस्कृतीचे अवशेष सापडले हे शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि अहवालात मंदिर असा शब्द हि न लिहिता अहवाल त्यांनी न्यायमूर्ती यांच्याकडे सोपवला अयोध्येतल्या त्या विशिष्ट टेकडीचा ६० हेक्टरचा भाग रामटेक मध्ये मोडतो मनिपर्वत कुबेरपर्वत हा भाग उत्खनन साठी खुला केला तर तिथल्य नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे टेकाड पोखरले तर सारनाथ च्या तोडीचे अशोक कालीन शिल्प सापडेल हे कुठल्याही पुरातत्व शाखेचा विद्यार्थी सांगेल असे खुद्द कुलकर्णी म्हणतात कारण त्यांचे हे वक्तव्य का होते कारण ह्यून त्सांग आणि फाहीयान यांच्या प्रवास वर्णनात त्याचा स्पष्ट उल्लेख आहेत ते पुढे हि असे हि म्हणाले आहेत कि आपण जमीन खोडतो ती इतिहास साठी नव्हे तर भिकार राजकारणासाठी { भा वि कुलकर्णी , महाराष्ट्र टाईम्स मधील त्यांचा लेख दिनांक ११ ऑगस्ट २००४ } आता एकूण हा सारांश पाहिला तर अयोध्येत सत्य शोधायचे असेल तर एकच करावे लागणार ते म्हणजे मनी पर्वत आणि कुबेर पर्वताचे उत्खनन थोडक्यात उत्खनन झालेल्या भागात फक्त बुद्ध अवशेष मिळाले त्यामुळे हे स्थान अयोध्येचे नसून साकेत चे आहे आता अयोध्या हा शब्द देखील अयुद्ध चा अपभ्रंश झालेले शब्द आहेत त्यामुळे जे राम आणि रहिम च्या नावाने इथे बोंबलत आहेत त्यांना सांगावे वाटते कि इतके उतावीळ होवू नका सत्य शोधायला गेलात तर तोंडावर पडाल जय शिवराय जय भीमराय {टीप : हा एक सारांश आहे साकेत बाबत चा यावर जवळपास ४०० ते ५०० पानांचे पुस्तक तयार होईल इतकी माहिती आहे त्यातील काही म्हत्वाचे भाग सांगण्याचा प्रयत्न आहे }