श्री प्रकाश
Indian politician (1890–1971) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | ऑगस्ट ३, इ.स. १८९० वाराणसी | ||||
| मृत्यू तारीख | जून २३, इ.स. १९७१ वाराणसी | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| पद |
| ||||
| वडील | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
श्री प्रकाश (३ ऑगस्ट १८९० - २३ जून १९७१) हे भारतीय राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक आणि प्रशासक होते. त्यांनी १९४७ ते १९४९ या काळात पाकिस्तानमधील भारताचे पहिले उच्चायुक्त, १९४९ ते १९५० पर्यंत आसामचे राज्यपाल, १९५२ ते १९५६ पर्यंत मद्रासचे राज्यपाल आणि १९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.
श्री प्रकाश यांचा जन्म १८९० मध्येवाराणसी येथे भगवान दास यांच्या घरी झाला. [१] त्यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल CHBS (BHU) वाराणसी येथे झाले आणि केंब्रिजमधून पदवी प्राप्त केली. [१][२] सुरुवातीच्या काळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, त्यांनी प्रशासक आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. १९५७ साली त्यांना पद्मविभूषण प्राप्त झाले. १९७१ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी श्री प्रकाश यांचे निधन झाले.
संदर्भ
[संपादन]- 1 2 Siba Pada Sen (1974). Dictionary of national biography. Institute of Historical Studies. pp. 259.
- ↑ Rajeshwar Dayal (1998). A life of our times. Orient Blackswan. p. 56. ISBN 978-81-250-1546-8.