"अवेस्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:


[[अलेक्झांडर]]च्या मागून [[सेल्युकस]]च्या अंमलाखाली व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व काही भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडात शतकाच्या प्रारंभी शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकाने हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळे या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसऱ्या शापूरच्या कारकीर्दीत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखाली या उपलब्ध ग्रंथाने एकत्रीकरण झाले; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीने जे पारशांचे व त्यांच्या धर्मग्रंथांचे नुकसान झाले नाही ते [[मुसलमान]]ांच्या प्रशियावरील स्वारीने झाले. मुसलमानांनी इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी [[धर्मग्रंथ]] सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असे फर्मान काढण्यांत आले व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळे पारशी लोकांना देशत्याग करणे भाग पडले. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशातून वाचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकी बऱ्याच लोकांनी बाटण्याच्या भीतीने [[भारत]]ाचा मार्ग धरला. भारतात असता राखण्यात आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हा लिहून काढण्यात आला. त्या प्रतींपैकी कांही प्रती १३-१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याही एका प्रतीत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाही.
[[अलेक्झांडर]]च्या मागून [[सेल्युकस]]च्या अंमलाखाली व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व काही भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडात शतकाच्या प्रारंभी शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकाने हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळे या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसऱ्या शापूरच्या कारकीर्दीत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखाली या उपलब्ध ग्रंथाने एकत्रीकरण झाले; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीने जे पारशांचे व त्यांच्या धर्मग्रंथांचे नुकसान झाले नाही ते [[मुसलमान]]ांच्या प्रशियावरील स्वारीने झाले. मुसलमानांनी इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी [[धर्मग्रंथ]] सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असे फर्मान काढण्यांत आले व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळे पारशी लोकांना देशत्याग करणे भाग पडले. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशातून वाचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकी बऱ्याच लोकांनी बाटण्याच्या भीतीने [[भारत]]ाचा मार्ग धरला. भारतात असता राखण्यात आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हा लिहून काढण्यात आला. त्या प्रतींपैकी कांही प्रती १३-१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याही एका प्रतीत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाही.

== अवेस्ता ग्रंथाचे स्वरूप ==
ज्याला हल्ली झेंदावेस्ता म्हणून संबोधण्यात येते, त्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला, ज्यालाच खरोखर अवेस्ता हें नांव देणें संयुक्तिक होईल त्यामध्यें वेंदीदाद, विस्पेरद व यश्न यांचा समावेश होतो. वेंदीदादमध्यें पौराणिक कथा व धर्माच्या आज्ञा यांचा संग्रह झालेला आहे विस्पेरदमध्ये, यज्ञाकरीता जरूर अशा अरिष्टशांतिप्रार्थनांचा संग्रह आहे. यश्नमध्ये अशाच प्रकारच्या अरिष्टशांतिप्रार्थनांचा अंतर्भाव असून शिवाय, प्राचीन गाथापंचकाचाही यांत समावेश करण्यात आला आहे. काही हस्तलिखित प्रतीत हे तिन्ही ग्रंथ परस्परांहून स्वतंत्र असून त्यांच्या शेवटी पहलवी भाषेतील भाषांतर जोडलेले आढळते. इतर हस्तलिखित प्रतीत हे तीन्ही ग्रंथ यज्ञांमधील प्रार्थनांच्या दृष्टीने सोईप्रमाणे, एकत्र करण्यात आले आहेत व त्यांच्या शेवटी भाषांतर अगर टीका वगैरे काही आढळत नाहीत. म्हणून त्याला 'शुद्ध वेंदीदाद' असे नांव देण्यात येते. दुसऱ्या भागाचे खोर्द अवेस्ता असे नांव असून त्याच्या मध्ये छोटी छोटी प्रार्थनासूक्ते ग्रथित झालेली आहेत. ही सूक्ते केवळ उपाध्यायांनीच नव्हे तर सर्व गृहस्थांनी विशिष्ट प्रसंगी विशिष्ट तऱ्हेंने म्हणावयाची असतात. याखेरीज या भागांत यश्त व इतर संकीर्ण कथांचा अंतर्भाव होतो. यश्त म्हणजे देवतांच्या स्तुतींचा केलेला संग्रह.

आज जे अवेस्तावाड्मय उपलब्ध आहे ते संपूर्ण नूसन बरेचसे वाड्मय लुप्त झालेले असावे असे या वाड्मयाच्याकडे विचारपूर्वक पाहिल्यास सहज दिसून येईल. शिवाय या मताला ऐतिहासिक पुरावाही पण सापडतो. अरबांच्या विजयामुळे सस्सानियन राजघराण्याला ओहोटी लागली. झेंद वाड्मयाचा बराच भाग उध्वस्त करण्यांत आला. वेंदीदादच्या पहलवी भाषांतरात असे पुष्कळ झेद भाषेतील उतारे सांपडतात की त्यांची माहितीच आपल्याला अद्यापी लागलेली नाही. निरंगिस्तान एओजेमेद, या ग्रंथांतही असे पुष्कळ अज्ञात पुस्तकांतील उतारे घेतलेले आहेत. यश्तांची संख्या ३० आहे अशी पारशी लोकांची समजूत आहे. पण त्यांपैकी १८ उपलब्ध आहेत. इतके तरी अवेस्ता वाड्मय शिल्लक राहिले याचे कारण त्यात श्रौतस्मार्तविधींचा संग्रह असून त्यांचा नेहमी व्यवहारांत उपयोग होत असल्यामुळे त्याचे रक्षण होणे स्वाभाविकच होते हे होय.

== हेही पहा==
*[[धर्मग्रंथ]]

== बाह्य दुवे==

== संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग: पारशी धर्म]]
[[वर्ग: पारशी धर्म]]

१९:४२, ९ मे २०१७ ची आवृत्ती

अवेस्ता किंवा झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे. पारशी धर्म - संस्कृतीबद्दलचे विखुरलेले ज्या ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे त्याला ‘अवेस्ता’ असे म्हटले जाते.

हा ग्रंथ इराणची प्राचीन अवेस्ता भाषेत लिहिलेला आहे. या भाषेचे संस्कृत भाषेशी बरेचशे साम्य आहे. झोराष्ट्रियन या प्राचीन इराणी धर्माचा संस्थापक झरत्रुष्ट्र होते. त्यांनी स्थापित केलेल्या धर्माच्या नीती-नियमांबद्दलची माहिती या ग्रंथात आहे. इरत्रुष्ट्र यांनी ज्या रचना केल्या त्यास गाथा असे म्हटले जाते. रोमन ज्ञानकोशकार प्लिनी यांनी असे नमूद केले आहे की, अवेस्ताची संख्या २० लाख असावी, तर अरबी इतिहासकार अल् तबरी यांच्या मते या अवेस्ता १२ हजार चर्मपत्रांवर लिहिलेल्या होत्या.

इतिहास

अवेस्ता हा शब्द 'अविस्ताक-ज्ञान, ज्ञानदेणारें पुस्तक' या पहलवी भाषेतल्या शब्दावरून बनलेला आहे. अवेस्ता ग्रंथ, हा नष्टप्राय झालेल्या धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. जगातील इतर कोणत्याही धर्माचा या धर्माच्या इतका कमी प्रसार नसेल हे खरें, तरी पण या अवेस्ता ग्रंथाचे व त्यामध्ये सांगितलेल्या धर्माचे ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. या धर्मग्रंथांत खिस्ती शकापूर्वी ५०० वर्षांपूर्वींच्या व ख्रिस्तीशकानंतर ७०० वर्षांच्या अवधींतील इराणी लोकांच्या धर्मकल्पना, समजुती, आचारविचार यांची माहिती सांपडते; इतकेच नव्हे तर या धर्मग्रंथाच्या व त्यांत सांगितलेल्या धर्माच्या साहाय्यानें, पर्शुभारतीय काळावर म्हणजे वैदिक आर्यांच्या भारतप्रवेशापूंर्वीच्या काळावर प्रकाश पडण्याचा पुष्कळ संभव आहे. हल्ली उपलब्ध असलेला अवेस्ता ग्रंथ हा एका काळच्या मोठ्या वाड्मयाचा केवळ अवशेष होय. मूळ अवेस्ताग्रंथाची १२०० प्रकरणें होतीं असें पहलवी दंतकथांवरून समजते. अवेस्ताग्रंथ १२०० गाईंच्या कातड्यावर कोरला होता असे टबरी व मसूदी या इतिहासकारांनी म्हटले आहे. या ग्रंथाच्या विस्ताराबद्दल प्राचीन सीरियन लेखक सुद्धा साक्ष देतात व प्लिनी नावाच्या रोमन पंडित झोरोआस्टरने २० लक्ष कविता रचल्या असे म्हटले आहे. खुद्द उपलब्ध अवेस्ताग्रंथाचे अंतरंगपरीक्षण केले तरी हेच दृष्टोत्पत्तास येते. पण सर्वात बलवत्तर प्रमाण म्हणजे पहलवी भाषेतील डिनकर्त या ग्रंथाचें व पर्शियन रिवायतग्रंथांचें होय. या ग्रंथांत प्राचीन अवेस्ताग्रंथाच्या विस्ताराबद्दल व त्यातील मजकुराबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे.

पूर्वकाळी व विशेषत: अकिमेनियन राजांच्या अंमलाखाली या धर्मग्रंथाचे रक्षण मोठ्या आस्थेने होत होते. झोरोआस्टरचा सहाय्यक जो विष्तास्प राजा त्याने अवेस्ता ग्रंथ सोनेरी अक्षरांत लिहून काढवून तो ग्रंथ पर्सेपोलीस येथील आपल्या दफ्तरकचेरीत ठेवला होता असे टबरीने म्हटले आहे, व डिनकर्त ग्रंथावरूनही हीच गोष्ट दिसून येते. या ग्रंथाची दुसरी एक सोन्याच्या विटांवर कोरलेली १२०० प्रकरणात्मक प्रत समरकंदमधील अग्यारी (अग्निगृह) मधील खास खजिन्यांत ठेवली होती असें शात्रोइहा-इ ऐरान या पहलवी ग्रंथावरून समजते. पण या दोन प्रतींचा अलेक्झांडरच्या स्वारीमध्ये ज्यावेळीं पर्सेपोलीस व समरकंद हे ग्रीकांच्या हाती आले त्यावेळी नाश झाला.

अलेक्झांडरच्या मागून सेल्युकसच्या अंमलाखाली व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व काही भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडात शतकाच्या प्रारंभी शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकाने हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळे या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसऱ्या शापूरच्या कारकीर्दीत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखाली या उपलब्ध ग्रंथाने एकत्रीकरण झाले; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीने जे पारशांचे व त्यांच्या धर्मग्रंथांचे नुकसान झाले नाही ते मुसलमानांच्या प्रशियावरील स्वारीने झाले. मुसलमानांनी इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी धर्मग्रंथ सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असे फर्मान काढण्यांत आले व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळे पारशी लोकांना देशत्याग करणे भाग पडले. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशातून वाचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकी बऱ्याच लोकांनी बाटण्याच्या भीतीने भारताचा मार्ग धरला. भारतात असता राखण्यात आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हा लिहून काढण्यात आला. त्या प्रतींपैकी कांही प्रती १३-१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याही एका प्रतीत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाही.

अवेस्ता ग्रंथाचे स्वरूप

ज्याला हल्ली झेंदावेस्ता म्हणून संबोधण्यात येते, त्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला, ज्यालाच खरोखर अवेस्ता हें नांव देणें संयुक्तिक होईल त्यामध्यें वेंदीदाद, विस्पेरद व यश्न यांचा समावेश होतो. वेंदीदादमध्यें पौराणिक कथा व धर्माच्या आज्ञा यांचा संग्रह झालेला आहे विस्पेरदमध्ये, यज्ञाकरीता जरूर अशा अरिष्टशांतिप्रार्थनांचा संग्रह आहे. यश्नमध्ये अशाच प्रकारच्या अरिष्टशांतिप्रार्थनांचा अंतर्भाव असून शिवाय, प्राचीन गाथापंचकाचाही यांत समावेश करण्यात आला आहे. काही हस्तलिखित प्रतीत हे तिन्ही ग्रंथ परस्परांहून स्वतंत्र असून त्यांच्या शेवटी पहलवी भाषेतील भाषांतर जोडलेले आढळते. इतर हस्तलिखित प्रतीत हे तीन्ही ग्रंथ यज्ञांमधील प्रार्थनांच्या दृष्टीने सोईप्रमाणे, एकत्र करण्यात आले आहेत व त्यांच्या शेवटी भाषांतर अगर टीका वगैरे काही आढळत नाहीत. म्हणून त्याला 'शुद्ध वेंदीदाद' असे नांव देण्यात येते. दुसऱ्या भागाचे खोर्द अवेस्ता असे नांव असून त्याच्या मध्ये छोटी छोटी प्रार्थनासूक्ते ग्रथित झालेली आहेत. ही सूक्ते केवळ उपाध्यायांनीच नव्हे तर सर्व गृहस्थांनी विशिष्ट प्रसंगी विशिष्ट तऱ्हेंने म्हणावयाची असतात. याखेरीज या भागांत यश्त व इतर संकीर्ण कथांचा अंतर्भाव होतो. यश्त म्हणजे देवतांच्या स्तुतींचा केलेला संग्रह.

आज जे अवेस्तावाड्मय उपलब्ध आहे ते संपूर्ण नूसन बरेचसे वाड्मय लुप्त झालेले असावे असे या वाड्मयाच्याकडे विचारपूर्वक पाहिल्यास सहज दिसून येईल. शिवाय या मताला ऐतिहासिक पुरावाही पण सापडतो. अरबांच्या विजयामुळे सस्सानियन राजघराण्याला ओहोटी लागली. झेंद वाड्मयाचा बराच भाग उध्वस्त करण्यांत आला. वेंदीदादच्या पहलवी भाषांतरात असे पुष्कळ झेद भाषेतील उतारे सांपडतात की त्यांची माहितीच आपल्याला अद्यापी लागलेली नाही. निरंगिस्तान एओजेमेद, या ग्रंथांतही असे पुष्कळ अज्ञात पुस्तकांतील उतारे घेतलेले आहेत. यश्तांची संख्या ३० आहे अशी पारशी लोकांची समजूत आहे. पण त्यांपैकी १८ उपलब्ध आहेत. इतके तरी अवेस्ता वाड्मय शिल्लक राहिले याचे कारण त्यात श्रौतस्मार्तविधींचा संग्रह असून त्यांचा नेहमी व्यवहारांत उपयोग होत असल्यामुळे त्याचे रक्षण होणे स्वाभाविकच होते हे होय.

हेही पहा

बाह्य दुवे

संदर्भ