"शिरपूर पॅटर्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:


शिरपूर परिसरातील शेतकरी वर्षात दोन ते तीन पिके घेत आहेत. १० वर्षात जलसंधारणाच्या कामावर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन एकरातील काकडी शेतकर्‍याला तीन महिन्यात तीन लाख रुपये मिळतात. दोन एकरातील भेंडी ४ लाख रुपये देते. त्यामुळे शेतकर्‍याची एकही आत्महत्या या भागात नाही.
शिरपूर परिसरातील शेतकरी वर्षात दोन ते तीन पिके घेत आहेत. १० वर्षात जलसंधारणाच्या कामावर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन एकरातील काकडी शेतकर्‍याला तीन महिन्यात तीन लाख रुपये मिळतात. दोन एकरातील भेंडी ४ लाख रुपये देते. त्यामुळे शेतकर्‍याची एकही आत्महत्या या भागात नाही.

तापी आणि पूर्णा नदीचा भाग हा गाळाचा प्रदेश आहे. पावसाचे पाणी अथवा धरण भरल्यानंतर वाया जाणारे पाणी शुद्ध करून, गाळून ते पाणी जर या भागांमधील कोरड्या विहिरीत वरून टाकले तर या विहिरींद्वारे ते पाणी जमिनीत जाऊन पाण्याची पातळी वाढू शकते. हे धुळे जिल्ह्यात सिद्ध झाले. सुरेश खानापूरकर यांनी शिरपूरमध्ये राबवलेल्या या पद्धतीनुसार कोरड्या विहिरीजवळ १० बाय १० फूट या आकाराचे २ टाके बांधले.. पहिले टाके रिकामे ठेवून व दुसर्‍या टाक्यात तळाशी गोल गोटे, त्यावर जाड रेती व नंतर बारीक रेती असे थर दिले.. पहिल्या टाक्यात पाणी आल्यावर त्याठिकाणी गाळ खाली बसला आणि ते पाणी दुसर्‍या टाक्यात गेले.. तेथे ते गाळले जाऊन टाक्याच्या तळाशी असलेल्या पाईपमधून विहिरीत गेले. या पद्धतीमुळे ६० हजार लिटर प्रतितास या वेगाने पाणी विहिरीत जाते, पण विहीर भरत नाही. या पद्धतीत १८ गावांमधील अजिबात पाणी नसलेल्या ५९ विहिरी निवडण्यात आल्या. पावसाळ्यात वाया जाणारे पाणी या विहिरींमध्ये टाकण्यात आले. सतत दोन महिने हा प्रयोग केल्यानंतर सुमारे २ किलोमीटर अंतरावरील कूपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी शंभर ते दीडशे फूट वाढली.

शिरपूर तालुक्यात दीडशे गावांमध्ये हे काम सुरू आहे. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नमुळे बसाल्ट असलेल्या दगडातील पाण्याची पातळी जमिनीपासून २५ फुटावर आली. तापीच्या गाळाच्या प्रदेशातील २८० फुटावर असलेली पाण्याची पातळी ११० फुटावर आली. धरणाचे पाणी तर नाहीच आणि पावसाच्या पाण्याची हमी नाही, अशा कात्रीत सापडलेल्या शेतकर्‍याला तंत्रआधारित जलसंधारणाच्या माध्यमातून बारमाही पाणी उपलब्ध झाले.





०४:१६, ३० मे २०१६ ची आवृत्ती

शिरपूर पॅटर्न हा जलसंधारणाचा धुळे जिल्ह्यात २००६ सालापासून राबवला गेलेला एक कार्यक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील निवृत्त भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर याचे निर्माते आहेत.

शिरपूर येथे अमरीशभाई पटेल या आमदारांतर्फे खानापूरकरांनी हा कार्यक्रम राबवला.

शिरपूर आणि परिसरात काळ्या मातीच्या थरानंतर रेतीचा थर आणि त्या खाली पिवळ्या मातीचा थर आहे. पिवळी माती पाण्याचा निचरा खाली होऊ देत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी खोलवर मुरत नाही. बंधारे नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊन तापी नदीत मिळते. पावसाळ्याचे दोन महिन्यांनतर पुन्हा पाणीटंचाई होते. या जलसंधारण कार्यक्रमाअंतर्गत विविध नाल्यांमध्ये दीडशेपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येतात. दोन बंधार्‍यांमध्ये ५०० मीटरचे अंतर ठेवले जाते. एका नाल्यातील पाणी १८ ते २० ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्यात येते. बंधार्‍याची जाडी सुमारे पाच फूट, रुंदी सुमारे २० ते ३० फूट आणि खोली ४० फुटापेक्षा अधिक असते.

सुरेश खानापूरकर हे महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेतील निवृत्त भूवैज्ञानिक आहेत. शासकीय नोकरीत असताना वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आणि राजकीय पुढार्‍यांच्या मताने त्यांना काम करावे लागे. अभ्यास असूनही उल्लेखनीय कार्य करण्याची संधी त्यांना शासकीय नोकरीत लाभली नाही. शिरपूर येथे अमरीशभाई पटेल यांच्यासारख्या हुशार आणि विकासाने झपाटलेल्या आमदाराने नोकरीतून निवृत्त झालेल्या खानापूरकरांना काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि त्यांनी जलसंधारणात उल्लेखनीय काम करून या संधीचे सोने केले.

शिरपूर आणि परिसरात काळ्या मातीच्या थरानंतर रेतीचा थर आणि त्या खाली पिवळ्या मातीचा थर आहे. पिवळी माती पाण्याचा निचरा खाली होऊ देत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी खोलवर मुरत नसे. बंधारेच नसल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाऊन शेजारीच असलेल्या तापी नदीत मिसळे. पावसाळ्याचे दोन महिने गेले की पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागे. खानापूरकर यांचा जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न हा यावरचा कायमस्वरूपी उपाय ठरला.

शिरपूर तालुक्यात राबविला गेलेल्या या जलसंधारण कार्यक्रमाअंतर्गत विविध नाल्यांमध्ये दीडशेपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात आले. दोन बंधार्‍यांमध्ये ५०० मीटरचे अंतर ठेवले गेले. एका नाल्यातील पाणी १८ ते २० ठिकाणी बंधारे बांधून पाणी अडविण्यात आले. बंधार्‍याची जाडी सुमारे पाच फूट, रुंदी सुमारे २० ते ३० फूट आणि खोली ४० फुटापेक्षा अधिक होती.

या बंधार्‍याचा उपयोग शेतकरी नाल्याच्या या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी रस्ता म्हणून करतात. पावसाचे पाणी पहिल्या बंधार्‍यात अडल्यानंतर तो भरल्यावरच दुसर्‍या बंधार्‍यात जाते. अशा प्रकारे सर्व बंधारे भरण्यास भरपूर वेळ लागतो आणि नाल्यातील पाणी नदीत वाहून जात नाही. ते पूर्णपणे जमिनीत आणि शेतात मुरते. परिणामी शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात राहते. जमिनीची भूक भागवली गेली की पाणी शिल्लक राहते. ४० फूट खोल बंधार्‍यात कोट्यवधी लिटर पाणी साचून राहाते. या पद्धतीमुळे परिसरातील कोरड्या झालेल्या विहिरी आणि ट्यूब वेल्सना पाणी उपलब्ध झाले. या बंधार्‍यांना दरवाजा आणि सांडवाही नसतो.

शिरपुरातील बहुतांश बंधार्‍यांमध्येभर उन्हाळ्यातही १५ ते २० फुटांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असते. या पाण्यावर शेतकर्‍यांचे ओलित सुरू असते. गुरांसाठीही पाणी असते. ग्रामीण भागातील महिला याच पाण्याने कपडे धूत असतात. पाऊस लांबला तर ट्यूब वेल्सच्या माध्यमातून पिकांना पाणी देणे सुरू होते.. शिरपूर पॅटर्नमुळे कुणीही वापरा असे पाणी फुकट उपलब्ध झाले आहे. तसेच गावातील विहिरींना मुबलक पाणी आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अजूनही पावसाचा पत्ता नसताना शिरपूर परिसरात मुबलक पाणी उपलब्ध आहे,

खानापूरकर यांनी शिरपूरमध्ये लोकसंख्येच्या दीडपट कडूनिंबाची झाडे लावली आहेत. गावाची लोकसंख्या ८० हजार असताना एक तेथे १ लाख २० हजार झाडे त्यांनी लावली. ती सर्व झाडे जगली आहेत.

शिरपूर परिसरातील शेतकरी वर्षात दोन ते तीन पिके घेत आहेत. १० वर्षात जलसंधारणाच्या कामावर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. दोन एकरातील काकडी शेतकर्‍याला तीन महिन्यात तीन लाख रुपये मिळतात. दोन एकरातील भेंडी ४ लाख रुपये देते. त्यामुळे शेतकर्‍याची एकही आत्महत्या या भागात नाही.

तापी आणि पूर्णा नदीचा भाग हा गाळाचा प्रदेश आहे. पावसाचे पाणी अथवा धरण भरल्यानंतर वाया जाणारे पाणी शुद्ध करून, गाळून ते पाणी जर या भागांमधील कोरड्या विहिरीत वरून टाकले तर या विहिरींद्वारे ते पाणी जमिनीत जाऊन पाण्याची पातळी वाढू शकते. हे धुळे जिल्ह्यात सिद्ध झाले. सुरेश खानापूरकर यांनी शिरपूरमध्ये राबवलेल्या या पद्धतीनुसार कोरड्या विहिरीजवळ १० बाय १० फूट या आकाराचे २ टाके बांधले.. पहिले टाके रिकामे ठेवून व दुसर्‍या टाक्यात तळाशी गोल गोटे, त्यावर जाड रेती व नंतर बारीक रेती असे थर दिले.. पहिल्या टाक्यात पाणी आल्यावर त्याठिकाणी गाळ खाली बसला आणि ते पाणी दुसर्‍या टाक्यात गेले.. तेथे ते गाळले जाऊन टाक्याच्या तळाशी असलेल्या पाईपमधून विहिरीत गेले. या पद्धतीमुळे ६० हजार लिटर प्रतितास या वेगाने पाणी विहिरीत जाते, पण विहीर भरत नाही. या पद्धतीत १८ गावांमधील अजिबात पाणी नसलेल्या ५९ विहिरी निवडण्यात आल्या. पावसाळ्यात वाया जाणारे पाणी या विहिरींमध्ये टाकण्यात आले. सतत दोन महिने हा प्रयोग केल्यानंतर सुमारे २ किलोमीटर अंतरावरील कूपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी शंभर ते दीडशे फूट वाढली.

शिरपूर तालुक्यात दीडशे गावांमध्ये हे काम सुरू आहे. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नमुळे बसाल्ट असलेल्या दगडातील पाण्याची पातळी जमिनीपासून २५ फुटावर आली. तापीच्या गाळाच्या प्रदेशातील २८० फुटावर असलेली पाण्याची पातळी ११० फुटावर आली. धरणाचे पाणी तर नाहीच आणि पावसाच्या पाण्याची हमी नाही, अशा कात्रीत सापडलेल्या शेतकर्‍याला तंत्रआधारित जलसंधारणाच्या माध्यमातून बारमाही पाणी उपलब्ध झाले.