"गजानन यशवंत चिटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ. ग.य. चिटणीस'''(पूर्ण नाव गजानन यशवंत चिटणीस) हे पुरोगामी विचारा...
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(काही फरक नाही)

१०:५९, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

डॉ. ग.य. चिटणीस(पूर्ण नाव गजानन यशवंत चिटणीस) हे पुरोगामी विचारांचे आणि पुरोगामी विचारांच्या लेखक, नाटककार मंडळींशी संबंधित असून त्यांना नाटकांचीही आवड होती. ते रॉयवादी विचारसरणीचे होते. मराठी रंगभूमीवर ' नाट्यमन्वंतर ' ने. आधुनिक विचारांचे वारे आणले. ही संस्था स्थापन करण्यात डॉ. चिटणीस यांचा वाटा होता. वर्तक, अनंत काणेकर, के. नारायण काळे प्रभृतींसमवेत चिटणीस यांनी ' नाट्यमन्वंतर ' द्वारे रंगभूमीवर लेखक श्रीधर विनायक वर्तक यांचे ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक आणले. या नाटकात ग.य. चिटणीसांची भूमिका होती.

त्यांची पत्नी अभिनेत्री लीला चिटणीस. माहेरच्या लीला नगरकर. त्यांच्या या विवाहात लीला नगरकरांचे वय १६ वर्षे होते. डॉ.ग.य.चिटणीस यांच्यामुळेच लीला चिटणीसांचा नाटकांशी आणि पुढे चित्रपटांशी संबंध आला. या जोडप्याला चार मुले झाली, आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या पहिल्या तीन मुलांची नावे मानवेंद्र, विनय आणि राज.

डॉ. ग.य.चिटणीस आणि त्यांच्या पत्नी लीला चिटणीस यांचा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंध होता. मार्क्सवादी नेते मानवेंद्रनाथ रॉय यांना घरी आश्रय दिल्याबद्दल ते दोघे अटक होताहोता वाचले.

मराठी पत्रकार परिषदेचे तिसरे अधिवेशन केसरीचे संपादक ज.स. करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत भरले. या अधिवेशनात व्यावसायिक प्रश्नांबरोबरच महाराष्ट्र राज्य निर्मितीचा विचार झाला. या परिषदेत डॉ. ग.य. चिटणीस यांनी याबाबत ठराव मांडला होता व प्रभाकर पाध्ये यांनी त्याला अनुमोदन दिले होते..

डॉ. ग.य. चिटणीस लेखकही होते. त्यांनी लिहिलेली पुस्तके -

डॉ. ग.य.चिटणीस यांनी लिहिलेली पुस्तके

  • कुसुम (आशिया प्रकाशन)
  • गांधीवादाचे समर्थन
  • नवा पाईक (रामकृष्ण प्रकाशन मंडळ)
  • माझ्या आठवणी (पॉप्युलर प्रकाशन)
  • विजू