"भालचंद्र वनाजी नेमाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
ओळ ८१: ओळ ८१:
==पुरस्कार==
==पुरस्कार==
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]], [[इ.स. १९९०]] - [[टीकास्वयंवर]] या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]], [[इ.स. १९९०]] - [[टीकास्वयंवर]] या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी
* कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार(इ.स. २०१३). एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते.


==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

१६:३३, १ मार्च २०१३ ची आवृत्ती

भालचंद्र वनाजी नेमाडे
जन्म नाव भालचंद्र वनाजी नेमाडे
जन्म २७ मे १९३८
सांगवी, खानदेश, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी,कविता,समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती कोसला
वडील वनाजी
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार

भालचंद्र वनाजी नेमाडे (जन्म: २७ मे १९३८, सांगवी, खानदेश) हे मराठी लेखक व टीकाकार आहेत.

शिक्षण

शिक्षण : खानदेशात मॅट्रिक(१९५५), (बी.ए.१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. १९६१, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- १९६४. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.

व्यवसाय : इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर(१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of oriental and African studies, London (१९७१-७१), आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.

कोसला: पहिली कादंबरी(१९६३)

कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.

कोसलानंतर

कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबऱ्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.

पुस्तके

कादंबऱ्या
  • कोसला(१९६३)
  • जरीला(१९७७)
  • झूल (१९७९)
  • बिढार (१९६७)
  • हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)
  • हूल
कविता संग्रह
  • देखणी
  • मेलडी (१९७०)
समीक्षा
  • टीकास्वयंवर
  • तुकाराम
  • मुलाखती
  • साहित्याची भाषा
  • सोळा भाषणे
  • Indo-Anglian Writing
  • The Influence of English on Marathi : A Sociolinguistic and Stylistic Study

नेमाडे यांच्‍या साहित्‍यावर आधारित लेख

  • एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा
  • खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
  • नेमाड्यांचा लेखकराव होतो तेव्‍हा
  • मेलडी - भालचंद्र नेमाडे
  • रसग्रहण स्‍पर्धाः ‘हिंदू’ – भालचंद्र नेमाडे

भालचंद्र नेमाडे यांच्‍यावरील इतर लेखन

  • भालचंद्र नेमाडे: साहित्याचे समृद्ध जाळे...
  • ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार
  • भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. १९९० - टीकास्वयंवर या टीकाशास्त्रावरील पुस्तकासाठी
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार(इ.स. २०१३). एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते.

बाह्य दुवे

सानप किशोर :भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी सानप किशोर :भालचंद्र नेमाडे यांची समीक्षा सोनटक्के देवानंद : समीक्षेचा अंत:स्वर, पद्मगंधा प्रकाशन पुणे.