Jump to content

मासवण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मासवण हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.हा भाग गुजरात राज्याला लागून आहे व उत्तर कोकणपट्टीत मोडतो.

हे गाव पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेला माहीम-मनोर राज्यमार्गावर १३ किमीवर सूर्या नदीवर वसलेले आहे. सूर्यानदीवरील पूल ओलांडल्यावर लगेच मासवण गावाची हद्द चालू होते. गावाच्या पश्चिमेकडून वर्षभर सूर्यानदी वाहत असते. मुसळधार पावसाळ्यात कोकणातील नद्याप्रमाणे ती दुथडी भरून वाहत असते आणि काही वेळा वाहतूकसेवा बंद होऊन लोकांचा संपर्क तुटतो.

  ?मासवण

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१४०४
• +०२५२५
• एमएच४८
संकेतस्थळ: http://villagemap.in/maharashtra/thane/palghar/2726400.html

जनजीवन

[संपादन]

मुख्यतः वंजारी,कुणबी,व आदिवासी समाजाच्या लोकांची ह्या भागात वस्ती आहे.शेती व बागायती हा परंपरागत व्यवसाय असून जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आणि घरगुती स्तरावर कुक्कुटपालन केले जाते. सूर्यानदीवर अगदी छोट्या प्रमाणात लहान जाळी वापरून मासेमारी केली जाते.नवीन पिढी सरकारी,खाजगी नोकरीसाठी पालघर तसेच विरार मुंबई येथे स्थायिक झालेली आहे.काही लोक व्यवसायानिमित्ताने पालघर, मुंबई येथे रोज ये-जा करीत असतात. हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४०२ कुटुंबे राहतात. एकूण १६६७ लोकसंख्येपैकी ८२५ पुरुष तर ८४२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.१२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७९.९२ आहे तर स्त्री साक्षरता ७०.४६ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या २१२ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १२.७२ टक्के आहे.

१२४ वर्षे पूर्ण झालेला गणेशोत्सव

[संपादन]

इथला सार्वजनिक गणेशोत्सव हा इसवी सन १९०२ मध्ये सुरू केला आहे.ह्यावर्षी (इसवी सन २०२५) त्याला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत.इसवी सन १९०२ मध्ये ज्यावेळी गणपतीची स्थापना करण्यात आली त्यावेळी दस्तुरखुद्द लोकमान्य टिळकांनी स्वतः मासवण गावाला भेट दिली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू करण्यामागे असलेली त्यांची भूमिका मासवण गावातील लोकांसमोर मांडली होती. त्याचवेळी एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली होती आणि त्यानुसार मासवण गावात गावाचा एक गणपती मांडायला सुरुवात झाली. एक गाव एक गणपती साठी जमणारा निधीमधून गावातील आदिवासी व वंजारी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येतो. गणपती उत्सव मंडळ गावात नैसर्गिक आपत्ती काळात कायम मदत करीत असते. सुरुवातीला गणपती दरवर्षी कोणतेही एक घर निवडून त्या घरात मांडला जात असे. असा दरवर्षीचा क्रम चाळीस वर्षे चालला. नंतर इसवी सन १९८५ मध्ये गावात समाज मंदिराची वास्तू बांधण्यात आली आणि तेव्हापासून दरवर्षी त्या समाजमंदिरात गणपतीची स्थापना करण्यात सुरुवात झाली.[]

नागरी सुविधा

[संपादन]

ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक स्वच्छता,पाणीपुरवठा, वीजपुरवठा,आरोग्यसेवा उपलब्ध केलेली आहे.पालघरहून मनोरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस मासवणला थांबतात. पालघरहून रिक्षाची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
  2. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
  3. https://villageinfo.in/
  4. https://www.census2011.co.in/
  5. http://tourism.gov.in/
  6. https://www.incredibleindia.org/
  7. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  8. https://www.mapsofindia.com/
  9. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  10. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  11. https://transport.maharashtra.gov.in/
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार,१ सप्टेंबर २०२५