भारतीय नाविक बंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय नाविक बंड स्मारक
motín de la Marina Real India (es); বোম্বাই নৌবিদ্রোহ (bn); भारतीय नाविक बंड (mr); ଜଳସେନା ବିଦ୍ରୋହ (or); 皇家印度海军兵变 (zh); جہازیاں دی بغاوت (pnb); 英印海軍の反乱 (ja); Ammutinamento della Royal Indian Navy (it); 皇家印度海軍兵變 (zh-hk); جہازیوں کی بغاوت (ur); ഇന്ത്യൻ നാവിക സമരം (ml); Bombay isyanı (tr); 皇家印度海軍兵變 (zh-hant); जलसेना विद्रोह (hi); ರಾಯಲ್ ಇಂಡಿಯನ್ ನೇವಿ ದಂಗೆ (kn); ਰਾਇਲ ਇੰਡੀਅਨ ਨੇਵੀ ਵਿਦਰੋਹ (pa); Royal Indian Navy mutiny (en); ఇండియన్ రాయల్ నేవీ తిరుగుబాటు (te); 皇家印度海军兵变 (zh-hans); பம்பாய் கலகம் (ta) motín contra el Raj británico en febrero de 1946 (es); ১৯৪৬ সালে সংঘটিত ভারতীয় নৌসেনার বিদ্রোহ (bn); 1946 ബ്രിട്ടീഷ് ഇന്ത്യൻ നാവികസേനയിൽ ഇന്ത്യൻ നാവികർ നടത്തിയ സമരങ്ങളും കലാപങ്ങളും (ml); ब्रिटिश राज के खिलाफ फरवरी १९४६ विद्रोह (hi); ಫೆಬ್ರುವರಿ 1946 ಬ್ರಿಟಿಷ್ ರಾಜ ವಿರುದ್ಧ ದಂಗೆ (kn); ବ୍ରିଟିଶ ରାଜ ବିରୁଦ୍ଧରେ ଫେବୃୟାରୀ ୧୯୬୪ ମସିହାରେ ଏକ ବିଦ୍ରୋହ (or); February 1946 mutiny against British Raj (en); १९४६मधील ब्रिटिश भारतीय सरकारविरुद्धचा उठाव (mr); இந்திய விடுதலைப் போராட்ட வழக்கு (ta) नौसेना विद्रोह (hi); ନୌସେନା ବିଦ୍ରୋହ (or); インド海軍の反乱, 王室インド海軍反乱 (ja); 孟买兵变, 皇家印度海軍兵變 (zh); Royal Indian Navy Mutiny (ml); பாம்பே கலகம், வேந்திய இந்தியக் கடற்படைக் கலகம் (ta)
भारतीय नाविक बंड 
१९४६मधील ब्रिटिश भारतीय सरकारविरुद्धचा उठाव
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
ह्याचा भागभारताचा स्वातंत्रलढा
आरंभ वेळफेब्रुवारी १८, इ.स. १९४६
शेवटफेब्रुवारी २३, इ.स. १९४६
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारतीय नाविक बंड (याला राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड) किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) हे ब्रिटिश भारतीय आरमारामध्ये झालेले बंड होते. याची सुरुवात १८ फेब्रुवारी, १९४६ रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांच्या संपाने झाली. त्यानंतर मुंबईमध्ये उघड बंडाची सुरुवात होऊन हे लोण कराची ते कोलकाता असे पूर्ण ब्रिटिश भारतात पसरले आणि तेथील नाविकांकडून त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधील २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.[१][२]

ब्रिटिश सरकारने हे बंड ब्रिटिश सैनिक आणि शाही नौदलाच्या युद्धनौकांचा बळाचा वापर करून चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने या संपाचा निषेध केला होता.

उठावाचा इतिहास[संपादन]

१८ फेब्रुवारी, १९४६रोजी शाही भारतीय नौसेनेच्या खलाशी व इतर खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कामगारांनी कामाच्या परिस्थितींबाबत तक्रार करत बंद पुकारला. त्यांना मिळणारे राहाण्याच्या ठिकाणाचा आणि अन्नाचा निकृष्ट दर्जा हे या संपाचे तात्कालिक कारण होते.[३] १९ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत याचे नेतृत्व करण्यासाठी केंद्रीय समिती निवडण्यात आली. या समितीचे नेते म्हणून सिग्नलमॅन लेफ्टटनंट मोहम्मद शरिफ आणि पेटी ऑफिसर टेलिग्राफिस्ट मदन सिंग यांची प्रधान आणि उपप्रधान म्हणून एकमताने नेमणूक करण्यात आली[४] या बंदाला भारतीय जनतेमध्ये थोड्याफार प्रमाणात पाठिंबा मिळाला होता, परंतु बहुतांश राजकीय नेत्यांनी पाठिंबा देण्याचे टाळले हो.[५]

घटनाक्रम[संपादन]

मुंबईतील कुलाबा येथील स्मारक

दुसऱ्या महायुद्धात शाही भारतीय नौदलाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला. १९३९ ते १९४५ दरम्यान या दलाचा आकार दहा पटीने वाढला. युद्धपरिस्थितीमध्ये लष्करातील भरती लढवय्या जमातींमधून न करता मिळेल त्या विविध सामाजिक स्तरातील पुरुषांची केली गेली होती. १९४२ ते १९४५ दरम्यान भारतीय साम्यवादी पक्षाच्या नेत्यांनी नाझी जर्मनी विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश भारतीय सेना आणि शाही भारतीय नौदलातील मोठ्या प्रमाणवरील भरती साठी मदत केली ज्यामध्ये प्रामुख्याने साम्यवादी कार्यकर्त्यांचा समावेश होता. पण युद्ध संपल्यानंतर, नव्याने भरती झालेले लोक ब्रिटिशांविरुद्ध उठले.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Beyond Talwar: a cultural reappraisal of the 1946 Royal indian Navy Mutiny", The Journal of Imperial and Commonwealth History, Volume 43, Issue 3, 2015
  2. ^ Notes on India By Robert Bohm.pp213
  3. ^ "Mumbai and the Great Naval Mutiny". Archived from the original on 2018-01-27. 2018-01-26 रोजी पाहिले.
  4. ^ Encyclopaedia of Political Parties. By O.P. Ralhan pp1011 आयएसबीएन 81-7488-865-9
  5. ^ Glimpses of Indian National Movement. By Abel M. pp257.आयएसबीएन 81-7881-420-X
  6. ^ The Great Royal Indian Navy Mutiny of 1946 By Javed Iqbal