१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती. १९५१ मध्ये भारताची लोकसंख्या १८,५५,२८,४६२ पुरुष आणि १७,५५,५९,६२८ स्त्रिया अशी एकूण ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद) होती. १९५१ मध्ये एकूण लोकसंख्या ही स्वातंत्र्याअगोदरच्या जनगणनेपेक्षा १३.३१% ने अधिक वाढली होती. [१]