जयंत पाटील
| श्री. जयंतराव पाटील | |
| मतदारसंघ | इस्लामपुर |
|---|---|
| जन्म | फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ साखराळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| राजकीय पक्ष | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
| पत्नी | सौ. शैलजा पाटील |
| अपत्ये | राजवर्धन, प्रतिक |
| निवास | साखराळे, इस्लामपुर |
| धर्म | हिंदू |
जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ - ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.
मंत्री
[संपादन]- राज्याचा सर्वाधिक ९ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
२००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला होता, त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
- त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे शेकापचे जेष्ठ नेते होते.
जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे.
- जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदामंत्री आहेत.
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते.
त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे.
- विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
भुषविलेली पदे
[संपादन]- मंत्रीमंडळात
- अर्थमंत्री
- ग्रामविकासमंत्री
- गृहमंत्री
- जलसंपदा मंत्री
- संसदीय राजकारणात
- गटनेते(विधानसभा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (२०१०-२०२३)
- विधीमंडळ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार
जीवन
[संपादन]जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. ते सिविल इंजिनीअर आहेत. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांना पुढील शिक्षण जे परदेशात घ्यायचे होते ते घ्यायला जाता आले नाही, नंतर ते शेकाप मधून राजकारणात रूजु झाले. यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला व नंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा झाला. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा ९ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे.
- सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि महत्त्वाचे राजकारणी म्हणून ओळख आहे. राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाला उभारी आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |