वाय.एस. राजशेखर रेड्डी
वाय.एस. राजशेखर रेड्डी हे (जन्म: जुलै ८,इ.स. १९४९ म्रूत्यू सप्टेंबर २ इ.स. २००९) हा काँग्रेस पक्षाचा नेते आणि इ.स. २००४ ते मृत्यूपर्यंत आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री होता. २ सप्टेंबर २००९ रोजी एका सर्वेक्षणासाठी गेले असताना त्यांचे हेलीकॉप्टरला झालेल्या अपघातात हा मृत्यू पावला.
खाजगी जीवन [संपादन]
रेड्डीच्या पत्नीचे नाव विजया लक्ष्मी आहे.[१] त्यांचा मुलगा वाय.एस. जगन मोहन रेड्डी राजकारणी आहे. हा कडप्पा लोकसभा मतदारसंघातून ५ लाखापेक्षा जास्त बहुमताने निवडून आला.[२][३] राजशेखर रेड्डीला शर्मिला नावाची एक मुलगीही आहे. राजशेखर रेड्डीचा भाऊ वाय.एस. विवेकानंद रेड्डी काँग्रेसचा पुढारी आहे.
राजशेखर रेड्डीचे कुटुंब ख्रिश्चन असून [४] त्याने बेथलेहेमसह अनेक ख्रिश्चन तीर्थस्थळांची अनेकदा यात्रा केली होती. याशिवाय तो तिरुपतीचीही नियमीतपणे यात्रा करीत असे.[२][५][६].
मृत्यू [संपादन]
प्रशासन गावापर्यंत या मोहिमेवर निघालेले रेड्डीचे हेलिकॉप्टर बुधवारी सकाळी ९.३५ च्या सुमारास बेपत्ता झाले. त्या वेळी रेड्डी यांच्यासोबत मुख्य सचिव ए. सुब्रह्मण्यम आणि मुख्य सुरक्षा अधिकारी ए.एस.सी. वेस्ली आणि दोन वैमानिकही होते. चित्तूरकडे निघालेले हे हेलिकॉप्टर कनुर्लपासून पुढे गेल्यानंतर दिशा बदलून पूर्वेला आत्माकूडच्या दिशेने गेले. वेलुगोडु आणि संतजुडुरु या दोन गावांच्यामध्ये असलेल्या डोंगरावरील झाडावर ते आदळले आणि कोसळले. त्याचे वेळी स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. मृत्यूपश्चात राजशेखर रेड्डीला संपूर्ण सरकारी इतमामासह ख्रिश्चन पद्धतीनुसार दफन करण्यात आले.[७]
आंध्र प्रदेश सरकारने कडप्पा जिल्ह्याचे नाव बदलून वायएसआर कडप्पा जिल्हा असे ठेवले आहे.