"गोविंद पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
गो.पु. देशपांडे (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : १६ ऑक्टोबर २०१३)हे एक मराठी नाटककार होते. <br />
'''गो.पु. देशपांडे''' (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : १६ ऑक्टोबर २०१३)हे एक मराठी नाटककार होते. <br />
नाशिक जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला आणि नंतर परदेशी गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. कॉलेजमध्ये ते चिनी भाषा शिकवीत.
नाशिक जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला आणि नंतर परदेशी गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. कॉलेजमध्ये ते चिनी भाषा शिकवीत.



००:५०, १७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

गो.पु. देशपांडे (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : १६ ऑक्टोबर २०१३)हे एक मराठी नाटककार होते.
नाशिक जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी मुंबईला आणि नंतर परदेशी गेले. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. कॉलेजमध्ये ते चिनी भाषा शिकवीत.

गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण ज्योती सुभाष. ज्योती सुभाष आणि त्यांची कन्या अमृता सुभाष या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत.

गो.पु. देशपांडे यांनी इंग्रजी-मराठीत वैचारिक, रंगभूमीविषयक, राजकीय आणि साहित्यविषयक लेखन भरपूर केले.
प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात गो.पु. देशपांडे यांनी विचारनाट्याची धारा पहिल्यांदा निर्माण करण्याचा यत्न केला. राजकीय जाणिवा ही या लेखनामागची प्रेरणा आहे. गो.पु. देशपांडे हे अनेक राजकीय चळवळींचे साक्षीदार होते; पूर्वी काहीसे संबंधितही होते. जाणतेपणाने त्यांनी राजकीय चळवळींचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्या नाटकातील विचारांना आणि आशयाला एक प्रकारची विश्वासार्हता होती.

गो.पु. देशपांडे यांनी लिहिलेली नाटके आणि इतर वाङ्‌मय

  • अंधारयात्रा (नाटक)
  • अस्सा नवरा सुरेख बाई (नाटक)
  • इत्यादी इत्यादी कविता (कवितासंग्रह)
  • उध्वस्त धर्मशाळा (नाटक)
  • एक वाजून गेला आहे (नाटक)
  • चर्चक निबंध (भाग १, २) (निबंधसंग्रह)
  • चाणक्य विष्णुगुप्त (नाटक)
  • मामकाः पाण्डवाश्चैव (नाटक)
  • रस्ते (नाटक)
  • रहिमतपुरकरांची निबंधमाला भाग १-नाटकी निबंध (लेखसंग्रह)
  • शेवटचा दिस (पुण्याच्या दैनिक सकाळमधली राजकीय लेखमाला)
  • सत्यशोधक (हिंदी-मराठी नाटक)