सियाचीन हिमनदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सियाचीन हिमनगचे उपग्रहीय चित्र

सियाचीन हिमनदी हे भारताच्या हद्दीतील सर्वात उत्तरेचे टोक आहे. या हिमनदीची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची २२,००० फूट आहे. ह्या हिमनदीचा जगातील सर्वात मोठ्या हिमनद्यांत समावेश होतो. सियाचीन हिमनदीवर पाकिस्ताननेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे भारताने येथे कायमस्वरूपी चौकी स्थापन केली आहे. येथे भारताच्या व पाकिस्तानच्या लष्करांच्या नेहमी चकमकी होत असतात. सियाचीन हिमनदीवर अतिशय टोकाचे थंड हवामान असल्याने बरेचसे सैनिक तसल्या गोठवणाऱ्या हवामानामुळे मृत्युमुखी पडतात.

सियाचीन हिमनदी ही काराकोरम पर्वत रांगेमध्ये आहे. हिची एकूण लांबी ७० किमी इतकी असून ती काराकोरम पर्वतरांगांमधील सर्वात लांब हिमनदी आहे व अध्रुवीय हिमनद्यांमध्ये लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची हिमनदी आहे.35°30′N 77°00′E / 35.5°N 77.0°E / 35.5; 77.0. (सर्वात लांब अध्रुवीय हिमनदी ताजिकिस्तानची फेडचेंको हिमनदी आहे. तिची लांबी ७७ किमी इतकी आहे.) भारताने जवळपास ह्या हिमनदीच्या व मुख्य हिमनदीला मिळणाऱ्या सर्व उपहिमनद्यांवर नियंत्रण प्रस्थापित केले आहे.

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

जम्मू काश्मीरच्या नकाशात सियाचीनचे स्थान

सियाचीन हिमनदीमध्ये अतिशय टोकाचे हवामान असले तरी सियाचीन या शब्दाचा अर्थ होतो की जंगली फुलांची जागा. कदाचित या नदीखोऱ्याच्या कमी उंचीच्या भागात आढळणाऱ्या फुलांमुळे हे नाव पडले असावे.

नद्या[संपादन]

सियाचीनचे वितळणारे पाणी हे नुब्रा नदीला मिळते. ही नदी पुढे श्योक नदीला मिळते. ती सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी आहे. म्हणून सियाचीन हिमनदी सिंधू नदीसाठी एक महत्त्वाची उपनदी आहे. जागतिक तापमानवाढीचे परिणाम ह्या हिमनदीवरही दिसत असून हिमनदी वितळण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच मोसमी पावसाने वितळण्यास हातभार लागत आहे. असे मानले जाते की हिमनदीचा आकार गेल्या २० वर्षात ३५ टक्यांनी घटला आहे. १९८४ नंतरचे सातत्याचे युद्धही हिमनदीचे सौंदर्य बिघडवण्यास जवाबदार असल्याचे मानले जाते. [१]

विवाद[संपादन]

भारत आणि पाकिस्तान दोघेही संपूर्ण सियाचीन प्रदेशावरील सार्वभौमत्वाचा दावा करतात. १९७० आणि १९८० च्या दशकात, अमेरिका आणि पाकिस्तानी नकाशे काराकोरम पासवर कारा ९८४२ (भारत-पाकिस्तान युद्धविराम रेषा, ज्याला लाइन ऑफ कंट्रोल देखील म्हणतात) पासून एक ठिपकेदार रेखा दर्शविते. , भारत कार्टोग्राफिक त्रुटी आणि सिमला कराराचे उल्लंघन मानले जाते. 3 0 19 मध्ये भारताने सैन्य ऑपरेशन मेघदूत सुरू केले, ज्याने सियाचीन ग्लेशियरच्या सर्व उपनगरासह भारतावर नियंत्रण ठेवले. १९८४ ते १९९९ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात वारंवार युद्ध झाले. ऑपरेशन मेघदूतच्या अंतर्गत, भारतीय सैन्याने सियाचिन ग्लेशियरच्या पश्चिमेस, साल्तोरो रिजवरील बहुतेक बळकट उंची पकडण्यासाठी पाकिस्तानच्या ऑपरेशन अबीलीला केवळ एक दिवसच बाहेर काढले. तथापि, युद्धापेक्षा या भागात कठोर हवामानामुळे अधिक सैनिक मरण पावले आहेत. ग्यारी सेक्टर हिमस्खलन २०१२ मध्ये पाकिस्तानी सैनिक ठार झालेल्या २००३ ते २०१० या काळात पाकिस्तानने सियाचीनजवळ नोंदवलेल्या विविध कारवाईत ३५३ सैनिक गमावले.[२]

सियाचीनवरील पुस्तके[संपादन]

  • ओळख सियाचेनची - जगातील सर्वात जास्त उंचीवरील युद्धभूमी (लेखिका - अनुराधा गोरे)
  • सियाचीन अंतहीन संघर्ष (हिंदी, लेखक - लेफ्टनंट जनरल व्ही.आर. राघवन)

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Zee News - Siachen glacier melting fast due to military activity: study
  2. ^ "Siachen deaths harden resolve to hold glacier: Army chief". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-03-04 रोजी पाहिले.