"देऊर कोठार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''देऊर कोठार''' हे मध्य भारतातल्या मध्य प्रदेशात असलेले पूराणवस्तुसंशोधनाचा दृष्टीने महत्वाचे असे एक ठिकान आहे. तेथील बौद्ध स्तूपांसाठी हे ओळखले जाते. १९८२ साली संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. हे स्तूप बांधण्याचे श्रेय, मौर्य सम्राट अशोक यांना दिले जाते.
'''देऊर कोठार''' हे मध्य भारतातल्या मध्य प्रदेशात असलेले पूराणवस्तुसंशोधनाचा दृष्टीने महत्वाचे असे एक ठिकान आहे. तेथील बौद्ध स्तूपांसाठी हे ओळखले जाते. १९८२ साली संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. हे स्तूप बांधण्याचे श्रेय, मौर्य सम्राट अशोक यांना दिले जाते.
== या ठिकाणची माहिती ==
रेवा जिल्ह्यातील कतरा नावाच्या खेड्यामध्ये नैऋत्य दिशेला ५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. रेवा - अलाहाबाद मार्गावरील रेवा शहरापासून हे ठिकाण ७५ किलोमीटर अंतरावर आहे. देउर कोठार मधील स्तूप ख्रिस्तपूर्व तीसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक यांनी स्थापलेले असल्याचे समजले जाते. प्राचीन काली हे ठिकाण दक्षिण पथावर म्हणजे दक्षिणेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर होते. हा मार्ग पाटलिपुत्र पासून म्हणजे आजच्या पटणापासून निघून मध्य भारतातून जात, महाराष्ट्रातील प्रतिष्ठानपर्यंत, पूर्व-पश्चिम असा जाणारा होता. सांची, सागर, कौशंबी आणि सारनाथ अशा प्रसिद्ध बौद्ध स्थानांच्या मध्यभागी हे खेडे असल्याने, बौद्ध भिक्खू या देउर कोठारला वरचेवर जात असत.

१९:१४, ३० जुलै २०१७ ची आवृत्ती

देऊर कोठार हे मध्य भारतातल्या मध्य प्रदेशात असलेले पूराणवस्तुसंशोधनाचा दृष्टीने महत्वाचे असे एक ठिकान आहे. तेथील बौद्ध स्तूपांसाठी हे ओळखले जाते. १९८२ साली संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. हे स्तूप बांधण्याचे श्रेय, मौर्य सम्राट अशोक यांना दिले जाते.

या ठिकाणची माहिती

रेवा जिल्ह्यातील कतरा नावाच्या खेड्यामध्ये नैऋत्य दिशेला ५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. रेवा - अलाहाबाद मार्गावरील रेवा शहरापासून हे ठिकाण ७५ किलोमीटर अंतरावर आहे. देउर कोठार मधील स्तूप ख्रिस्तपूर्व तीसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक यांनी स्थापलेले असल्याचे समजले जाते. प्राचीन काली हे ठिकाण दक्षिण पथावर म्हणजे दक्षिणेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर होते. हा मार्ग पाटलिपुत्र पासून म्हणजे आजच्या पटणापासून निघून मध्य भारतातून जात, महाराष्ट्रातील प्रतिष्ठानपर्यंत, पूर्व-पश्चिम असा जाणारा होता. सांची, सागर, कौशंबी आणि सारनाथ अशा प्रसिद्ध बौद्ध स्थानांच्या मध्यभागी हे खेडे असल्याने, बौद्ध भिक्खू या देउर कोठारला वरचेवर जात असत.