"श्रीराम गोजमगुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४७: ओळ ४७:
* नटवर्य छोटू पाटील पुरस्कार
* नटवर्य छोटू पाटील पुरस्कार
* मराठवाडा भूषण पुरस्कार, वगैरे
* मराठवाडा भूषण पुरस्कार, वगैरे
* सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रंगकर्मींना गोजमगुंडे याच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.




{{DEFAULTSORT:गोजमगुंडे, श्रीराम}}
{{DEFAULTSORT:गोजमगुंडे, श्रीराम}}

२३:०४, ३० जून २०१७ ची आवृत्ती

श्रीराम गोजमगुंडे (२५ ऑगस्ट, इ.स. १९४५:लातूर, महाराष्ट्र) - १ डिसेंबर, इ.स. २०१६: मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट निर्माते होते. हे मूळचे लातूरचे होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी गणेशमंडळामध्ये सादर केलेली नाटिका पाहून दयानंद कॉलेजचे त्यावेळचे प्राचार्य के.एच. पुरोहित यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी गोजमगुंडे यांच्यावर टाकली.

श्रीराम गोजमगुंडे यांनी विजया मेहता यांच्या शिबिरात नाट्य प्रशिक्षणा घेतले. त्यांच्या रसबहार नावाच्या नाट्यसंस्थेने कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत पुन्हा पुन्हा मोहन जोदाडे, फास, निष्पर्ण ही तीन विजेती नाटके सादर करून प्रथम पुरस्काराची हॅटट्र‌िक नोंदविली.

पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात गोजमगुंडे यांच्या बंदीशाळा या नाटकाने राज्यनाट्य स्पर्धेत बक्षीसे मिळवली तरी या साठी कारावास झाला.

अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही गोजमगुंडे यांनी काम केले. ते अभिनय आणि दिग्दर्शनाचे प्रथम पुरस्कार तीनदा मिळविणारे पहिले कलावंत आहेत. किशोर मिसकीन यांनी १९७४ मध्ये राजा शिवछत्रपती यांच्यावर काढलेल्या चित्रपटात गोजमगुंडे यांनी छत्रपतींची भूमिका केली होती. ‘झाकोळ’, ‘अंजान भारत’, ‘आपलेच दात, आपलेच ओठ’, ‘सुळावरची पोळी’, ‘पारध’ आदी चित्रपटांत त्यांनी काम केले होते. त्यानी श्रीराम लागू, राज दत्त यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांनी १९८०च्या दशकात ‘झटपट करू दे खटपट’ हा चित्रपट १९८० मध्ये लातूर आणि परिसरात चित्रित केले गेलेल्या मराठी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्यांची या चित्रपटात एक भूमिकाही होती. मराठवाड्यातील ही पहिलीच चित्रपट निर्मिती होती. विधानभवनात या चित्रपटाचा एक वादग्रस्त विषय चर्चेला आला. या चित्रपटाच्या पोस्टरच्या विरोधात औरंगाबादमध्ये एका चित्रपटगृहावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळचे तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख यांनी गोजमगुंडे यांची बाजू घेऊन त्या चित्रपटावरील संकट दूर केले होते. राम कदम यांच्या ‘गड जेजुरी जेजुरी’, ‘पिंजरा प्रीतिचा’, या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या होत्या.

मुंबईत राहणे न परवडल्याने गोजमगुंडे यांनी लातूरमध्ये चित्रपट निर्मिती व नाट्य निर्मिती केली. ‘शेवंता जीती हाय’ या नाटकाची त्यांनी निर्मिती केली होती. दूरदर्शनवर बंदिनी, तिसरा डोळा, १०० या सारख्या मालिकांतही त्यांनी भूमिका केली. नव्या कलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम श्रीराम गोजमगुंडे यांनी केले. २००५ पर्यंत त्यांनी दहा चित्रपटांचे दिग्दर्शन, लेखन व निर्माण केले.

नाटके

नाट्य स्पर्धेसाठी बसवलेली नाटके

  • निष्पर्ण
  • पुन्हा पुन्हा मोहन जोदाडे
  • फास
  • बंदीशाळा

व्यावसायिक नाटके

  • शेवंता जीती हाय

दूरचित्रवाणी मालिका अभिनय

  • तिसरा डोळा
  • दामिनी
  • बंदिनी
  • १००

मराठी चित्रपट

दिग्दर्शन आणि निर्मिती

  • चलबिचल
  • झटपट करू दे खटपट
  • निखारे
  • बाई तिथे घाई

अभिनय

  • अंजान भारत
  • आपलेच दात, आपलेच ओठ
  • गड जेजुरी जेजुरी
  • झाकोळ
  • पारध
  • पिंजरा पिरतिचा
  • या सुखांनो या
  • राजा शिवछत्रपती
  • सुळावरची पोळी

सन्मान आणि पुरस्कार

  • नाटकासाठी आठ राज्यस्तरीय सुवर्णपदके
  • नटवर्य छोटू पाटील पुरस्कार
  • मराठवाडा भूषण पुरस्कार, वगैरे
  • सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रंगकर्मींना गोजमगुंडे याच्या नावाचे काही पुरस्कार दिले जातात.