"पुष्पलता रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३: ओळ १३:


कीर्तनाद्वारे त्यांना भरपूर पैसा मिळू लागला. पण त्याही परिस्थितीत कीर्तनाच्या उत्पन्‍नातील मोठा वाटा त्यांनी फक्त सामाजिक कार्यावरच खर्च केला. प्रापंचिक खर्चासाठी पती राजाभाऊंच्या मदतीने स्वतःच्या घरात लक्ष्मीरोडवर त्यांनी ''संजीवन'' नावाचा लॉज सुरू केला.
कीर्तनाद्वारे त्यांना भरपूर पैसा मिळू लागला. पण त्याही परिस्थितीत कीर्तनाच्या उत्पन्‍नातील मोठा वाटा त्यांनी फक्त सामाजिक कार्यावरच खर्च केला. प्रापंचिक खर्चासाठी पती राजाभाऊंच्या मदतीने स्वतःच्या घरात लक्ष्मीरोडवर त्यांनी ''संजीवन'' नावाचा लॉज सुरू केला.

==पुष्पलताबाईंचे दातृत्व==
पुष्पलता रानडे यांनी पन्नास वर्षांच्या काळात हजारो कीर्तने करून त्यांतून मिळालेल्या पैशातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थाना उभारणीसाठी व संवर्धनासाठी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. नव्वद वर्षांचे कृतार्थ जीवन जगून त्या उभ्या महाराष्ट्राला लेखिका, कवयित्री व कीर्तनकार म्हणून परिचित झाल्या.

कर्तृत्व, वकृत्व ह्यांबरोबरच पुष्पलताबाई त्यांच्या सहज दातृत्वामुळे जनमानसात मान्यता पावल्या. त्यांनी आपल्या धनसंचयाचा समाजऋणाच्या भावनेतून उत्तम विनियोग केला. आपले पती राजाभाऊ रानडे यांच्या निधनानंतर सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे हताश होऊन न बसता स्थावर आणि जंगमाची योग्य निरवानिरव करून त्यातून प्राप्त झालेल्या धनाचा सदुपयोग करण्याचे व्रतच पुष्पलता रानडे यांनी घेतले होते.

वयोमानपरत्वे आता आपण कीर्तनांतून धनसंचय करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर दानधर्म हेच व्रत असल्यामुळे, ते केल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे ह्या जाणिवेने त्यांनी पुण्यातील लक्ष्मीरोडवरील ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीचे पेशवाई थाटाचे आपले ऐसपैस घर विकून व जवळील सर्व मौल्यवान वस्तूंच्या विक्रीतून मोठी रक्कम जमा केली व झपाटल्याप्रमाणे स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे अनेक संस्थाना अपत्यवत भावनेने योग्यता आणि गरज पाहून लहान-मोठ्या देणग्या देण्याचा सपाटा लावला.







== पुस्तके ==
== पुस्तके ==
ओळ २०: ओळ ३२:
==पुरस्कारांचे आजवरचे मानकरी==
==पुरस्कारांचे आजवरचे मानकरी==


==मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
==पुष्पलता रानडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान==
* जगदगुरू शंकराच्यार्यानी आदर्श कीर्तनकार म्हणून त्यांचा गौरव केला.
* गोवा कला अकादमीतर्फे "कीर्तन संजीवनी" ही उपाधी त्यांना देण्यात आली
* तसेच इतरही अनेक मानसन्मान त्यांना लाभले.


{{DEFAULTSORT:रानडे, पुष्पलता}}
{{DEFAULTSORT:रानडे, पुष्पलता}}

१२:१९, २२ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे (इ.स. १९२० - ११ सप्टेंबर, इ.स. २०१०) या एक मराठी कीर्तनकार आणि लेखिका होत्या.

कौटुंबिक माहिती आणि बालपण

पुष्पलता रानडे यांचे आईवडील हैदराबादला असत. आई लक्ष्मीबाई लेले व मावशी कमलताई टिळक या दोघी लेखिका असून कीर्तने करीत. राजाभाऊ रानडे यांच्याशी लग्न करून त्या वयाच्या १५व्या वर्षी पुण्यात आल्या.

पुण्यात आल्यावर पुष्पलता रानडे यांनी शालेय शिक्षणाबरोबरच संगीताचे आणि नृत्याचे शिक्षण घेतले. त्याचा त्यांना कीर्तनकलेसाठी उपयोग झाला. त्याचबरोबर त्यांनी शिवणाचा, ग्रंथपालनाचा व माँटेसरी शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला तसेच मराठी साहित्यविशारद, हिंदी कोविद आदी पदव्याही त्यांनी संपादन केल्या.

रंगभूमीवरील भूमिका आणि दिग्दर्शन

महाराष्ट्र कलोपासक संस्थेत रानडे यांनी पु.ल.देशपांडे, प्रभुदास भूपटकर, सेवा चौहान, भगवान पंडित, के.नारायण काळे यांच्या बरोबरकाम केले. पु.लं.च्या वयम्‌ मोठम्‌ खोटम्" या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

आर्थिक संकट आणि कीर्तनांतून त्यावर मात

ऐन उमेदीच्या काळात पुष्पलता रानडे व पती राजाभाऊ रानडे ह्याना फार मोठ्या आर्थिक व सामाजिक आघातांना सामोरे जावे लागले. पण कीर्तनानेच त्यांना संकटकाळी आणि आर्थिक ओढग्रस्त परिस्थितीत आधार दिला.

कीर्तनाद्वारे त्यांना भरपूर पैसा मिळू लागला. पण त्याही परिस्थितीत कीर्तनाच्या उत्पन्‍नातील मोठा वाटा त्यांनी फक्त सामाजिक कार्यावरच खर्च केला. प्रापंचिक खर्चासाठी पती राजाभाऊंच्या मदतीने स्वतःच्या घरात लक्ष्मीरोडवर त्यांनी संजीवन नावाचा लॉज सुरू केला.

पुष्पलताबाईंचे दातृत्व

पुष्पलता रानडे यांनी पन्नास वर्षांच्या काळात हजारो कीर्तने करून त्यांतून मिळालेल्या पैशातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थाना उभारणीसाठी व संवर्धनासाठी लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. नव्वद वर्षांचे कृतार्थ जीवन जगून त्या उभ्या महाराष्ट्राला लेखिका, कवयित्री व कीर्तनकार म्हणून परिचित झाल्या.

कर्तृत्व, वकृत्व ह्यांबरोबरच पुष्पलताबाई त्यांच्या सहज दातृत्वामुळे जनमानसात मान्यता पावल्या. त्यांनी आपल्या धनसंचयाचा समाजऋणाच्या भावनेतून उत्तम विनियोग केला. आपले पती राजाभाऊ रानडे यांच्या निधनानंतर सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे हताश होऊन न बसता स्थावर आणि जंगमाची योग्य निरवानिरव करून त्यातून प्राप्त झालेल्या धनाचा सदुपयोग करण्याचे व्रतच पुष्पलता रानडे यांनी घेतले होते.

वयोमानपरत्वे आता आपण कीर्तनांतून धनसंचय करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर दानधर्म हेच व्रत असल्यामुळे, ते केल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे ह्या जाणिवेने त्यांनी पुण्यातील लक्ष्मीरोडवरील ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वीचे पेशवाई थाटाचे आपले ऐसपैस घर विकून व जवळील सर्व मौल्यवान वस्तूंच्या विक्रीतून मोठी रक्कम जमा केली व झपाटल्याप्रमाणे स्वतःला मुलबाळ नसल्यामुळे अनेक संस्थाना अपत्यवत भावनेने योग्यता आणि गरज पाहून लहान-मोठ्या देणग्या देण्याचा सपाटा लावला.




पुस्तके

स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार

पुरस्कारांचे आजवरचे मानकरी

पुष्पलता रानडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • जगदगुरू शंकराच्यार्यानी आदर्श कीर्तनकार म्हणून त्यांचा गौरव केला.
  • गोवा कला अकादमीतर्फे "कीर्तन संजीवनी" ही उपाधी त्यांना देण्यात आली
  • तसेच इतरही अनेक मानसन्मान त्यांना लाभले.