"गोविंद पानसरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २९: ओळ २९:


== मृत्यू ==
== मृत्यू ==
[[१६ फेब्रुवारी]] २०१५ रोजी पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर त्यांच्या कोल्हापुरातील घराजवळच प्राणघातक हल्ला झाला. दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर मोटारसायकलवरून मागून आले. त्यांनी पिस्तूलमधून पानसरे यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले.
[[१६ फेब्रुवारी]] २०१५ रोजी पानसरे आणि त्यांच्या पत्‍नी उमा पानसरे यांच्यावर, त्यांच्या कोल्हापुरातील घराजवळच, मोटारसायकलवरून मागून आलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्‍न केला. नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले. उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे २० फेब्रुवारी २०१५ रोजी [[मुंबई]]मध्ये निधन झाले.

२० फेब्रुवारी २०१५ रोजे त्यांचे मुंबई मध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
==पुरस्कार==
पानसरे यांच्या नावाने ’कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे. पहिला पुरस्कार [[मुक्ता मनोहर]] यांना देण्यात आला. (३ जून, इ.स. २०१५).


{{DEFAULTSORT:पानसरे, गोविंद}}
{{DEFAULTSORT:पानसरे, गोविंद}}

११:०९, ५ जून २०१५ ची आवृत्ती

गोविंद पानसरे (२६ नोव्हेंबर,इ.स. १९३३ - २० फेब्रुवारी, इ.स. २०१५:मुंबई) हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. १९५२ साला पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोल आंदोलनातही अग्रभागी होते. २० फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांचे मुंबई मध्ये निधन झाले. २००३ साली भारतीय पोस्टाने त्यांचे तिकिट प्रकाशित केले.

जीवन

कॉ. गोविंद पानसरे ह्यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९९३ ला जिल्हा अहमदनगर, तालुका श्रीरामपूर मधील कोल्हार गावी झाला. गरीब कष्टकर्‍यांच्या परिवारात ते वाढले. कोल्हार येथून प्राथमिक शिक्षण व राहुरी येथून माध्यमिक शिक्षणानंतर ते उच्चशिक्षणासाठी कोल्हापूरला गेले, जिथे त्यांनी बी.ए. (ऑनर्स) व एल.एल.बी. पूर्ण केले. सुरुवातीला वर्तमानपत्र विक्रेता, मुन्सिपालिटीत शिपाई, माध्यमिक शाळा मंडळात प्राथमिक शिक्षक अशा अनेक नोकर्‍या केल्यानंतर ते शिवाजी विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. सोबत ते कामगार वकीलीसुद्धा करू लागले. पुढे चालून ते कोल्हापुरमधील एक नावाजलेले वकील झाले व अनेक वर्षे कोल्हापुरातील वकीलांच्या संघटनेचे अध्यक्ष राहिले.

चळवळ

कॉ. पानसरे शालेय जीवनापासूनच सामाजिक चळवळींकडे आकर्षित झाले होते. सुरुवातीला राष्ट्र सेवा दल व त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. १० वर्षांसाठी ते भाकपचे महाराष्ट्र सेक्रेटरी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ व गोवा मुक्ती चळवळीत ते सहभागी होते. तडजोड न करता समाजातील सर्वांत जास्त शोषित तबक्यांच्या हक्कांसाठी लढणारे ते कार्यकर्ता होते. ते कष्टकर्‍यांच्या शेकडो संघर्षांमध्ये सहभागी झाले व अनेकांचे नेतृत्वदेखील केले, वेशिषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, घरकामगार, ऑटोरिक्षा युनियन, दुध उत्पादक, झोपडपट्टी रहिवासी, इ. अलीकडेच कोल्हापुरमधील टोलविरोधी आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.

साहित्य

कॉ. पानसरे एक लेखक सुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या सर्वांत प्रसिद्ध लेखणांपैकी आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रति विकल्या गेल्या आहेत.

त्यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.

  1. शिवाजी कोण होता?
  2. मार्क्सवादाची तोंड ओळख
  3. धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
  4. मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न
  5. अजून न स्वीकारलेला मंडल आयोग
  6. मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम
  7. काही कामगार कायद्यांची तोंडओळख
  8. काश्मिरबाताच्या कलम ३७० ची कुळकथा
  9. मुस्लिमांचे लाड
  10. पंचायत राज्याचा पंचनामा
  11. अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
  12. राजर्षी शाहू : वसा आणि वारसा
  13. शेतीधोरण परधार्जिणे
  14. कामगारविरोधी कामगार धोरणे
  15. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी : पर्यायी दृष्टिकोन

मृत्यू

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे आणि त्यांच्या पत्‍नी उमा पानसरे यांच्यावर, त्यांच्या कोल्हापुरातील घराजवळच, मोटारसायकलवरून मागून आलेल्या हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्‍न केला. नंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून भरधाव वेगाने निघून गेले. उपचारादरम्यान गोविंद पानसरे यांचे २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईमध्ये निधन झाले.

पुरस्कार

पानसरे यांच्या नावाने ’कॉम्रेड गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ देण्यास सुरुवात झाली आहे. पहिला पुरस्कार मुक्ता मनोहर यांना देण्यात आला. (३ जून, इ.स. २०१५).