"वासंती (चित्रपट अभिनेत्री)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:


प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. [[संत एकनाथ|संत एकनाथांनी]] आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वत: डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांनी]] वासंतीची पाठ थोपटली होती.
प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. [[संत एकनाथ|संत एकनाथांनी]] आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वत: डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकरांनी]] वासंतीची पाठ थोपटली होती.

'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दु:खाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.

==पुढची कारकीर्द==
'धर्मात्मा' पाठोपाठ 'अमर ज्योती' (दुर्गा खोटे, चंद्रमोहन यांच्यासह), कुंकू (शांता आपटे, केशवराव दाते, राजा नेने, विमला वसिष्ठ यांच्यासह) (हिंदीत 'दुनिया न माने') हे चित्रपट आले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचे मानक स्थापित केले. 'अमर ज्योती'मधील भूमिकेसाठी वासंती 'गौहर सुवर्ण पदका'ची मानकरी झाली. ही भूमिका खास वासंतीसाठी निर्माण केली होती. वासंतीनं तिचे चीज केले.

'अमरज्योती' या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही 'प्रभात'ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.

==पगारावर नेमणूक==
'रणजित मूव्हीटोन' या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतले. घोरपड्यांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता.. 'संत तुलसीदास' हा 'रणजित'चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' असा किताबही वासंतीला मिळाला.

==संगीताचे शिक्षण==
जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. [[वामनराव सडोलीकर]] हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.

==नाट्यसृष्टीत प्रवेश==
चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाट्य महोत्सवात 'संगीत शारदा' हे नाटक करायचे ठरले. वासंतीला शारदेचे काम दिले गेले. कोदंड-गंगाधरपंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपंत गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका पं. [[वामनराव सडोलीकर]] (वासंतीच्या बहिणीचे पती) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदे आणि संवाद-अभिनय शिकवताना सधोलीकर (भाऊ) अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले.
प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. ''पोरी, तू रडवलंस आम्हाला'' असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.





२२:३३, २ मे २०१५ ची आवृत्ती

वासंती विनायक घोरपडे -सासरच्या वासंती इंदुभाई पटेल (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२२; हयात) या मराठी चित्रपटांत भूमिका करणाऱ्या पहिल्या गायक बालकलावंत होत्या.

१९१७ मध्ये बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला वासंतीच्या मावशी, तानीबाई कागलकर, यांनी अर्थसाहाय्य केले होते. तानीबाईंचा विवाह कोल्हापूरच्या महाराजांच्या भावाशी झाला होता. त्या उस्ताद अल्लादिया खान साहेबांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. उत्कृष्ट शास्त्रीय गायिका असल्या तरी, राजघराण्याशी संबंधित असल्याने त्या गायनाचे कार्यक्रम कधीच करत नसत. वासंतीबाईंचे वडील विनायकराव घोरपडे वकील होते. सर्व घोरपडे मंडळी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या आवारातच एका प्रशस्त बंगल्यात राहत होती. त्या बंगल्यात त्या काळी चित्रणही होत असे. इ.स.१९२२ मध्ये जन्मलेल्या वासंतीला पाळण्यात असतानाच बाबूराव पेंटरांनी त्यांच्या ‘कृष्णजन्म’ (१९२२) व ‘मुरलीवाला’ (१९२२) या मूकपटांत बालकृष्ण बनवले, आणि तेथपासूनच वासंतीचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

१ जून १९२९ रोजी विष्णुपंत दामले, व्ही. शांताराम, केशवराव धायबर (वासंतीबाईंच्या आत्याचे यजमान), शेख फत्तेलाल व सीतारामपंत कुलकर्णी यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. १९३२ मध्ये ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाच्या निर्मितीनंतर, चांगला वीजपुरवठा, प्रशस्त जागा व अधिक सुखसोयींसाठी प्रभातने कोल्हापूर सोडून पुण्याला स्थलांतर केले. वासंतीबाई ह्या त्यांच्या मूकपटांतून व बोलपटांतून छोट्यामोठ्या भूमिका करत असत. १९३२ साली निघालेल्या ‘मायामच्छिंद्र’मध्ये स्त्रीलंपट, पण भित्र्या शंखनादाच्या (नट -राजाराम बापू पुरोहित) कन्येची भूमिका वासंतीने केली होती. तसेच ‘बजरबट्ट’ (१९३०) या मूकपटामध्येही वासंतीबाई होत्या.

प्रभातच्या ‘महात्मा’ (नंतरचे नाव ‘धर्मात्मा’) चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी शांताराम बापूंनी वासंतीमधील कलागुण हेरून तिला राणू महाराच्या (वसंत देसाई) मुलीची- जाईची आव्हानात्मक भूमिका दिली. वास्तविक वासंतीने अभिनय, नृत्य आणि गायनाचे तसे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते; तिला या सर्वाची नैसर्गिक देणगी होती. संत एकनाथांनी आपल्या घरी जेवायला येण्याचे मान्य केल्यावर हर्षभरित झालेली जाई (वासंती) ‘उद्या जेवायला येणार नाथ आमच्या घरी’ गात, नाचत, बागडत रस्त्यातून धावत जाते. वासंतीने हा प्रसंग इतका सुरेख आणि सहज साकार केला, की भल्याभल्यांनी तिच्या अभिनयाला भरभरून दाद दिली. एका हरिजन मुलीची अप्रतिम भूमिका साकार केली म्हणून स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वासंतीची पाठ थोपटली होती.

'धर्मात्मा'च्या एका दृश्यात जाई रडता रडता हसते, हसता हसता रडते. अल्लड वयाच्या वासंतीला रडूच येईना. शांताराम बापूंनी फटकन चपराक दिली. आश्चर्य आणि दु:खाने रडणारी 'जाई' कॅमेऱ्याने केव्हा टिपली ते कळलेच नाही. ते दृश्य चित्रपटात फार प्रभावीपणे उतरले आहे.

पुढची कारकीर्द

'धर्मात्मा' पाठोपाठ 'अमर ज्योती' (दुर्गा खोटे, चंद्रमोहन यांच्यासह), कुंकू (शांता आपटे, केशवराव दाते, राजा नेने, विमला वसिष्ठ यांच्यासह) (हिंदीत 'दुनिया न माने') हे चित्रपट आले आणि त्यांनी उत्कृष्ट चित्रपटाचे मानक स्थापित केले. 'अमर ज्योती'मधील भूमिकेसाठी वासंती 'गौहर सुवर्ण पदका'ची मानकरी झाली. ही भूमिका खास वासंतीसाठी निर्माण केली होती. वासंतीनं तिचे चीज केले.

'अमरज्योती' या चित्रपटात दुर्गा खोटेंना शोधत भिकारणीचे वेषांतर करून गात गात जाण्याचे दृश्य साकारताना वासंती तापाने फणफणली होती. पण काम म्हणजे काम, तिथे दया माया नाही ही 'प्रभात'ची शिस्त होती. त्याही परिस्थितीत वासंतीने काम केले आणि त्याची तारीफ झाली.

पगारावर नेमणूक

'रणजित मूव्हीटोन' या चित्रपट कंपनीचे चंदूलाल शहा हे गुणी माणसांचे पारखी होते. त्यांनी महिना १,५०० रु. पगारावर वासंतीला कंपनीत घेतले. घोरपड्यांच्या दादर स्टेशनजवळच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच रणजित स्टुडिओ होता.. 'संत तुलसीदास' हा 'रणजित'चा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला. त्या काळात 'मराठी चित्रपटसृष्टीची शर्ले टेम्पल' असा किताबही वासंतीला मिळाला.

संगीताचे शिक्षण

जयपूर अत्रौली घराण्याचे गायक पं. वामनराव सडोलीकर हे वासंतीच्या मोठ्या बहिणीचे यजमान. त्यांच्याकडून वासंतीबाईंना पाच वर्षे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली. ठुमरी व दादराची तालीम उस्ताद घम्मन खाँकडून मिळाली. गळ्यात उपजतच सूर-ताल होते, त्यांना घराणेदार शिक्षणाचे कोंदण मिळाले. हे शिक्षण चालू असताना पुण्यातील भावे स्कूल ही शाळा, अभ्यास हेही सुरूच होते.

नाट्यसृष्टीत प्रवेश

चित्रपटसृष्टीत नाव गाजत असताना १९४४ च्या मराठी नाट्य महोत्सवात 'संगीत शारदा' हे नाटक करायचे ठरले. वासंतीला शारदेचे काम दिले गेले. कोदंड-गंगाधरपंत लोंढे, श्रीमंत- चिन्तोपंत गुरव आणि इंदिरा काकू- बालगंधर्व असा तगडा संच होता. सकाळपासून रात्रीपर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण आटोपून घरी येऊन मेकअपसुद्धा न उतरवता वासंती शारदेच्या भूमिकेची तालीम करत असे. ही भूमिका पं. वामनराव सडोलीकर (वासंतीच्या बहिणीचे पती) यांनी बसवून घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. पदे आणि संवाद-अभिनय शिकवताना सधोलीकर (भाऊ) अतिशय शिस्तीने, वेळ पडल्यास कठोरपणे तालमी घेत. त्यांनी पदे शिकवली, पण इतरांबरोबर तालीम करताना संपूर्ण पद गायचे नाही असे वासंतीला बजावले होते. त्यामुळे सहकलाकार खूप अस्वस्थ झाले. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी या शारदेने अभिनय आणि गाण्याचा असा बार उडवला की बस्स! 'मूर्तिमंत भीती उभी' या पदाने वन्स मोअर तर घेतलेच, पण अंक संपताच हिराबाई बडोदेकर विंगेत येऊन वासंतीला मिठी मारून रडल्या. पोरी, तू रडवलंस आम्हाला असं म्हणून त्यांनी खूप तारीफ केली.



(अपूर्ण)