"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७०रोजी स्थापन झाली आणि १९९५ सा...
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(काही फरक नाही)

१९:०४, २३ मे २०१३ ची आवृत्ती

स्वरानंद ही संस्था ७ नोव्हेंबर १९७०रोजी स्थापन झाली आणि १९९५ साली तिचे नाव स्वरानंद प्रतिष्ठान झाले.

संस्थापक : विश्वनाथ ओक आणि हरीश देसाई
संस्थापक आणि मानद अध्यक्ष : कै, गजानन वाटवे
आजी-माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विश्वस्त आणि कार्यकारिणीचे सदस्य : यशवंत देव, सुधीर मोघे, प्रकाश भोंडे, अरुण नूलकर, शैला मुकुंद, गिरीश जोशी. वंदना खांडेकर, विजय मागीकर, वगैरे.

इतिहास

इ.स. १९७०च्या सुमारास पुण्यातील विश्वनाथ ओक व हरीश देसाई यांनी 'आपली आवड' या शिर्षकाखाली प्रथमच मराठी वाद्यवृन्दाचा कार्यक्रम केला. त्याला त्या काळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांचाबरोबर अरुण नूलकर , सुधीर दातार, अजित सोमण, सुहास तांबे, सुरेश करंदीकर, प्रकाश भोंडे या मित्रांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढे विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होतच गेले. त्यातूनच स्वरानंद ही संस्था स्थापन झाली. केवळ मराठी सुगम संगीताचे रंगमंचीय कार्यक्रम करणारी 'स्वरानंद प्रतिष्ठान' ही एका अर्थाने आद्य संस्था म्हणून ओळखली जाते.

संस्था स्थापनेचा उद्देश

  • भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे.
  • संगीतविषयक प्रशिक्षण, मार्गदर्शनपर उपक्रम राबविणे तसेच तशा प्रकारच्या इतरांच्या उपक्रमांचे आयोजन करणे. नवीन कलाकारांना योग्य त्या संधी देणे.
  • दृक्‌श्राव्य माध्यमांद्वारे संगीताची अभिरुची वाढवणे, प्रचार करणे अगर अशा उपक्रमांना सक्रिय सहाय्य देणे, संगीताबद्दल संशोधनात्मक कार्य करणे.
  • बालकलाकार, युवा कलाकार यांना योग्य प्रकारे उत्तेजन मिळेल असे सांस्कृतिक, संगीत विषयक उपक्रम राबविणे, संगीतविषयक साहित्याचे ना नफा ना तोटा पद्धतीने प्रकाशन करणे तसेच अशा प्रकाशनास उत्तेजन देणे.

संस्था करीत असलेले कार्य

स्वरानंद प्रतिष्ठान ही संस्था फक्त रंगमंचीय कार्यक्रम करणे हा संकुचित हेतू न ठेवता मराठी सुगम संगीतातील बुजुर्ग कवी, संगीतकार, गायक, वादक यांचे कृतज्ञतादर्शक सोहोळेही स्वरानंदतर्फे होत असतात.

ही संस्था संगीत विषयक कार्यशाळा, व्याख्याने, दृक-श्राव्य कार्यक्रम वगैरे आयोजित करते. संस्थेचे सुसज्ज ग्रंथालय आहे आणि त्यांच्याकडे ध्वनिफितींचा संग्रहही आहे. मराठी भावगीतांचा इतिहास हा महत्त्वाचा प्रकल्प स्वरानंद प्रतिष्ठानने हाती घेतला आहे.

स्वरानंद प्रतिष्ठानने केलेले रंगमंचावरचे कार्यक्रम

  • असेन मी नसेन मी (शांता शेळके यांच्या रचना) (११ जून २००६)
  • आनंदतरंग (श्रीनिवास खळे अमृतमहोत्सव) (२३ ऑगस्ट २०००)
  • आपली आवड (लोकप्रिय मराठी गाण्यांचा कार्यक्रम) (७ नोव्हेंबर १९७०)
  • जय जवान (समर गीतांचा कार्यक्रम) (२९ ऑक्टोबर २०१०)
  • पुलकित गीते ([पु.ल. देशपांडे]] यांनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यांचा कार्यक्रम (१७ ऑगस्ट १९७७)
  • मंतरलेल्या चैत्रबनात (ग.दि.माडगूळकर यांच्या हा चित्रपटगीतांचा कार्यक्रम) (१७ डिसेंबर १९७५)
  • मी निरांजनातील वात (गजानन वाटवे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम (८ जून १९९७)
  • वसंत नाट्य वैभव (वसंत कानेटकर यांच्या नाट्य कर्तुत्वाचा मागोवा घेणाऱ्या दृक्‌-श्राव्य कार्यक्रम) (२० मार्च २०११)
  • स्वरप्रतिभा (पंडित पं.जितेंद्र अभिषेकींचा सांगीतिक मागोवा घेणाऱ्या दृक-श्राव्य कार्यक्रम) (६ जून १९९९)

स्वरानंद प्रतिष्ठान करीत असलेले अन्य उपक्रम

  • नामवंत कलाकारांचे सत्कारसोहोळ
  • भावगीत प्रकल्प
  • वाटवे करंडक भावगीत स्पर्धा
  • सुप्रसिद्ध कलाकारांच्या नावाचे पुरस्कार प्रदान समारंभ, वगैरे.

संस्थेने आयोजित केलेले अन्य कार्यक्रम

  • कविता पानोपानी (तपपूर्ती सोहळा?)
  • गीतरामायण (गीतरामायण सुवर्ण महोत्सव) (१३ नोव्हेंबर २००५)
  • तू अन्‌ मी (द्वंद्वगीते) (७ एप्रिल २००६)
  • नवी पालवी (?) (२४ डिसेंबर २०००)
  • पुलोत्सव (२ नोव्हेंवर १९९९)
  • भावसंगीताची वाटचाल (२ नोव्हेंबर १९९९)
  • मंगलप्रभात (भक्तिगीते) (२९ जून २००६)
  • रंगवर्षा (वर्षागीतांचा कार्यक्रम) २१ सप्टेंबर २००७), वगैरे.

पुरस्कार

स्वरानंद प्रतिष्ठान संगीत क्षेत्रातील कलावंतांना नियमितपणे काही पुरस्कार देते, ते असे -