राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुणे शहरात २५ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष भारतीय वन सेवेतील उच्चाधिकारी व पुणे विभागाचे वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे होते.

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. विजय भटकर यांनी केले. या संमेलनात ‘ओळखा कोण?’, ‘कर्मवीर भाऊराव पाटील’, ‘गाऊ शौर्यगाथा’, ‘धाडसी गिरिजा’, ‘निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, शाकाहार’, ‘माझी लाडकी भारतमाता (कीर्तन)’, ‘वन्यप्राण्यांच्या जगातील गंमती जमती’, ‘विज्ञानाचे नाव चांगदेव पासष्टी’, ‘सलाम मृत्युंजयांना' भाग एक-दोन-तीन, ‘स्मरणिका’ या बारा पुस्तकांचे प्रकाशन झाले.


पहा : साहित्य संमेलने