फुले साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील अनेक संस्था फुले साहित्य संमेलन किंवा तत्सम नावाची फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन, महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, महात्मा फुले साहित्य संमेलन किंवा फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन अशी संमेलने भरवतात. असेच एक संमेलन ’अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन’ अशा नावाने भरते. २८ नोव्हेंबर २०१४ या दिवशी या नावाचे सातवे संमेलन पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील खानवडी या महात्मा फुले यांच्या जन्मगावी भरले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सय्यद जब्बार पटेल होते. या संमेलनाची संकल्पना व संयोजना दशरथ यादव यांचीच असून या राज्यस्तरीय संमेलनाला आत्तापर्यंत कवी विठ्ठल वाघ, इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख, प्रा. रतनलाल सोनग्रा, बबन पोतदार, श्रीमंत कोकाटे, म.भा. चव्हाण हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले आहेत. हे संमेलन दरवर्षी २८ नोव्हेंबरच्या सुमारास घेतले जाते.

या सातव्या संमेलनात फुले यांचा केवळ जयजयकार न करता त्यांच्या विचारांचा अभ्यास व्हावा असे विचार उद्‌घाटक भाई वैद्य यांनी बोलून दाखविले.

  • १० व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक शरद यादव होते.
  • ११वे संमेलन २७ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी साहित्यिक शरद मधुकर गोरे होते. शरद गोरे हे नावाजलेले साहित्यिक असून त्यांनी प्रेम (काव्यसंग्रह), बुधभूषण या संभाजी महाराजांच्या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद, प्रेयसी, आभाळ पेलताना, शरदाचे चांदणं, संशोधनात्मक लेखन, मराठी भाषेचा समग्र इतिहास, शेतकरी हत्या की आत्महत्या अशा एकाहून एक दर्जेदार साहित्याची निर्मिती केली आहे.
  • १२वे महात्मा फुले साहित्य संमेलन, २७ नोव्हेंबर २०१९ रोजी खानवडी येथे झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस.डी. नाईक संमेलनाध्यक्ष होते.

हेसुद्धा पहा[संपादन]