फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन या नावाने भरणाऱ्या संमेलनांपैकी चौथे संमेलन नांदेड येथे ४ डिसेंबर २०११ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते.
  • कल्याण (पूर्व) येथील ’समता विचार मंच’ या सेवाभावी संस्थेच्या विद्यमाने २४ आणि २५ मे २०१४ या कालावधीत कल्याणला एक ‘फुले-शाहू-आंबेडकरी’ साहित्य संमेलन झाले (संमेलनाध्यक्ष कोणीही नव्हते).
  • निर्मिती विचारमंचच्या वतीने कोल्हापूरला ८ डिसेंबर २०१३ रोजी सहावे फुले, शाहू, आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन झाले होते.
  • निर्मिती विचारमंचच्या वतीने दिनांक ११ एप्रिल २००९ रोजी एक फुले-शाहू-आंबेडकर आणि मार्क्‍सवादी युवा साहित्य संमेलन झाले होते.

हे सुद्धा पहा :- साहित्य संमेलने