परागीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

cross pollination एका फुलातील परागकणांचे दुसऱ्या फुलावरील स्त्री केसराबरोबर मिलन होणे म्हणजे परागीभवन होय. फलधारणेसाठी परागीभवन ही एक अत्यंत आवश्यक क्रिया आहे. परागीभवन म्हणजे परागकणांचे फळधारणेसाठी होणारे स्थलांतर होय. हे स्थलांतर किटक घडवून आणतात. परागीभवन होण्यास एका फुलाचे पराग म्हणजे नर, परागवाहकाच्या मदतीने दुसऱ्या झाडावरच्या फुलाच्या बीजांड म्हणजे मादीपर्यंत पोहोचून त्यांचा संयोग व्हावा लागतो. यात वाऱ्याचाही उपयोग होत असतो. तसेच पाण्याचाही उपयोग होतो. परागकण पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहात जातात व दुसऱ्या फुलांचे परागसिंचन करतात. मात्र या दोन्ही प्रकारात नेमकेपणा नसल्याने वनस्पती मोठ्या प्रमाणावर परागनिर्मिती करतात. पक्षी ही या प्रक्रियेत मदत करतात. एकाच जातीच्या फुलांचे पराग त्याच झाडावरील फुलांतील स्त्रीकेसरावर पडल्यास त्या परागीभवनाला स्वपरागीभवन म्हणतात.

क्रिया[संपादन]

एखादा कीटक परागकण किंवा मध खाण्यासाठी फुलावर येतो, तेव्हा त्या मधापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला फुलाच्या सर्वात आतल्या भागात जावे लागते. असे करताना वरच्या पातळीवर असलेले परागकण त्याच्या शरीराच्या विविध अवयवांना चिकटतात. मध खाल्ल्यावर तिथून दुसऱ्या फुलांवर बसताना हेच परागकण त्या फुलांवर पडतात. याच प्रक्रियेला परागसिंचन म्हणतात. याची परिणिती पुढे फलधारणेची क्रिया होते. परागवाहनाचं महत्त्वाचं काम किटकांमुळे होते. म्हणूनच कृषीक्षेत्रात त्यांचं विशेष महत्त्व आहे. परागीकरण झाले नाही, तर पीक आणि फलोत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते

प्रमुख कीटक[संपादन]

परागीभवनात माश्या त्यातही मधमाशी, कुंभारमाशी, सुतारमाशी हे कीटक प्रमुख भूमिका बजावतात. मधमाश्यांची कृत्रिम पैदास केल्यावर त्यांची संख्या वाढल्याने फलधारणा मोठ्या प्रमाणार वाढते असे दिसून् येते.

हे सुद्धा पहा[संपादन]