आनंद बक्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आनंद बक्षी (जन्मनाव:बक्षी आनंद प्रकाश वैद; जुलै २१, इ.स. १९३०:रावळपिंडीमार्च ३०, इ.स. २००२:मुंबई) हे एक हिंदी गीतकार व कवी होते.

बक्षी यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मीरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई सुमित्रा आनंद बक्षी पाच वर्षांचे असताना वारली. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणी दरम्यान २ ऑक्टोबर, १९४७ रोजी भारतात आले. डकोटा विमानातून दिल्लीला आल्यावर बक्षी कुटुंब पुणे, मेरठ आणि शेवटी परत दिल्लीत येउन स्थायी झाले.