परशुराम नारायण पाटणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

परशुराम नारायण पाटणकर (जन्म : चासकमान - पुणे जिल्हा, इ.स. १८६०; - इ.स. १९३९) हे एक संस्कृत पंडित, मराठी निबंधकार आणि कवी होते. मराठी भाषेचे उत्तरी भारतातून दक्षिणेकडे संक्रमण झाले असा सिद्धान्त त्यांनी मांडला होता.

पाटणकरांच्या अनेक कविता ’काव्यरत्‍नावली’त प्रसिद्ध झाल्या होत्या.

शिक्षण आणि अध्यापन[संपादन]

१८८५ साली बी.ए. आणि १८९८ साली एम.ए. झाल्यानंतर पाटणकर यांनी इंदूर आणि बनारस येथे संस्कृतचे अध्यापन केले. पुढे देवासच्या संस्थानात ते राजाचे खासगी चिटणीस व शिक्षणाधिकारी बनले. इ.स. १९१८मध्ये पाटणकर बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयात रिलिजन इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीला लागले. त्यांनी १९२४ सालापासून काशीहून धर्मसंगती नावाचे संस्कृत मासिक चालविले.

परशुराम नारायण पाटणकरांची पुस्तके[संपादन]

  • चेतोहर या नावाने जयदेवकृत ’गीतगोविंदा’चे समवृत्त मराठी भाषांतर, १८८९)
  • मराठी भाषेच्या माहेराचे सिंहावलोकन (अनेक भारतीय भाषांमधून मराठीशी नाते दाखविणारे शब्द हु्डकून काढून त्यांच्या व्युत्पत्त्या दाखवणारा शोधनिबंध, १९०७)
  • मल्लरिराज प्रशस्ति (संस्कृत काव्य, १९२०)
  • वीरधर्मदर्पण (महाभारतातील अभिमन्यूवधापासून जयद्रथवधापर्यंतच्या कथाभागावर आधारित संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर) (नरहर शंकर रहाळकरांनीही या वीरधर्मदर्पण नावाच्या संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतर केले आहे.)
  • काव्यादर्श, किरातार्जुनीय, रघुवंश, शाकुंतल, शिशुपालवध वगैरे संस्कृत पुस्तकांवर विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील अशी इंग्रजी गाइडे.