एकभुक्त व्रत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एकभुक्त व्रत म्हणजे दिवसातून फक्त एक वेळेस जेवण करणे. हे व्रत [[चतुर्मास|चतुर्मासात]] केले जाते.

चतुर्मासातील आषाढ, श्रावण, भाद्रपद या तीन महिन्यांत भारतात पावसाळा असतो. यावेळी पचनशक्ती काहीशी मंद झालेली असते. त्यामुळे शरीराला आणि पचनसंस्थेला विश्रांती मिळणे असाही या एकभुक्त व्रतामागे हेतू असावा. हे व्रत करीत असताना एखादी गोष्ट खूप सहजपणे सोडता येण्याची सवय होते.