Jump to content

"अनिल काकोडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 'माहितीचौकट शास्त्रज्ञ' साच्याचा वापर; वर्गीकरण - 'वर्ग:मराठी शास्त्रज्ञ', 'वर्ग:पद्मभूषण पुरस्क
No edit summary
ओळ ३१: ओळ ३१:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

'''डॉ.अनिल काकोडकर ''' हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूउर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भरत सरकारच्या अणूउर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणूउर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी [[होमी भाभा अणू संशोधन केंद्र|होमी भाभा अणू संशोधन केंद्राचे]] ते १९९६ ते २००० दरम्यान संचालक होते.

==भारतीय स्वयंपूरक तंत्रज्ञाचे जनक==

भारतातील अनेक महत्त्वाच्या पदे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ या व्यतिरिक्त, डॉ. काकोडकर भारताच्या स्वयंपूरक अश्या [[थोरियम]] या इंधनावर आधारीत अणूउर्जेच्या तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.

==वाटचाल==

डॉ. काकोडकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४३ मध्ये, मध्यप्रदेशातील बारावनी गावात झाला. त्याच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील श्रीयुत पी. काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिक नंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले.

डॉ. काकोडकर हे मुंबईच्या [[रुपारेल कॉलेज]] मध्ये बारावी पर्यंत होते. तर त्यांनी मेकॅनिकल तंत्रज्ञानाची पदवी [[वि.जे.टी.आय.]],[[मुंबई विद्यापीठ]] येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी [[नॉटिंगहॅम]] विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली

पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिऍक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणार्‍या "ध्रुव रिऍक्टर"मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अश्या जड पाण्याच्या रिऍक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या भट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

आतापर्यंत त्यांनी जवळजवळ २५०च्यावर तांत्रिक श्वेतपत्रांचे लेखन केले आहे.

== ऊर्जा आणि भारतीय शांततामय अणूउर्जा कार्यक्रम==

भारताना उर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अश्या स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्यादिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे. सध्या ते प्रगत जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. ह्या भट्टीत थोरियम-युरेनिअम२३३ याचा मूळ उर्जास्त्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अश्या प्रकारच्या भट्टीमुळे, भारताची ७५% ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.

==इतर पदे==

डॉ. काकोडकर सध्या "भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई" ([[आय. आय. टी, मुंबई]])याचे अध्यक्ष आहेत

राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० यादरम्यान अध्यक्ष होते.

ते जागतिक अणूउर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे

ते एन्.एस्.जी. ग्रुपचे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.

==राष्ट्रीय पुरस्कार==

[[पद्मश्री]] ([[१९९८]])

[[पद्मभुषण]]([[१९९९]])

== इतर पुरस्कार==

हरी ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार (१९८८)

[[एच. के. फिरोलिया पुरस्कार]] (१९९७)

[[रॉकवेल पदक]] (१९९७)

[[फिक्की]] पुरस्कार, त्यांच्या अणूउर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल (१९९७-९८)

[[ऍनकॉन]] जीवनगौरव पुरस्कार (१९९८)

एच. जे भाभा स्मृती पुरस्कार (१९९९-२०००)

गोदावरी गौरव पुरस्कार (२०००)

Godavari Gaurav Award (2000)

==बाह्य दुवे==

*[http://www.world-nuclear.org/sym/2002/kakodkarbio.htm Biography]
*[http://www.dae.gov.in/aec.htm Atomic Energy Commission of India]



----
----

२२:४५, ५ जानेवारी २००८ ची आवृत्ती

अनिल काकोडकर
जन्म नोव्हेंबर ११, १९४३
बारावनी, मध्य प्रदेश, भारत
निवासस्थान भारत
नागरिकत्व भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अणुशास्त्रज्ञ
कार्यसंस्था भाभा अणुसंशोधन केंद्र
प्रशिक्षण व्हीजेटीआय
वडील पी. काकोडकर
आई कमला काकोडकर

डॉ.अनिल काकोडकर हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणूउर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भरत सरकारच्या अणूउर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणूउर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी होमी भाभा अणू संशोधन केंद्राचे ते १९९६ ते २००० दरम्यान संचालक होते.

भारतीय स्वयंपूरक तंत्रज्ञाचे जनक

भारतातील अनेक महत्त्वाच्या पदे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ या व्यतिरिक्त, डॉ. काकोडकर भारताच्या स्वयंपूरक अश्या थोरियम या इंधनावर आधारीत अणूउर्जेच्या तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.

वाटचाल

डॉ. काकोडकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४३ मध्ये, मध्यप्रदेशातील बारावनी गावात झाला. त्याच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील श्रीयुत पी. काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिक नंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले.

डॉ. काकोडकर हे मुंबईच्या रुपारेल कॉलेज मध्ये बारावी पर्यंत होते. तर त्यांनी मेकॅनिकल तंत्रज्ञानाची पदवी वि.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली

पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिऍक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणार्‍या "ध्रुव रिऍक्टर"मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अश्या जड पाण्याच्या रिऍक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या भट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

आतापर्यंत त्यांनी जवळजवळ २५०च्यावर तांत्रिक श्वेतपत्रांचे लेखन केले आहे.

ऊर्जा आणि भारतीय शांततामय अणूउर्जा कार्यक्रम

भारताना उर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अश्या स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्यादिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे. सध्या ते प्रगत जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. ह्या भट्टीत थोरियम-युरेनिअम२३३ याचा मूळ उर्जास्त्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अश्या प्रकारच्या भट्टीमुळे, भारताची ७५% ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.

इतर पदे

डॉ. काकोडकर सध्या "भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई" (आय. आय. टी, मुंबई)याचे अध्यक्ष आहेत

राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० यादरम्यान अध्यक्ष होते.

ते जागतिक अणूउर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे

ते एन्.एस्.जी. ग्रुपचे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.

राष्ट्रीय पुरस्कार

पद्मश्री (१९९८)

पद्मभुषण(१९९९)

इतर पुरस्कार

हरी ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार (१९८८)

एच. के. फिरोलिया पुरस्कार (१९९७)

रॉकवेल पदक (१९९७)

फिक्की पुरस्कार, त्यांच्या अणूउर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल (१९९७-९८)

ऍनकॉन जीवनगौरव पुरस्कार (१९९८)

एच. जे भाभा स्मृती पुरस्कार (१९९९-२०००)

गोदावरी गौरव पुरस्कार (२०००)

Godavari Gaurav Award (2000)

बाह्य दुवे