उरमोडी धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

{{माहितीचौकट धरण | नाव = साचा:उरमोडी धरण

हे धरण उरमोडी नदीवर सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी या ठिकाणी १९९७ साली बांधण्यात आले आहे. परळी ही एकेकाळची मोठी बाजारपेठ होती. सातारा जिल्ह्यातील हे महत्त्वाचे धरण आहे.

१२ किलोमीटर लांबीच्या या धरणाच्या बाजूला परळी , वाघवाडी , यादववाडी, बणघर, कूस, खडगाव , कसरथल, नित्रल, निगुडमाळ, सांडवली, केळवली, ताकवले, कातवडी, रेवली, रोहोट, वेनेखोल, पाठेघर, वडगाव, सावली, लावंघर, दहिवडी इत्यादी गावे आहेत, तर काही गावे विस्थापित झाली आहेत. .

या धरणाद्वारे उरमोडी नदीलगतच्या गावांना पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी लागणारे पाणी पुरवले जाते.

बाह्य दुवे[संपादन]