हॅम्लेट
हॅम्लेट ही विल्यम शेक्सपियर यांनी १५९९ ते १६०२ च्या दरम्यान लिहिलेली, डेन्मार्कचा राजकुमार हॅम्लेट याच्या आयुष्यातील दुःखद घटनांवर बेतली एक काल्पनिक शोकांतिका आहे. प्रिन्स हॅमेलेटला इजा करणे त्याच्या वडिलांचा, क्लौडियसवर, हॅम्लेटच्या वडिलांचा भूत राजा हॅम्लेटचा भूतकाळ होता. क्लौद्य याने आपल्या स्वतःच्या भावाला ठार मारले होते आणि सिंहासनावर कब्जा केला होता आणि त्याच्या मृत भावाच्या विधवाशीही लग्न केले होते.
हॅम्लेट हे शेक्सपियरचे सर्वात मोठे नाटक आहे आणि ते जगातील इतर साहित्यांपैकी सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली कादंबरी आहे. कदाचित शेक्सपियरच्या सर्वाधिक लोकप्रिय कारकिर्दीपैकी एक होता,आणि १८९८ पासून रॉयल शेक्सपियर कंपनी आणि स्ट्रॅटफोर्ड-यावर-एवोनमधील त्यांच्या पूर्ववर्तीयांच्या कामगिरी यादीमध्ये ते सर्वात जास्त कामगिरीचे मानले जातात.या लेखकाने जोहान वोल्फगँग वॉन गेटे आणि चार्ल्स डिकन्स यांच्याकडून जेम्स जॉयस आणि आयरिस मर्डोक यांना अनेक लेखकांना प्रेरणा दिली आहे - आणि "सिंड्रेला नंतर जगातील सर्वात फिल्मिंग कथा" म्हणून वर्णन केले आहे.
नाटकाच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आवृत्त्या अस्तित्वात आहेत: फर्स्ट क्वार्टो (प्र १ संख्या, १६०३); दुसरा क्वार्टो (प्र २,१६०४); आणि प्रथम फोलिओ (एफ १, १६२३).
मराठी हॅम्लेट[संपादन]
नाना जोग यांच्या भाषांतरामुळे मराठीत पहिल्यांदा हॅम्लेट नाटक आले. प्रसिद्ध नट दामू केंकरे यांनी हॅम्लेट रंगवला होता. त्याच भाषांतरावर दूरचित्रवाणी झी मराठीचे नाटक नव्याने बेतले आहे. नाटकात सुमीत राघवन याने अतिशय ताकदीने हॅम्लेट उभा केला आहे. हॅम्लेटच्या मनातील गोंधळ, अस्वस्थता, संशय, राग, हतबलता इत्यादी अनेक भावना त्याने विविध प्रकारे मांडल्या आहेत. सुनील तावडे, तुषार दळवी या सारखे इतर कसलेले अनुभवी नट देखील नाटकात आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांचे नाट्यदिग्दर्शन आहे.
नाटकात हॅम्लेटचा काळ उभा करण्यासाठी किल्ल्याचे, तसेच राजदरबाराचे नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा यांमध्ये कसलीही कसूर नाही. नाटकाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. या सर्वांमुळे प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जाते आणि एखादे मराठी नाटक पाहतो आहे असे न वाटता इंग्लंडमधील नाटक पाहतो आहे असे भासू लागते, हे या प्रयोगाचे यश आहे.
हॅम्लेटची कथा[संपादन]
हॅम्लेट हे एक सूडनाट्य आहे. हॅम्लेटच्या एकलेपणाची ती शोकांतिका आहे. डेन्मार्कचा राजा असलेल्या वडिलांच्या खुनानंतर हॅम्लेटचा काका राजपुत्र हॅम्लेटच्या आईबरोबर विवाह करतो. इतक्या घाईघाईत आईने त्याला राजी व्हावे, हे त्या राजपुत्र हॅम्लेटला पटत नाही. तो वडिलांच्या मृत्यूनंतर दुःखीकष्टी झालेला असतो. त्याला वडिलांच्या हत्येचा सूड घ्याचा असतो, पण तो पुरता गोंधळात पडलेला असतो (तसेच इतरांना देखील त्याच्या वागणुकीवरून गोंधळात टाकतो). आईच्या व्यभिचारी वर्तनाचा देखील त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो, एकूणच घृणा वाटत असते. काय करावे त्याला समजत नाही (जगावे की मरावे, to be or not to be, हे ह्या नाटकातीलच हॅम्लेटच्या तोंडी असलेले प्रसिद्ध वाक्य. ह्या नाटकात स्वगे देखील बरीच आहेत). ह्या सगळ्यातून तो त्याच्यावर प्रेम असलेल्या मुलीच्या प्रेमावर देखील शंका घेऊ लागतो. ह्या सगळ्यातून तो सूड घेतो. नाटकादरम्यान त्याचा मानसिक प्रवास आपल्या समोर उलगडत जातो.
नाटकात भुताचे एक पात्र आहे. ते हॅम्लेटला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती देण्यासाठी निर्माण केले आहे. खरेतर नाटक त्याच प्रसंगापासून सुरू होते. ते ज्या पद्धतीने सादर केले गेले आहे, तेथेच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. शेवटी तलवारबाजीचा द्वंद्वाचा प्रसंग आहे. नाटकात अनेक भावभावनांचे प्रदर्शन आहे. हॅम्लेट वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी एका नाटक मंडळीला पाचारण करतो, आणि नाटक सादर करायला लावतो. त्यावेळेस त्याच्या तोंडी शेक्सपिअरने अभिनायासंबंधी, नाटकासंबंधी काही विचार मांडले आहेत, ते देखील टाळ्या खेचणारे आहेत.